शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

अपघातग्रस्त खेळाडूंनी गाठले मैदान...अंतिम फेरीत धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 14:05 IST

भीषण अपघात होऊनही चिमुकल्यांनी स्पर्धा स्थळ गाठून अंतिम सामन्यासाठी पात्रता सिद्ध केली.

- नीलिमा शिंगणे-जगड ।लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : संकटांचा सामना प्रत्येकालाच करावा लागतो. ध्येय गाठायचे असेल तर अनेक अडथळे पार क रावे लागतात. आलेल्या संकटांवर मात करू न ध्येयप्राप्ती करावी, हेच प्रत्येक खेळाडूंच्या मनावर क्रीडा शिक्षक, प्रशिक्षकांकडून बिंबविल्या जाते. आयुष्यात कितीही अडथळे आले तरी त्यावर खिलाडूवृत्तीने खेळाडू विजय मिळवितोच. याचा प्रत्यय १४ वर्षाखालील नाशिक विभागाच्या खो-खो संघाने आणून दिला. राज्यस्तरीय शालेय स्पर्धेकरिता अमरावतीला जात असताना प्रवासादरम्यान भीषण अपघात होऊनही चिमुकल्यांनी स्पर्धा स्थळ गाठून अंतिम सामन्यासाठी पात्रता सिद्ध केली.नाशिक विभागाचा सामना उद्या शुक्रवार, २९ नोव्हेंबर रोजी लातूर विभागासोबत होणार आहे. बुधवारी नाशिक विभाग संघ अमरावतीला जात असताना अकोल्यातील बोरगावमंजू जवळ अपघात झाला. यामध्ये ४ खेळाडू किरकोळ जखमी झाले. तर दोन शिक्षक आणि गाडी चालक गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर सर्वोपचार रुग्णालयात उपचार करण्यात आले. क्रीडा शिक्षक संजय मैंद यांनी नाशिक संघाला सर्वोतोपरी तत्काळ मदत केली. हॉकी अकोला संघटनेचे सचिव धीरज चव्हाण यांना अपघाताची माहिती मिळताच सर्वोपचार रुग्णालय गाठले. त्यानंतर खेळाडूंना खेळण्यास प्रोत्साहित करू न चव्हाण यांनी खासगी वाहनाने रात्री २.३० वाजता अमरावती येथे सुखरू प पोहचविले. गुरुवारी सकाळी नाशिक विभाग संघाने स्पर्धेत दमदार खेळी करीत अंतिम फेरीसाठी पात्रता सिद्ध केली.

क्रीडा क्षेत्र धावला मदतीलाअपघाताची माहिती मिळताच अकोला क्रीडा क्षेत्र मदतीला धावून आला. क्रीडा शिक्षक संजय मैंद, राजू दहापुते, क्रीडा अधिकारी दिनकर उजळे, धीरज चव्हाण, प्रमोद म्हैसने, संजय तायडे, मुख्यध्यापक पंडित वानखडे यांनी तत्परता दाखविली. खेळाडूंची उपचार, भोजन व्यवस्था केली. जिल्हा क्रीडा अधिकारी आसाराम जाधव यांनी आस्थेने चौकशी करू न खेळाडूंना स्पर्धेसाठी पुढील व्यवस्था करू न दिली.आयुष प्रसाद यांनी अपघातग्रस्त खेळाडूंशी साधला संवादअमरावती येथे राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेसाठी जात असताना बोरगाव मंजू येथे नाशिकच्या संघाचा अपघात झाला. यातील जखमींवर सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहे. गुरुवारी जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी जखमींची भेट घेऊन त्यांच्या उपचाराबाबत माहिती घेतली. तसेच आदिवासी विकास विभागाकडून सर्वतोपरी मदतीचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

मानवतेचा परिचयमहिला क्रीडा शिक्षकांना गुरुवारी सकाळी अपघाताची माहिती मिळाली. रुग्णालयात उपचार घेत असलेल्या गंभीर जखमींची आस्थेने विचारपूस केली. जखमी चिमुकल्या खेळाडूंना आपलेसे करू न मायेने कुरवाळले. फळ, सुकामेवा, अल्पोपाहार, भोजनाची व्यवस्था केली. मायेने घास भरविले. नात्यांपेक्षाही मानवता श्रेष्ठ असल्याचे याप्रसंगी उपस्थितांनी अनुभवले. ज्योती चंदन, शीला कोकाटे, वर्षा बोबडे, संगीता बारड, अर्चना मेतकर, आशालता काळे या शिक्षकांनी मानवतेचा परिचय दिला.

टॅग्स :AkolaअकोलाNashikनाशिक