शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

दोन वर्षात ६३ भूमिहीन झाले जमीनदार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2020 10:08 IST

Akola Farmer News दारिद्र्य रेषेखालील ६३ भूमिहीन लाभार्थींना जमिनीचा लाभ देण्यात आला आहे.

ठळक मुद्देकर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण स्वाभिमान योजनेचा लाभ

अकोला: कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान याेजनेंतर्गत २०१७-१८ व २०१८-१९ या दोन आर्थिक वर्षात जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबाैद्ध प्रवर्गातील दारिद्र्य रेषेखालील ६३ भूमिहीन लाभार्थींना जमिनीचा लाभ देण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात ६३ भूमिहीन जमीनदार झाले आहेत.

शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत अनुसूचित जाती व नवबाैद्ध प्रवर्गातील दारिद्र्य रेषेखालील भूमिहीन व्यक्तींना चार एकरपर्यंत कोरडवाहू आणि दोन एकरपर्यंत बागायत शेतजमीन वाटप करण्यात येते. सामाजिक न्याय विभागाच्या जिल्हा कार्यालयामार्फत शासकीय दराने जमीन खरेदी करण्यात येते आणि जमीन खरेदी करण्यात आलेल्या गाव परिसरातील भूमिहीन लाभार्थींना जमिनीचे वाटप करण्यात येते. या योजनेंतर्गत २०१७-१८ व २०१८-१९ या दोन आर्थिक वर्षात जिल्ह्यात ६३ भूमिहीन व्यक्तींना १८९ एकर जमीन वाटप करण्यात आली. २०१९-२० या आर्थिक वर्षात भूमिहीन लाभार्थींना जमीन वाटप करण्यासाठी ४४ एकर जमीन खरेदी करण्यात आली; मात्र कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जमीन वाटप करण्यासाठी भूमिहीन लाभार्थींची निवड अद्याप होऊ शकली नाही; परंतु २०१७-१८ व २०१८-१९ या दोन वर्षात योजनेंतर्गत जमिनीचा लाभ मिळाल्याने जिल्ह्यात ६३ भूमिहीन व्यक्ती जमीनदार झाले आहेत.

 

 

 

दोन वर्षातील जमिनींचा लाभ झालेले भूमिहीन!

२०१७-१८ : ४५

२०१८-१९ : १८

 

चालू आर्थिक वर्षासाठी जिल्ह्यात तरतूद उपलब्ध नाही!

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत २०२०-२१ या चालू आर्थिक वर्षात भूमिहीन व्यक्तींना जमीन वाटप करण्याकरिता शासकीय दराने जमीन खरेदीसाठी जिल्ह्यात तरतूद उपलब्ध नाही. त्यानुषंगाने सामाजिक न्याय विभागाच्या जिल्हा कार्यालयामार्फत निधीची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे.

 

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत २०१७-१८ व २०१८-१९ या दोन वर्षात जिल्ह्यात ६३ भूमिहीन लाभार्थींना जमिनीचे वाटप करण्यात आले आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर २०१९-२० या आर्थिक वर्षात जमिनीचे वाटप करण्यासाठी भूमिहीन लाभार्थींची निवड प्रक्रिया बाकी आहे. २०२०-२१ या वर्षासाठी निधीची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे.

- माया केदार

प्रभारी सहायक उपायुक्त, सामाजिक न्याय विभाग, अकोला.

टॅग्स :AkolaअकोलाSocialसामाजिकFarmerशेतकरीgovernment schemeसरकारी योजना