शहरं
Join us  
Trending Stories
1
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
2
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
3
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
4
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
5
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
6
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
7
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
8
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
9
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
10
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
11
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
12
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
13
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
14
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
15
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
16
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
17
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
18
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
19
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
20
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत

शहरातील २८ विहिरी गायब; विहिरी बुजवून उभारली घरे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:41 IST

आज शहरवासीयांना महान येथील धरणातून पाणीपुरवठा केला जाताे. सुमारे २५ वर्षांपूर्वी शहराच्या विविध भागातील नागरिकांकडे विहिरी उपलब्ध हाेत्या. मनपाची ...

आज शहरवासीयांना महान येथील धरणातून पाणीपुरवठा केला जाताे. सुमारे २५ वर्षांपूर्वी शहराच्या विविध भागातील नागरिकांकडे विहिरी उपलब्ध हाेत्या. मनपाची २०१६ मध्ये हद्दवाढ झाल्यानंतर शहरालगतच्या १३ ग्रामपंचायतींसह २४ गावांचा मनपात समावेश झाला. यावेळी संबंधित भागात स्थानिक रहिवाशांकडे विहिरी उपलब्ध असल्याची मनपाकडे नाेंद आहे. दरम्यान, काही वर्षांपासून शहरातील सुमारे २८ पेक्षा अधिक विहिरी गायब झाल्याची माहिती आहे. काही विहिरींना पाणी नसल्यामुळे तसेच काही विहिरींचा घर बांधकाम करताना अडथळा ठरत असल्याने त्या बुजविण्यात आल्या आहेत. विहिरींमधून पाणी उपसा करताना अनेक समस्या निर्माण हाेत असल्यानेही रहिवाशांनी सबमर्सिबल पंपांचा पर्याय निवडला आहे.

हे घ्या पुरावे!

१) कधीकाळी सातव चाैक, बिर्ला काॅलनी, जठारपेठ आदी भागातील रहिवाशांची तहान भागविण्यासाठी दादासाहेब दिवेकर चाैकात भलीमाेठी विहीर हाेती. कालांतराने घराेघरी नळ कनेक्शन तसेच हातपंप, सबमर्सिबल पंपांची संख्या वाढल्याने नागरिकांनी या विहिरीकडे पाठ फिरवली. त्यामुळे या विहिरीवर साैंदर्यीकरण करून ती तात्पुरती बुजविण्यात आली.

२) जुने शहरातील डाबकी राेड भागात एका नामवंत शैक्षणिक संस्थेच्या आवारात माेठी विहीर हाेती. पाण्याचा स्त्राेत आटल्याने ही विहीर विद्यार्थ्यांसाठी धाेकादायक ठरू लागली हाेती. संस्थेने ती बुजवत त्यावर साैंदर्यीकरण केले आहे.

३) डाबकी राेड भागातील प्रभाग क्रमांक ८ मधील लक्ष्मीनगरमध्ये नागरिकांच्या सार्वजनिक वापरासाठी विहीर बांधण्यात आली हाेती. अतिशय काेरीव दगडी बांधकामातील ही विहीर अनेकांचे लक्ष वेधून घेत हाेती. पाण्याचा स्त्राेत आटल्याने ती १९९३ मध्ये बुजविण्यात येऊन त्यावर घर बांधण्यात आले.

सहकारनगरमधील विहीर धाेकादायक

गाेरक्षण राेड भागातील सहकारनगरमध्ये मुख्य रस्त्यालगतच भलीमाेठी विहीर आहे. २५ वर्षांपूर्वी यातून पाण्याचा उपसा केला जात हाेता. आज ही विहीर स्थानिक रहिवाशांसाठी धाेकादायक बनली आहे. विहिरीच्या आजूबाजूला कठडे नसल्याने या ठिकाणी माेठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मनपासह पदाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

शहरात २००४ मध्ये दुष्काळग्रस्त स्थिती हाेती. तेव्हा संकटसमयी नागरिकांनी विहिरीतूनच पाण्याचा उपसा करून तहान भागवली हाेती. अशा विहिरींना जीवंत ठेवण्याची गरज असताना त्या बुजविण्यात आल्या. याला मनपा प्रशासनासह पदाधिकाऱ्यांचे धाेरण कारणीभूत आहे.

- शंतनू मानतकर, पर्यावरणप्रेमी

भूजल पातळी माेठ्या प्रमाणात घसरल्यामुळे विहिरीतील पाण्याचे स्त्राेत आटले. अशा विहिरींचा वापर कचरा टाकण्यासाठी करण्यात आला. काहींनी त्यावर घरे बांधली. अस्तित्वात असलेल्या विहिरींचे जतन करणे गरजेचे आहे.

- शुभम काेगदे, पर्यावरणप्रेमी

शहरात २५ ते ३० वर्षांपूर्वी विहिरींची माेठी संख्या हाेती. पाण्याचे स्त्राेत कमी झाल्याने नागरिकांनी हातपंप, सबमर्सिबल पंपचा पर्याय निवडला. पूर्व झाेनमधील धाेकादायक ठरणाऱ्या विहिरींभोवती कठडे उभारले जातील.

- विजय पारतवार, क्षेत्रीय अधिकारी, पूर्व झाेन