शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
16
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
17
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
18
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
19
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
20
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय

अकोला जिल्ह्यातील ७५ टक्के विद्यार्थी भागाकारात ‘ढ’ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 12:31 IST

अकोला : चाचणीच्या पहिल्या टप्प्यात ७५ टक्के विद्यार्थी भागाकारात ‘ढ’ असल्याचे दिसून आले आहे, तर ७६ टक्के विद्यार्थ्यांना उतारा वाचन, समजपूर्वक वाचन येत नसल्याचे या चाचणीतून उघड झाले.

ठळक मुद्देदुसरी ते आठवीतील २५.५८ टक्केच विद्यार्थ्यांनाच भागाकार येत असल्याचे दिसून आले.एवढेच नाही, तर गणितासोबतच विद्यार्थी वाचनातही कच्चे असल्याचे दिसून आले. केवळ २४.१७ टक्के विद्यार्थ्यांनाच वाचन येते. उर्वरित ७५.८३ टक्के विद्यार्थ्यांना साधे वाचताही येत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

- नितीन गव्हाळेअकोला : शालेय विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीस लागण्यासाठी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेने जिल्ह्यातील इयत्ता दुसरी ते आठवीतील विद्यार्थ्यांची २८ ते ३१ आॅगस्ट या कालावधीत शालेय स्तरावर पायाभूत चाचणी घेतली होती. चाचणीच्या पहिल्या टप्प्यात ७५ टक्के विद्यार्थी भागाकारात ‘ढ’ असल्याचे दिसून आले आहे, तर ७६ टक्के विद्यार्थ्यांना उतारा वाचन, समजपूर्वक वाचन येत नसल्याचे या चाचणीतून उघड झाले आहे; परंतु अंतिम फेरीपर्यंत विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिक्षण विभागाला दिलेल्या ‘केआरए’नुसार देशपातळीवर मूल्यमापनात महाराष्ट्राचा प्रथम तीन क्रमांकामध्ये समावेश करण्याचे टार्गेट दिले आहे. त्यानुसार यंदा अध्ययन निष्पत्तीवर आधारित पायाभूत चाचणी ही राज्य मंडळाशी संलग्न शाळांमधील इयत्ता दुसरी ते आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आली. या चाचणीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची प्रगती किती झाली, विद्यार्थी कोणत्या अध्ययन निष्पत्तीमध्ये कमी पडतो आहे, हे तपासण्यात येत आहे. जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेच्या माध्यमातून प्राथमिक शाळांमध्ये घेण्यात आलेल्या पायाभूत चाचणीच्या पहिल्या टप्यात इयत्ता दुसरी ते आठवीतील २५.५८ टक्केच विद्यार्थ्यांनाच भागाकार येत असल्याचे दिसून आले. यावरून ७५ टक्के विद्यार्थ्यांना अद्यापही भागाकार येत नसल्याचे वास्तव या चाचणीतून समोर आले आहे. एवढेच नाही, तर गणितासोबतच विद्यार्थी वाचनातही कच्चे असल्याचे दिसून आले. केवळ २४.१७ टक्के विद्यार्थ्यांनाच वाचन येते. उर्वरित ७५.८३ टक्के विद्यार्थ्यांना साधे वाचताही येत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.गतवर्षीच्या तुलनेत यंदाची कामगिरी सुमार!गतवर्षी घेण्यात आलेल्या पायाभूत चाचणीमध्ये पहिल्या टप्प्यात दुसरी ते आठवीतील ३५ टक्के विद्यार्थ्यांना भागाकार येत होता आणि ३४ टक्के विद्यार्थ्यांना वाचता येत होते. अंतिम टप्प्यात त्यात सुधारणा होऊन ६९.५८ विद्यार्थ्यांना भागाकाराचे गणित जुळविता आले आणि ६५.७३ टक्के विद्यार्थ्यांना वाचता आले.पायाभूत चाचणीतून विद्यार्थ्यांचा अध्ययन स्तर समजतो. त्याला गणित, वाचन येते की नाही, ज्यांना भागाकार, वजाबाकी, गुणाकारासोबतच उतारा वाचन, समजपूर्वक वाचन येत नाही, अशा विद्यार्थ्यांकडे प्रकर्षाने लक्ष देऊन त्याच्या गुणवत्ता वाढीसाठी विशेष प्रयत्न केले जातात. यासाठी शिक्षकांनी प्रामाणिकपणे काम करण्याची गरज आहे.-डॉ. राम सोनारे, अधिव्याख्याता,जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था.

 

टॅग्स :AkolaअकोलाStudentविद्यार्थीEducationशिक्षण