शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
4
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
5
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
6
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
7
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
8
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
9
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
10
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
11
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
12
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
13
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
14
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
15
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
16
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
17
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
18
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
19
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
20
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान

८४ खेडी योजना दुरुस्तीचे साहित्य गायब; मजीप्राने गिळले मूग 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 15:52 IST

अकोला : खारपाणपट्ट्यातील गावांना पाणी देण्यासाठी १० कोटींपेक्षाही अधिक रक्कम खर्च झाली. दुरुस्तीसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने खरेदी केलेले साहित्य गायब झाल्याने ७७ लाखांपेक्षाही अधिक रकमेचा अपहार झाला.

अकोला : खारपाणपट्ट्यातील गावांना पाणी देण्यासाठी १० कोटींपेक्षाही अधिक रक्कम खर्च झाली. दुरुस्तीसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने खरेदी केलेले साहित्य गायब झाल्याने ७७ लाखांपेक्षाही अधिक रकमेचा अपहार झाला. तरीही पाणी पुरवठा सुरळीत झाला नाही. ही बाब आता योजना हस्तांतरण करताना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणसह संबंधितांच्या गळ्यात पडणार आहे. विशेष म्हणजे, गत वर्षभरापासून या अपहाराबाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मूग गिळून असल्याने त्यांचाही या प्रकरणाशी असलेला संबंध तपासण्याची गरज निर्माण झाली आहे.महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने खरेदी करून पुरवठा केलेल्या पाइपपैकी ४६६५ मीटर (४.६ किमी) पाइपची योजनेतील गावांसाठी जोडणीच झालेली नाही. त्याचवेळी खरेदी केलेले हे पाइप कुठे आहेत, याची माहितीही प्राधिकरणाकडे नाही. या पाइपची किंमत ३२ लाखांपेक्षाही अधिक आहे. एअर शॉफ्टसाठी १०० एमएसटीची खरेदी केली. त्यापैकी ७२ वापरल्या गेल्या. २८ एमएसटी गायब करण्यात आल्या आहेत. त्याची किंमतही लाखोंच्या घरात आहे. एअर व्हॉल्व्ह १५० पैकी ७२ चा वापर झाला. ७८ व्हॉल्व्हचा हिशेब नाही. संतुलन टाकीस अतिरिक्त आउटलेट लावण्यासाठी ३३६ ठिकाणी काम केल्याचे सांगितले; मात्र ते कुठे झाले, याची कोणतीही माहिती उपलब्ध नाही. चेंबरचे बांधकाम केल्याची नोंद नाही, तरीही १ लाख १९ हजारांचे देयक काढण्यात आले. २५ सीआयडीएफ स्युल्स व्हॉल्व्हपैकी सात ठिकाणी बसविण्यात आले. १८ व्हॉल्व्ह रिप्लेस केले. ते व्हॉल्व्हही गायब आहेत. गळती दुरुस्ती करण्यासाठी एलआरसी पुरवठा करण्यात आला. मोजमाप पुस्तिकेत दुरुस्तीची नोंद असली, तरी त्या नेमक्या कुठे वापरण्यात आल्या, ही बाबही उघड झालेली नाही. डीआय स्पेशल १५४०० किलोग्रॅम खरेदी झाली. त्यापैकी १२६६७ किलोचा वापर झाला. उर्वरित २७३३ किग्रॅ कुठे आहेत, ही बाब कंत्राटदार आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या संबंधितांकडूनच घ्यावी लागणार आहे. सीआयडी जॉइंटसाठी १३ लाख २८ हजार रुपये तर ६८७ ठिकाणी गळती दुरुस्तीसाठी ८ लाख ९६ हजार रुपये काढण्यात आले. ही कामे एकाच दिवशी केल्याची माहिती आहे. साहित्य पुरवठ्याची साठा पुस्तकात नोंद नाही, तसेच कामे कोणत्या ठिकाणी केली, याचीही माहिती उपलब्ध नसल्याने ८४ खेडी योजनेची दुरुस्ती केली की निधी उकळण्यासाठी कामे झाली, हा मोठा प्रश्न यानिमित्ताने आता उपस्थित होत आहे.

 

टॅग्स :Akolaअकोला