शहरं
Join us  
Trending Stories
1
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
2
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
3
देशमुख-मुंडे हत्या: "...पण, महाराष्ट्र सरकार त्यांना न्याय देत नाहीये"; सुप्रिया सुळेंची अमित शाहांकडे मोठी मागणी
4
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
5
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
6
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
7
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
8
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
9
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
10
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
11
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
12
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
13
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
14
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
15
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र
16
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
17
Jasprit Bumrah Miss Oval Test : जे आधी ठरलंय तसेच होणार! मग बुमराहची जागा कोण घेणार?
18
प्रा. ममता पाठक यांना जन्मठेपेची शिक्षा, पतीच्या खूनाचा आरोप; तो व्हिडिओ झालेला व्हायरल
19
दहशतवाद्यांनी कुंकूच पुसलं मग ऑपरेशनचं नाव 'सिंदूर' कशासाठी? जया बच्चन यांचा परखड सवाल
20
मालकिणीच्या हाताला झटका देऊन कुत्र्याची समोरून येणाऱ्या महिलेवर झडप, धडकी भरवणारा व्हिडीओ!

आदित्य म्हणाले मंदी आहेच, रोजगारावर भर द्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 12:58 IST

रोजगारावर, इंडस्ट्रिज उभारणीवर भर द्यावा लागणार आहे. त्यासाठी आपण शासनाकडे पाठपुरावा करू, असे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी येथे सांगितले.

अकोला: देशामध्ये मंदीचे वातावरण आहे. नोकºया गमवाव्या लागत आहेत. जुन्या शिक्षण पद्धतीनुसार कितीही शिकले तरी नोकºया मिळत नाही. त्यामुळे शिक्षण पद्धती बदलून करिअर ओरिएन्टेड शिक्षण पद्धती लागू करण्याची गरज आहे. रोजगारावर, इंडस्ट्रिज उभारणीवर भर द्यावा लागणार आहे. त्यासाठी आपण शासनाकडे पाठपुरावा करू, असे शिवसेना प्रणित युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी येथे सांगितले.डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात आयोजित आदित्य संवाद कार्यक्रमात युवकांच्या प्रश्नांना ते उत्तरे देत होते. शिक्षण पद्धती, आरक्षण, महिलांची सुरक्षा, कोचिंग क्लासेसचे वाढलेले शुल्क, महाविद्यालयांमधील मॅनेजमेंट कोटा आदी विषयांवर युवक-युवतींनी विचारलेल्या प्रश्नांना आदित्य ठाकरे यांनी उत्तरे दिली. आदित्य ठाकरे यांनी संवाद साधताना, शाळा, महाविद्यालय, कार्यालयांमध्ये महिला, युवतींना सुविधा मिळायला हव्यात, त्याकडे आपण लक्ष देणार असल्याचे सांगितले. यासोबतच शिक्षण हे कोण्याही वर्गाची मक्तेदारी नाही. सर्वांना मोफत आणि दर्जेदार शिक्षण घेण्याचा अधिकार आहे. त्यात गरीब, श्रीमंत असा भेद होऊ नये. शिक्षणातून आर्थिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न होत आहे. मॅनेजमेंट कोट्यातून प्रवेशासाठी लाखो रुपये डोनेशन घेतल्या जाते. याला प्रतिबंध घालण्याची विनंती एका विद्यार्थिनी आदित्य ठाकरे यांना केली असता, त्यांनी, मॅनेजमेंट कोटा शासन लवकरच रद्द करणार आहे. डोनेशनचा प्रश्न कधी सुटणार नाही; परंतु ते डोनेशन वैध करण्यासाठी प्रयत्न करू. सर्वांना समान शिक्षण मिळावे यासाठी आपण संघर्ष करण्यास तयार असल्याचेही त्यांनी सांगितले. आरक्षणाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना, आदित्य ठाकरे म्हणाले, आरक्षण हे आर्थिक निकषांवर असावे; परंतु अद्यापही अनेक जातींना आरक्षणाची गरज आहे. त्यामुळे आरक्षण हा विषय सध्या तरी बाजूला सारला जाणार नाही. एका विद्यार्थिनीच्या कोचिंग क्लासेसच्या वाढत्या शुल्कामुळे गरिबांना शिक्षणापासून वंचित राहावे लागते. त्यासाठी आपण शुल्क नियंत्रणासाठी प्रयत्न करणार का, या प्रश्नावर आदित्य ठाकरे यांनी, त्यासाठी शुल्क नियंत्रण कायद्याची गरज असून, तो आणण्यासाठी शासनावर दबाव आणणार असल्याचे स्पष्ट केले. रोजगार, करिअरच्या प्रश्नाबाबत बोलताना, त्यांनी शिक्षणपद्धती, अभ्यासक्रम बदलण्याची गरज आहे. शिक्षणही घेऊनही युवकांना नोकरी मिळत नसल्याची वस्तुस्थिती युवकांसमोर मांडली.

अन् ती विद्यार्थिनी झाली भावुक!एका विद्यार्थिनीने एसटी महामंडळात तिचे वडील कार्यरत असून, त्यांना १७ हजार रुपये पगार आहे. एवढ्या पगार मुलांचे शिक्षण होऊ शकत नाही. त्यामुळे एसटी महामंडळाचे खासगीकरण न करता, शासनात हा विभाग विलीन करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करणार का, असा प्रश्न विचारला. प्रश्न विचारताना, तिने वडिलांची परिस्थिती कथन केली आणि तिला रडू कोसळले. यासाठी काहीतरी करा, अशी आर्त विनवणी तिने केली. तिच्या विनवणीला प्रतिसाद देत, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी, यासाठी जरूर प्रयत्न करेल, असे आश्वासन तिला दिले.
शेतकऱ्यांना सरसकटच कर्जमाफी हवी!शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी देताना अटी लादल्या. या अटी आम्हाला मान्य नाहीत. शेतकºयांना सरसकटच कर्जमाफी हवी. त्यासाठी शासनासोबत आम्ही भांडण मांडले आहे. सरसकट कर्जमाफी मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

 

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेShiv SenaशिवसेनाAkolaअकोला