शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

वर्‍हाडात आतापर्यंत ७८ टक्के पाऊस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 01:41 IST

अकोला : राज्यातील अनेक भागात धो-धो पाऊस सुरू  असताना वर्‍हाडातील (पश्‍चिम विदर्भ)पाच जिल्हय़ात अद्याप पूरक   पाऊस न झाल्याने मोठे, मध्यम व लघु प्रकल्पाच्या जलपातळीत अपेक्षित वाढ झाली नाही. या सर्व धरणांत आजमितीस ४२ टक्के जलसाठा आहे. तसेच पावसाळ्य़ाच्या चार महिन्यांत आतापर्यंत ७८ टक्के पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान,अधून-मधून पडणारा पाऊस  पिकांना संजीवनी देणारा ठरला आहे.

ठळक मुद्देमोठे, मध्यम, लघु प्रकल्पात एकूण ४२.१६ टक्के जलसाठा अप्पर वर्धाचे पाणी सोडणार

राजरत्न सिरसाट । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : राज्यातील अनेक भागात धो-धो पाऊस सुरू  असताना वर्‍हाडातील (पश्‍चिम विदर्भ)पाच जिल्हय़ात अद्याप पूरक   पाऊस न झाल्याने मोठे, मध्यम व लघु प्रकल्पाच्या जलपातळीत अपेक्षित वाढ झाली नाही. या सर्व धरणांत आजमितीस ४२ टक्के जलसाठा आहे. तसेच पावसाळ्य़ाच्या चार महिन्यांत आतापर्यंत ७८ टक्के पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान,अधून-मधून पडणारा पाऊस  पिकांना संजीवनी देणारा ठरला आहे.यावर्षी सुरुवातीपासून पावसाने वर्‍हाडाकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे पेरण्यांनाही एक ते दीड महिने उशीर झाला आहे. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला पाऊस पडला, त्यानंतर दीर्घ खंड पडला. सप्टेंबर महिन्यात अधून-मधून पाऊस होत आहे. त्यामुळे धरणांच्या एकदमच खालावलेल्या स्थितीत अल्पशी सुधारणा झाली आहे.वर्‍हाडात नऊ मोठे सिंचन प्रकल्प असून, त्यामध्ये आजमितीस ५१.0९ टक्के जलसाठा आहे. तसेच २३ मध्यम प्रकल्प आहेत, त्यामध्ये ४३.८0 टक्के जलसाठा उपलब्ध आहे.तर ४५२ लघु प्रकल्प आहेत.त्यात २७.९२ टक्के जलसाठा आहे. या सर्व जलसाठय़ाची सरासरी टक्केवारी ही ४२.१६ टक्के एवढी आहे. विशेष म्हणजे बुलडाणा जिल्हय़ात बर्‍यापैकी पाऊस झाल्याने खडकपूर्णा धरणात शून्य टक्के जलसाठा होता तो ५.५ टक्के एवढा वाढला आहे.दरम्यान, १ जून ते २१ सप्टेंबरपर्यंत ७८ टक्के पावसाची नोंद झाली असून, बुलडाणा जिल्हय़ात आतापर्यंत ६२३ मि.मी.अपेक्षित होता, येथे ६४५.७ मि.मी. म्हणजे १0४ टक्के पाऊस झाला आहे. अकोला जिल्हय़ात ५३३.६ मि.मी. ८२ टक्के पाऊस झाला आहे. वाशिम जिल्ह्यात ५७६.९ मि.मी. ७८ टक्के पावसाची नोंद झाली आहे. अमरावती जिल्हय़ात ५३४.९ मि.मी. ७0 टक्के पावसाची नोंद झाली आहे. यवतमाळ जिल्हय़ात तर ५५५.२ मि.मी.६५ टक्केच पाऊस झाला आहे. या पाच जिल्हय़ात आतापर्यंत ७२८.८ मि.मी. पाऊस अपेक्षित होता आजमितीस ५६९.३ मि.मी. पाऊस झाला आहे.

उध्र्व वर्धा धरणाचे पाणी सोडणार दरम्यान, अमरावती जिल्हय़ातील उध्र्व वर्धा धरणाची जलाशय पातळी ३४१.८७ मीटर असून,२१ सप्टेंबर रोजी या धरणात ६२२.२९ दशलक्ष घनमिटर ९३ टक्के जलसाठा संचयीत झाला आहे. सप्टेंबर अखेरपर्यंत ३४२.५0 मीटरपर्यंतच धरण भरायचे असल्याने येत्या ४८ तासात धरणातील पाणी नदी पात्रात सोडावे लागणार आहे. त्यामुळे नदीकाठी राहणार्‍या नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन उध्र्व वर्धा धरण उपविभाग २ च्या अभियंत्यांनी केले आहे.

पावसाची तूट !वर्‍हाडात अकोला येथे पावसाची २0 टक्के तूट असून, अमरावती २८ टक्के, यवतमाळ ३२ टक्के, वाशिम २६ टक्के, भंडारा २0 टक्के, गोंदिया ३६ टक्के,चंद्रपूर ३२ टक्के, गडचिरोली येथे २२ टक्के तूट आहे.

९६ टक्के पेरणीया विभागात सरासरी ९६ टक्के पेरणी झाली आहे. यामध्ये अर्धरब्बी, रब्बीचेही पीक आहे. बुलडाणा जिल्हय़ात ९८ टक्के, अकोला ९0 टक्के, वाशिम ९७ टक्के, अमरावती ९३ तर यवतमाळ जिल्हय़ात १0१ टक्के पेरणी झालेली आहे.-

अकोला आरटीओला अवैधरीत्या जमीन वाटपलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अकोला येथे मुलींच्या शाळेकरिता राखीव जमीन प्रादेशिक परिवहन कार्यालयासाठी देण्याच्या निर्णयाविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. न्यायालयाने राज्य शासन व महानगरपालिकेला नोटीस बजावून यावर ३ ऑक्टोबरपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. गिरधर हिरवानी असे याचिकाकर्त्याचे नाव आहे. रेल्वे मालधक्का परिसरात नझुल शीट क्र. ४९-अ मधील प्लॉट क्र. ११/१ व १३/१ हे भूखंड मुलींच्या शाळेकरिता राखीव आहेत. महानगरपालिकेने हे भूखंड प्रादेशिक परिवहन कार्यालयासाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. ही जमीन महसूल विभागाची आहे. असे असताना वादग्रस्त निर्णयापूर्वी महसूल विभागाची परवानगी घेण्यात आली नाही. त्यामुळे निर्णय अवैध असून तो रद्द करण्यात यावा असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. याचिकाकर्त्यातर्फे अँड. शंतनू खेडकर यांनी बाजू मांडली.