शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

 वऱ्हाडातील धरणात २० टक्केच जलसाठा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 13:54 IST

पश्चिम विदर्भातील  अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्ह्यातील धरणातील जलसाठ्याची स्थिती वाईट आहे

ठळक मुद्दे१८ धरणांपैकी पाच धरणांतील जिवंत जलसाठा संपला असून, पातळी शून्य टक्के आहे. वाशिम जिल्ह्यातील अडाणमध्ये ४६.२० टक्के, तर एकबुर्जी धरणात ३४.१७ टक्के वाढ झाली आहे. मागील एक महिन्यात केवळ सहा टक्के एवढीच जलसाठ्यात वाढ झाली.

अकोला : पश्चिम विदर्भातील (वऱ्हाड) मध्यम व लघु मिळून ४८४ धरणात (प्रकल्प) ५ जुलैपर्यंत केवळ २० टक्केच जलसाठा संचयित झाला. ४ जून रोजी या धरणांमध्ये १४ टक्के जलसाठा होता.  म्हणजेच पावसाळ््याच्या मागील एक महिन्यात केवळ सहा टक्के एवढीच जलसाठ्यात वाढ झाली. या उन्हाळ््यात तीव्र टंचाईचा सामना करणाऱ्या नागरिकांसह शेतकऱ्यांना आता दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.पश्चिम विदर्भातील  अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्ह्यातील धरणातील जलसाठ्याची स्थिती वाईट आहे. या तीन जिल्'ातील १८ धरणांपैकी पाच धरणांतील जिवंत जलसाठा संपला असून, पातळी शून्य टक्के आहे. अकोलेकरांची लाइफलाइन असलेल्या काटेपूर्णा धरणात तर ९.५५ टक्केच जलसाठा आहे. यात अर्धा गाळ असल्याने अकोलेकरांवरील जलसंकट अद्याप संपले नाही. याच जिल्ह्यातील निर्गुणा, उमाव मोर्णा धरणात शून्य टक्के जलसाठा आहे. बुलडाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा धरणातील जलसाठा संपला असून, अद्याप एक थेंबही वाढ झाली नाही. याच जिल्ह्यातील मस व कोराडी धरणातील जलसाठा शून्य टक्के आहे. तोेरणा २.७९, तर उतावळी धरणातील पातळी ३.१३ टक्के आहे. वाशिम जिल्ह्यातील सोनल धरणात ११.५२ टक्के आहे. बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा या मोठ्या धरणात १०.३४ टक्के, पेनटाकळी धरणात २.२० टक्के, ज्ञानगंगा मध्यम प्रकल्पात १८.१८ टक्के, पलढगमध्ये ११.८५ टक्के, मन धरणात १०.४५ टक्के जलसाठा शिल्लक आहे. वाशिम जिल्ह्यातील अडाणमध्ये ४६.२० टक्के, तर एकबुर्जी धरणात ३४.१७ टक्के वाढ झाली आहे. 

 वाशिम जिल्'ातील धरणात वाढला जलसाठा!मान्सूनपूर्व पाऊस व त्यानंतर झालेल्या पावसामुळे वाशिम जिल्ह्यातील अडाण धरणातील जलसाठा १२ टक्क्यांहून ४६.२० टक्क्यांवर पोहोचला असून, याच जिल्ह्यातील एकबुर्जी धरणातील १०.७८ टक्क्याहून ३४.१७ टक्क्यावर पोहोचला आहे. बुलडाणा जिल्'ातील दोन धरणात १ ते २ टक्के वाढ झाली. अमरावती जिल्'ातील उर्ध्व वर्धा धरणात केवळ ३४.७२ टक्के जलसाठा शिल्लक आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पूसमध्ये ४८.६७, अरुणावती १५.४८ तर बेंबळा धरणात १६.५९ टक्केच जलसाठा आहे. अकोला, बुलडाणा व अमरावती जिल्ह्याच्या सीमेवरील वाण धरणात गत एक महिन्यात जलसाठा वाढला नसून, गतवर्षीचा ५८.३९ टक्के जलसाठा शिल्लक आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाDamधरणWaterपाणी