शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्यातील ७५ टक्के विद्यार्थी भागाकारात ‘ढ’ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 12:31 IST

अकोला : चाचणीच्या पहिल्या टप्प्यात ७५ टक्के विद्यार्थी भागाकारात ‘ढ’ असल्याचे दिसून आले आहे, तर ७६ टक्के विद्यार्थ्यांना उतारा वाचन, समजपूर्वक वाचन येत नसल्याचे या चाचणीतून उघड झाले.

ठळक मुद्देदुसरी ते आठवीतील २५.५८ टक्केच विद्यार्थ्यांनाच भागाकार येत असल्याचे दिसून आले.एवढेच नाही, तर गणितासोबतच विद्यार्थी वाचनातही कच्चे असल्याचे दिसून आले. केवळ २४.१७ टक्के विद्यार्थ्यांनाच वाचन येते. उर्वरित ७५.८३ टक्के विद्यार्थ्यांना साधे वाचताही येत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

- नितीन गव्हाळेअकोला : शालेय विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीस लागण्यासाठी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेने जिल्ह्यातील इयत्ता दुसरी ते आठवीतील विद्यार्थ्यांची २८ ते ३१ आॅगस्ट या कालावधीत शालेय स्तरावर पायाभूत चाचणी घेतली होती. चाचणीच्या पहिल्या टप्प्यात ७५ टक्के विद्यार्थी भागाकारात ‘ढ’ असल्याचे दिसून आले आहे, तर ७६ टक्के विद्यार्थ्यांना उतारा वाचन, समजपूर्वक वाचन येत नसल्याचे या चाचणीतून उघड झाले आहे; परंतु अंतिम फेरीपर्यंत विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिक्षण विभागाला दिलेल्या ‘केआरए’नुसार देशपातळीवर मूल्यमापनात महाराष्ट्राचा प्रथम तीन क्रमांकामध्ये समावेश करण्याचे टार्गेट दिले आहे. त्यानुसार यंदा अध्ययन निष्पत्तीवर आधारित पायाभूत चाचणी ही राज्य मंडळाशी संलग्न शाळांमधील इयत्ता दुसरी ते आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आली. या चाचणीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची प्रगती किती झाली, विद्यार्थी कोणत्या अध्ययन निष्पत्तीमध्ये कमी पडतो आहे, हे तपासण्यात येत आहे. जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेच्या माध्यमातून प्राथमिक शाळांमध्ये घेण्यात आलेल्या पायाभूत चाचणीच्या पहिल्या टप्यात इयत्ता दुसरी ते आठवीतील २५.५८ टक्केच विद्यार्थ्यांनाच भागाकार येत असल्याचे दिसून आले. यावरून ७५ टक्के विद्यार्थ्यांना अद्यापही भागाकार येत नसल्याचे वास्तव या चाचणीतून समोर आले आहे. एवढेच नाही, तर गणितासोबतच विद्यार्थी वाचनातही कच्चे असल्याचे दिसून आले. केवळ २४.१७ टक्के विद्यार्थ्यांनाच वाचन येते. उर्वरित ७५.८३ टक्के विद्यार्थ्यांना साधे वाचताही येत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.गतवर्षीच्या तुलनेत यंदाची कामगिरी सुमार!गतवर्षी घेण्यात आलेल्या पायाभूत चाचणीमध्ये पहिल्या टप्प्यात दुसरी ते आठवीतील ३५ टक्के विद्यार्थ्यांना भागाकार येत होता आणि ३४ टक्के विद्यार्थ्यांना वाचता येत होते. अंतिम टप्प्यात त्यात सुधारणा होऊन ६९.५८ विद्यार्थ्यांना भागाकाराचे गणित जुळविता आले आणि ६५.७३ टक्के विद्यार्थ्यांना वाचता आले.पायाभूत चाचणीतून विद्यार्थ्यांचा अध्ययन स्तर समजतो. त्याला गणित, वाचन येते की नाही, ज्यांना भागाकार, वजाबाकी, गुणाकारासोबतच उतारा वाचन, समजपूर्वक वाचन येत नाही, अशा विद्यार्थ्यांकडे प्रकर्षाने लक्ष देऊन त्याच्या गुणवत्ता वाढीसाठी विशेष प्रयत्न केले जातात. यासाठी शिक्षकांनी प्रामाणिकपणे काम करण्याची गरज आहे.-डॉ. राम सोनारे, अधिव्याख्याता,जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था.

 

टॅग्स :AkolaअकोलाStudentविद्यार्थीEducationशिक्षण