शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
5
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
6
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
7
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
8
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
9
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
10
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
11
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
12
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
14
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
15
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
16
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
17
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
18
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
19
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
20
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश

वर्‍हाडात आतापर्यंत ७८ टक्के पाऊस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 01:41 IST

अकोला : राज्यातील अनेक भागात धो-धो पाऊस सुरू  असताना वर्‍हाडातील (पश्‍चिम विदर्भ)पाच जिल्हय़ात अद्याप पूरक   पाऊस न झाल्याने मोठे, मध्यम व लघु प्रकल्पाच्या जलपातळीत अपेक्षित वाढ झाली नाही. या सर्व धरणांत आजमितीस ४२ टक्के जलसाठा आहे. तसेच पावसाळ्य़ाच्या चार महिन्यांत आतापर्यंत ७८ टक्के पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान,अधून-मधून पडणारा पाऊस  पिकांना संजीवनी देणारा ठरला आहे.

ठळक मुद्देमोठे, मध्यम, लघु प्रकल्पात एकूण ४२.१६ टक्के जलसाठा अप्पर वर्धाचे पाणी सोडणार

राजरत्न सिरसाट । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : राज्यातील अनेक भागात धो-धो पाऊस सुरू  असताना वर्‍हाडातील (पश्‍चिम विदर्भ)पाच जिल्हय़ात अद्याप पूरक   पाऊस न झाल्याने मोठे, मध्यम व लघु प्रकल्पाच्या जलपातळीत अपेक्षित वाढ झाली नाही. या सर्व धरणांत आजमितीस ४२ टक्के जलसाठा आहे. तसेच पावसाळ्य़ाच्या चार महिन्यांत आतापर्यंत ७८ टक्के पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान,अधून-मधून पडणारा पाऊस  पिकांना संजीवनी देणारा ठरला आहे.यावर्षी सुरुवातीपासून पावसाने वर्‍हाडाकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे पेरण्यांनाही एक ते दीड महिने उशीर झाला आहे. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला पाऊस पडला, त्यानंतर दीर्घ खंड पडला. सप्टेंबर महिन्यात अधून-मधून पाऊस होत आहे. त्यामुळे धरणांच्या एकदमच खालावलेल्या स्थितीत अल्पशी सुधारणा झाली आहे.वर्‍हाडात नऊ मोठे सिंचन प्रकल्प असून, त्यामध्ये आजमितीस ५१.0९ टक्के जलसाठा आहे. तसेच २३ मध्यम प्रकल्प आहेत, त्यामध्ये ४३.८0 टक्के जलसाठा उपलब्ध आहे.तर ४५२ लघु प्रकल्प आहेत.त्यात २७.९२ टक्के जलसाठा आहे. या सर्व जलसाठय़ाची सरासरी टक्केवारी ही ४२.१६ टक्के एवढी आहे. विशेष म्हणजे बुलडाणा जिल्हय़ात बर्‍यापैकी पाऊस झाल्याने खडकपूर्णा धरणात शून्य टक्के जलसाठा होता तो ५.५ टक्के एवढा वाढला आहे.दरम्यान, १ जून ते २१ सप्टेंबरपर्यंत ७८ टक्के पावसाची नोंद झाली असून, बुलडाणा जिल्हय़ात आतापर्यंत ६२३ मि.मी.अपेक्षित होता, येथे ६४५.७ मि.मी. म्हणजे १0४ टक्के पाऊस झाला आहे. अकोला जिल्हय़ात ५३३.६ मि.मी. ८२ टक्के पाऊस झाला आहे. वाशिम जिल्ह्यात ५७६.९ मि.मी. ७८ टक्के पावसाची नोंद झाली आहे. अमरावती जिल्हय़ात ५३४.९ मि.मी. ७0 टक्के पावसाची नोंद झाली आहे. यवतमाळ जिल्हय़ात तर ५५५.२ मि.मी.६५ टक्केच पाऊस झाला आहे. या पाच जिल्हय़ात आतापर्यंत ७२८.८ मि.मी. पाऊस अपेक्षित होता आजमितीस ५६९.३ मि.मी. पाऊस झाला आहे.

उध्र्व वर्धा धरणाचे पाणी सोडणार दरम्यान, अमरावती जिल्हय़ातील उध्र्व वर्धा धरणाची जलाशय पातळी ३४१.८७ मीटर असून,२१ सप्टेंबर रोजी या धरणात ६२२.२९ दशलक्ष घनमिटर ९३ टक्के जलसाठा संचयीत झाला आहे. सप्टेंबर अखेरपर्यंत ३४२.५0 मीटरपर्यंतच धरण भरायचे असल्याने येत्या ४८ तासात धरणातील पाणी नदी पात्रात सोडावे लागणार आहे. त्यामुळे नदीकाठी राहणार्‍या नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन उध्र्व वर्धा धरण उपविभाग २ च्या अभियंत्यांनी केले आहे.

पावसाची तूट !वर्‍हाडात अकोला येथे पावसाची २0 टक्के तूट असून, अमरावती २८ टक्के, यवतमाळ ३२ टक्के, वाशिम २६ टक्के, भंडारा २0 टक्के, गोंदिया ३६ टक्के,चंद्रपूर ३२ टक्के, गडचिरोली येथे २२ टक्के तूट आहे.

९६ टक्के पेरणीया विभागात सरासरी ९६ टक्के पेरणी झाली आहे. यामध्ये अर्धरब्बी, रब्बीचेही पीक आहे. बुलडाणा जिल्हय़ात ९८ टक्के, अकोला ९0 टक्के, वाशिम ९७ टक्के, अमरावती ९३ तर यवतमाळ जिल्हय़ात १0१ टक्के पेरणी झालेली आहे.-

अकोला आरटीओला अवैधरीत्या जमीन वाटपलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अकोला येथे मुलींच्या शाळेकरिता राखीव जमीन प्रादेशिक परिवहन कार्यालयासाठी देण्याच्या निर्णयाविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. न्यायालयाने राज्य शासन व महानगरपालिकेला नोटीस बजावून यावर ३ ऑक्टोबरपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. गिरधर हिरवानी असे याचिकाकर्त्याचे नाव आहे. रेल्वे मालधक्का परिसरात नझुल शीट क्र. ४९-अ मधील प्लॉट क्र. ११/१ व १३/१ हे भूखंड मुलींच्या शाळेकरिता राखीव आहेत. महानगरपालिकेने हे भूखंड प्रादेशिक परिवहन कार्यालयासाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. ही जमीन महसूल विभागाची आहे. असे असताना वादग्रस्त निर्णयापूर्वी महसूल विभागाची परवानगी घेण्यात आली नाही. त्यामुळे निर्णय अवैध असून तो रद्द करण्यात यावा असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. याचिकाकर्त्यातर्फे अँड. शंतनू खेडकर यांनी बाजू मांडली.