पंधराशे कोटीच्या खर्चानंतर जिगाव प्रकल्प ‘अंधातरी’

By Admin | Updated: November 14, 2015 02:14 IST2015-11-14T02:14:27+5:302015-11-14T02:14:27+5:30

माती भिंत व सांडवा रखडलेला.

After the expenditure of 15 crores, | पंधराशे कोटीच्या खर्चानंतर जिगाव प्रकल्प ‘अंधातरी’

पंधराशे कोटीच्या खर्चानंतर जिगाव प्रकल्प ‘अंधातरी’

नांदुरा (जि. बुलडाणा): राज्यातील मोठे सिंचन प्रकल्प पुर्ण होण्यासाठी दशकांचा कालावधी लागला तोच प्रकार बुलडाणा जिल्ह्यातील महत्वाकांक्षी जिगाव प्रकल्पाबाबत घडत आहे. आतापर्यंंत पंधराशे कोटी रुपयांचा खर्च केल्यानंतरही प्रकल्प अंधांतरी असून मागीलवर्षी नगण्य काम झाल्यानंतर यावर्षी शेतकर्‍यांचा विरोध असल्याने माती भिंत व सांडव्याचे काम पुन्हा एकदा बंद पडले आहे. प्रकल्पाच्या माती भिंतीचे काम सुरु करण्यासाठी २00७ मध्ये शेतकर्‍यांनी सरळ खरेदीने शेतजमीनी दिल्या. त्यावेळी त्यांना सरासरी एकरी ९0 हजार एवढाच मोबदला मिळाला होता. मात्र आज रोजी धरणाच्या इतर कामांसाठी संपादीत केल्या जाणार्‍या शेतीला त्यांच्या सात ते आठ पट एवढा मोबदला मिळत असल्याने आधी शेजजमीनी देणार्‍या शेतकर्‍यांनी उपोषण व धरणाच्या कामाला विरोध करुन काम बंद पाडले आहे. प्रकल्प पुन्हा रेंगळणार असल्याचे चित्र दिसत आहे. जिगाव प्रकल्पाच्या कामाला सुरवातीला यंत्र सामुग्री जाळण्यापासून ते अधिकार्‍यांच्या कपडे फाडण्यापर्यंंतची व वेळोवेळी कामबंद पाडणारी आंदालने झाली आहेत. पुर्नवसनाच्या कामाला व मोबदला वितरीत करायला वेळ लागत असल्याने प्रकल्पाच्या कामाला खिळ बसली आहे. पंधराशे कोटी रुपयांच्या खर्चानंतरही प्रकल्प अंधातरीच राहणार काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे. *२५ वर्षात ३0 टक्के काम जिगाव प्रकल्पाला १९९0 च्या फेब्रुवारी महिन्यात सुमारे चारशे कोटीची पहिली प्रशासकीय मान्यता मिळाली होती. म्हणजेच २५ वर्षापूर्वी मान्यता मिळालेल्या या प्रकल्पाचे आजरोजी जेमतेम ३0 टक्के काम पूर्ण झाले आहे. आतापर्यंंत पंधराशे कोटीचा खर्च झाला व एकाही गावाचे पुर्णता पुर्नवसन झालेले नाही.

Web Title: After the expenditure of 15 crores,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.