शहरं
Join us  
Trending Stories
1
Supreme Court: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर टांगती तलवार, आरक्षणाच्या मर्यादेवर आज सुनावणी!
2
Mahayuti: एकमेकांचे माजी नगरसेवक, पदाधिकारी पळवण्यावरून महायुतीत घमासान! 
3
Government Decision: 'नोटरी'वर झालेले जमीन व्यवहारही आता कायदेशीर; ३ कोटी नागरिकांना मोठा दिलासा
4
एकाचवेळा तीन बिबट्यांच्या घराला घिरट्या; शिकारीच्या शोधात आलेले सीसीटीव्ही कॅमेरात कैद 
5
अल-फलाह विद्यापीठाचा संस्थापक जावेद सिद्दीकीवर मोठी कारवाई; ईडीने केली अटक! मनी लॉन्ड्रिंग, घोटाळ्याचा आरोप
6
मोठी दुर्घटना: पुलावरच दोन बसची समोरासमोर धडक; एका नेपाळी महिलेचा मृत्यू, ३५ हून अधिक प्रवासी जखमी
7
आजचा अग्रलेख: हसीना यांना पुन्हा सांभाळा !
8
राज ठाकरेंनी फटकारले, पिट्याभाईने मनसेलाच सोडले; नाराज रमेश परदेशीचा भाजपमध्ये प्रवेश 
9
Asia Cup Rising Stars 2025 : विदर्भकराची मॅच विनिंग फिफ्टी! भारतीय संघाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
10
डॉ. उमरला करायचा होता 9/11 सारखा घातपात, पण मुजम्मिल सोबत झाले मतभेद अन् फेल झाला संपूर्ण मनसुबा!
11
ऑटोमोबाईल क्षेत्रातील चमत्कार! होंडाकडे आहे जगातील सर्वात 'स्वस्त' प्रायव्हेट जेट; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये
12
चीन-जपानमध्ये अचानक तणाव वाढला, युद्धाच्या उंबरठ्यावर; जपानच्या दूताने बिजिंग सोडले...
13
दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीला साबरमती तुरुंगात कैद्यांकडून मारहाण; एटीएस, पोलिसांत उडाली खळबळ 
14
"८-९ महिन्यापूर्वी उदय सामंत यांच्यासह एकनाथ शिंदे यांचे २० आमदार फुटत होते, पण...!"; शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा मोठा गौप्यस्फोट
15
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद
16
मुळशी पॅटर्न फेम 'पिट्या भाई' भाजपात जाणार? राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पुन्हा केली फेसबुक पोस्ट, म्हणाले...
17
Travel : भारताचे १०००० रुपये 'या' देशात जाऊन होतील २५ लाख! ४ दिवसांच्या ट्रिपसाठी बेस्ट आहे ऑप्शन
18
झटक्यात ₹3900 रुपयांनी आपटलं सोनं! चांदीही झाली स्वस्त; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
19
"हिडीस, किळसवाणं, एखाद्या अबलेवर बलात्कार करावा, तसे भाजपा वागतेय", एकनाथ शिंदेंच्या नेत्याला संताप अनावर
20
लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार... 
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील २८ विहिरी गायब; विहिरी बुजवून उभारली घरे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:41 IST

आज शहरवासीयांना महान येथील धरणातून पाणीपुरवठा केला जाताे. सुमारे २५ वर्षांपूर्वी शहराच्या विविध भागातील नागरिकांकडे विहिरी उपलब्ध हाेत्या. मनपाची ...

आज शहरवासीयांना महान येथील धरणातून पाणीपुरवठा केला जाताे. सुमारे २५ वर्षांपूर्वी शहराच्या विविध भागातील नागरिकांकडे विहिरी उपलब्ध हाेत्या. मनपाची २०१६ मध्ये हद्दवाढ झाल्यानंतर शहरालगतच्या १३ ग्रामपंचायतींसह २४ गावांचा मनपात समावेश झाला. यावेळी संबंधित भागात स्थानिक रहिवाशांकडे विहिरी उपलब्ध असल्याची मनपाकडे नाेंद आहे. दरम्यान, काही वर्षांपासून शहरातील सुमारे २८ पेक्षा अधिक विहिरी गायब झाल्याची माहिती आहे. काही विहिरींना पाणी नसल्यामुळे तसेच काही विहिरींचा घर बांधकाम करताना अडथळा ठरत असल्याने त्या बुजविण्यात आल्या आहेत. विहिरींमधून पाणी उपसा करताना अनेक समस्या निर्माण हाेत असल्यानेही रहिवाशांनी सबमर्सिबल पंपांचा पर्याय निवडला आहे.

हे घ्या पुरावे!

१) कधीकाळी सातव चाैक, बिर्ला काॅलनी, जठारपेठ आदी भागातील रहिवाशांची तहान भागविण्यासाठी दादासाहेब दिवेकर चाैकात भलीमाेठी विहीर हाेती. कालांतराने घराेघरी नळ कनेक्शन तसेच हातपंप, सबमर्सिबल पंपांची संख्या वाढल्याने नागरिकांनी या विहिरीकडे पाठ फिरवली. त्यामुळे या विहिरीवर साैंदर्यीकरण करून ती तात्पुरती बुजविण्यात आली.

२) जुने शहरातील डाबकी राेड भागात एका नामवंत शैक्षणिक संस्थेच्या आवारात माेठी विहीर हाेती. पाण्याचा स्त्राेत आटल्याने ही विहीर विद्यार्थ्यांसाठी धाेकादायक ठरू लागली हाेती. संस्थेने ती बुजवत त्यावर साैंदर्यीकरण केले आहे.

३) डाबकी राेड भागातील प्रभाग क्रमांक ८ मधील लक्ष्मीनगरमध्ये नागरिकांच्या सार्वजनिक वापरासाठी विहीर बांधण्यात आली हाेती. अतिशय काेरीव दगडी बांधकामातील ही विहीर अनेकांचे लक्ष वेधून घेत हाेती. पाण्याचा स्त्राेत आटल्याने ती १९९३ मध्ये बुजविण्यात येऊन त्यावर घर बांधण्यात आले.

सहकारनगरमधील विहीर धाेकादायक

गाेरक्षण राेड भागातील सहकारनगरमध्ये मुख्य रस्त्यालगतच भलीमाेठी विहीर आहे. २५ वर्षांपूर्वी यातून पाण्याचा उपसा केला जात हाेता. आज ही विहीर स्थानिक रहिवाशांसाठी धाेकादायक बनली आहे. विहिरीच्या आजूबाजूला कठडे नसल्याने या ठिकाणी माेठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मनपासह पदाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

शहरात २००४ मध्ये दुष्काळग्रस्त स्थिती हाेती. तेव्हा संकटसमयी नागरिकांनी विहिरीतूनच पाण्याचा उपसा करून तहान भागवली हाेती. अशा विहिरींना जीवंत ठेवण्याची गरज असताना त्या बुजविण्यात आल्या. याला मनपा प्रशासनासह पदाधिकाऱ्यांचे धाेरण कारणीभूत आहे.

- शंतनू मानतकर, पर्यावरणप्रेमी

भूजल पातळी माेठ्या प्रमाणात घसरल्यामुळे विहिरीतील पाण्याचे स्त्राेत आटले. अशा विहिरींचा वापर कचरा टाकण्यासाठी करण्यात आला. काहींनी त्यावर घरे बांधली. अस्तित्वात असलेल्या विहिरींचे जतन करणे गरजेचे आहे.

- शुभम काेगदे, पर्यावरणप्रेमी

शहरात २५ ते ३० वर्षांपूर्वी विहिरींची माेठी संख्या हाेती. पाण्याचे स्त्राेत कमी झाल्याने नागरिकांनी हातपंप, सबमर्सिबल पंपचा पर्याय निवडला. पूर्व झाेनमधील धाेकादायक ठरणाऱ्या विहिरींभोवती कठडे उभारले जातील.

- विजय पारतवार, क्षेत्रीय अधिकारी, पूर्व झाेन