शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

मूर्तिजापूरात नोंदणी ७ हजार शेतकऱ्यांची; माल विकला २ हजार शेतकऱ्यांनी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2020 11:03 IST

Agriculture Sector, Akola Farmer शेतकऱ्यांनी ई-नाम योजनेकडे  पाठ फिरविली आहे.

- संजय उमक लोकमत न्यूज नेटवर्कमूर्तिजापूर : केंद्र शासनाने शेतकऱ्यांचा धान्य माल ई- लिलावानुसार खरेदी करण्यासाठी १४ एप्रिल २०१६ पासून ई-नाम योजना सुरू केली आहे. ही योजना येथील बाजार समितीने अमलात आणली असली तरी शेतकऱ्यांनी याकडे  पाठ फिरविली आहे. तर या योजनेपासून अनेक शेतकरी अनभिज्ञ आहेत. यामुळे शेतकऱ्यांनी पारंपरिक लिलावालाच पसंती दर्शवली आहे.आतापर्यंत ई-नाम योजनेंतर्गत मूर्तिजापूर बाजार समितीत ७ हजार ९४८ शेतकऱ्यांनी आपली नोंदणी केली आहे. पैकी केवळ २ हजार ४७० शेतकऱ्यांनी आपला माल विकला आहे. यासाठी ८७ अडते व ५९ व्यापाऱ्यांनीही आपली नोंदणी केली आहे. या योजनेत माल विक्रीसाठी कमालीचा वेळ लागतो व कुठल्याही व्यापाºयाला कुठेही माल खरेदी करण्याची मुभा असल्याने अनोळखी व्यापाºयाकडून विक्री रक्कम मिळेल याची हमी नाही.पारंपरिक लिलावात ठरलेल्या व्यापाºयाकडून आगाऊ रक्कम घेण्याची प्रथा असल्याने ज्या दिवशी माल विकल्या जाईल, त्या दिवशी रक्कम कपात होते. शेतकºयांची ही अडचण व्यापारी भागवित असल्याने पारंपरिक लिलावच शेतकºयांसाठी सोईचा असल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे.या योजनेंतर्गत बाजार समितीमध्ये शेतमालाच्या पारंपरिक बोली पद्धतीचे लिलाव बंद करून त्याऐवजी आॅनलाइन लिलावासाठी ई-नाम हे व्यापार पोर्टल तयार करण्यात आले. सरकारने यासाठी बाजार समितीला ३० लाख रुपये किमतीचे संगणक, प्रिंटर, राउटर यांच्या खरेदीसह शेतमालाच्या गुणवत्ता व आर्द्रता तपासणीसाठी प्रयोगशाळा उभारण्यात आली. मिळविलेले अनेक साहित्य या बाजार समितीसाठी निरुपयोगी ठरले.

अशी आहे ई-नाम योजनाई-नाम (इंटरनॅशनल अ‍ॅग्रीकल्चर मार्केटिंग) या योजनेत मालाची गुणवत्ता तपासणी केली जाते. तो अहवाल शेतकºयाला मिळतो. शेतमालाचा फोटो पोर्टलवर अपलोड केला जातो. त्यानंतर मोबाइल अ‍ॅपवरून देशातील कोणताही व्यापारी कुठेही बसून लिलावात भाग घेऊ शकतो. व्यापारी आणि शेतकºयांना ही प्रक्रिया आनलाइन दिसते. शेतकरी मिळणाºया दराबाबत समाधानी असेल तरच मालाची खरेदी-विक्री होते. या लिलाव प्रक्रियेत अडते आणि मध्यस्थ नाहीत. मालाचे वजन झाल्यानंतर प्रत्यक्षात अडत्याला त्याचा ताबा मिळण्यापूर्वीच शेतकºयाच्या खात्यावर आॅनलाइन पैसे जमा केले जातात. देशातील कोणत्याही बाजारात मालाची विक्री करता येते.केंद्र शासनाच्या ई-नाम योजनेत बाजार समिती दुसºया टप्प्यात आहे. सद्यस्थितीत शेतकºयांची नोंदणी करणे व त्यांच्या मालाचा ई-लिलाव करण्यासाठी बाजार समिती प्रयत्नरत आहे.- रितेश मडगे, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, मूर्तिजापूर

 

 

टॅग्स :Murtijapurमुर्तिजापूरAkolaअकोलाAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती