शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

दोन वर्षात ६३ भूमिहीन झाले जमीनदार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2020 10:08 IST

Akola Farmer News दारिद्र्य रेषेखालील ६३ भूमिहीन लाभार्थींना जमिनीचा लाभ देण्यात आला आहे.

ठळक मुद्देकर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण स्वाभिमान योजनेचा लाभ

अकोला: कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान याेजनेंतर्गत २०१७-१८ व २०१८-१९ या दोन आर्थिक वर्षात जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबाैद्ध प्रवर्गातील दारिद्र्य रेषेखालील ६३ भूमिहीन लाभार्थींना जमिनीचा लाभ देण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात ६३ भूमिहीन जमीनदार झाले आहेत.

शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत अनुसूचित जाती व नवबाैद्ध प्रवर्गातील दारिद्र्य रेषेखालील भूमिहीन व्यक्तींना चार एकरपर्यंत कोरडवाहू आणि दोन एकरपर्यंत बागायत शेतजमीन वाटप करण्यात येते. सामाजिक न्याय विभागाच्या जिल्हा कार्यालयामार्फत शासकीय दराने जमीन खरेदी करण्यात येते आणि जमीन खरेदी करण्यात आलेल्या गाव परिसरातील भूमिहीन लाभार्थींना जमिनीचे वाटप करण्यात येते. या योजनेंतर्गत २०१७-१८ व २०१८-१९ या दोन आर्थिक वर्षात जिल्ह्यात ६३ भूमिहीन व्यक्तींना १८९ एकर जमीन वाटप करण्यात आली. २०१९-२० या आर्थिक वर्षात भूमिहीन लाभार्थींना जमीन वाटप करण्यासाठी ४४ एकर जमीन खरेदी करण्यात आली; मात्र कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जमीन वाटप करण्यासाठी भूमिहीन लाभार्थींची निवड अद्याप होऊ शकली नाही; परंतु २०१७-१८ व २०१८-१९ या दोन वर्षात योजनेंतर्गत जमिनीचा लाभ मिळाल्याने जिल्ह्यात ६३ भूमिहीन व्यक्ती जमीनदार झाले आहेत.

 

 

 

दोन वर्षातील जमिनींचा लाभ झालेले भूमिहीन!

२०१७-१८ : ४५

२०१८-१९ : १८

 

चालू आर्थिक वर्षासाठी जिल्ह्यात तरतूद उपलब्ध नाही!

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत २०२०-२१ या चालू आर्थिक वर्षात भूमिहीन व्यक्तींना जमीन वाटप करण्याकरिता शासकीय दराने जमीन खरेदीसाठी जिल्ह्यात तरतूद उपलब्ध नाही. त्यानुषंगाने सामाजिक न्याय विभागाच्या जिल्हा कार्यालयामार्फत निधीची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे.

 

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत २०१७-१८ व २०१८-१९ या दोन वर्षात जिल्ह्यात ६३ भूमिहीन लाभार्थींना जमिनीचे वाटप करण्यात आले आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर २०१९-२० या आर्थिक वर्षात जमिनीचे वाटप करण्यासाठी भूमिहीन लाभार्थींची निवड प्रक्रिया बाकी आहे. २०२०-२१ या वर्षासाठी निधीची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे.

- माया केदार

प्रभारी सहायक उपायुक्त, सामाजिक न्याय विभाग, अकोला.

टॅग्स :AkolaअकोलाSocialसामाजिकFarmerशेतकरीgovernment schemeसरकारी योजना