६६0 नव्या गाड्या टाकणार शहराच्या प्रदूषणात भर!
By Admin | Updated: April 3, 2017 02:53 IST2017-04-03T02:53:02+5:302017-04-03T02:53:02+5:30
हा स्वत:शी आणि निसर्गाशी खेळ नाही का?

६६0 नव्या गाड्या टाकणार शहराच्या प्रदूषणात भर!
अकोला, दि. २- मानवी स्वभाव किती स्वार्थी होतोय बघा.. आपण नेहमी वाढत्या प्रदूषणाविरोधात बोलतो, सरकारला दोष देतो, वेळ आली तर न्यायालयाच्या निर्णयावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करतो; परंतु विषय जेव्हा स्वहिताचा असतो, तेव्हा मात्र सामाजिक बांधीलकी विसरून केवळ आपल्या फायद्याचाच विचार करतो. याचा पुन्हा एक वाईट अनुभव बीएस-३ सारख्या नाकारलेल्या वाहनांच्या खरेदीनंतर आला आहे. बॅन असलेल्या ६६0 नव्या गाड्या शहराच्या प्रदूषणात आणखी भर टाकणार असल्याने, केवळ स्वार्थासाठी काहींनी डिस्काउंटवर ह्यमरणह्ण घेतले असल्याचे स्पष्ट होत आहे.
या सर्व गाड्या पुढील दहा-वीस वर्षे अक्षरश: प्रदूषण ओकणार आहेत; मात्र हे सर्व माहिती असताना केवळ काही पैशांच्या लालसेपोटी त्या गाड्या खरेदीसाठी आपण उड्या मारल्या आणि एका दिवसात निर्बंंंध घालण्यात आलेल्या हजारो गाड्यांची खरेदी केली. हा स्वत:शी आणि निसर्गाशी खेळ असल्याने, या ज्वलंत प्रश्नावर ह्यलोकमतह्णने समाजातील पर्यावरण तज्ज्ञ आणि डॉक्टरांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या असता, सर्वांंंनी समाजाच्या या स्वार्थी वृत्तीचा विरोध केला. भारत स्टेज-३ (बीएस-३) या गाड्यांवर सर्वोच्च न्यायालयाने बंदी घालताच, विविध कंपन्यांनी आपल्या डीलर्सच्या माध्यमातून ग्राहकांना डिस्काउंटचे प्रलोभन दाखवून या सर्व गाड्यांची विक्री केली. लोकांनीसुद्धा त्या प्रलोभनाला बळी पडत, गाड्यांच्या खरेदीसाठी रांगा लावल्या. अकोला शहरात एका दिवसात ६६0 गाड्यांची विक्री झाली. यात लोकांना निश्चितच १0 ते १५ हजार रुपयांचा फायदा झाला आहे; मात्र त्या लालसेपोटी संपूर्ण शहराचे आरोग्य धोक्यात टाकले. त्यामुळे भविष्यात या गाड्यांमधून होणार्या प्रदूषणाला जबाबदार कोण राहणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
प्रदूषणाबाबतीत अकोला शहराची काय स्थिती आहे, हे सर्वज्ञात आहे. त्यात या नव्या गाड्या आणखी भर घालणार आहेत. सर्वोच्च न्यायालयानेसुद्धा आपला देश आणि समाजाचे हित लक्षात घेऊनच हा निर्णय दिला आहे; मात्र असे असतानासुद्धा बॅन असलेल्या गाड्या खरेदी करून, सर्वोच्च न्यायालयाच्या अपेक्षांवर पाणी फेरले आहे.