सर्पदंशाने ४५ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:56 IST2021-01-08T04:56:45+5:302021-01-08T04:56:45+5:30
मूर्तिजापूर : अनभोरा-शेरवाडी शेत शिवारात असलेल्या शेतात तुषार सिंचन पाइपलाइन उचलताना १ जानेवारी रोजी विषारी सर्पदंश झाल्याने अनभोरा येथील ...

सर्पदंशाने ४५ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू
मूर्तिजापूर : अनभोरा-शेरवाडी शेत शिवारात असलेल्या शेतात तुषार सिंचन पाइपलाइन उचलताना १ जानेवारी रोजी विषारी सर्पदंश झाल्याने अनभोरा येथील शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दिनकर महादेवराव टाले (४५, रा. अनभोरा) असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
तालुक्यातील अनभोरा येथील शेतकरी दिनकर टाले शुक्रवार १ जानेवारी रोजी शेतात तुषार सिंचन पाइपलाइन उचलण्याचे काम करीत होते. दरम्यान, त्यांना विषारी सापाने दंश केला. त्यामुळे उपचारासाठी त्यांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, प्रकृती अधिकच खालावल्याने त्यांचा सोमवार ४ जानेवारी रोजी संध्याकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली आहेत.