शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
5
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
6
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
7
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
8
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
9
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
10
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
11
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
12
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
13
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
14
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
15
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
16
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
17
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
18
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
19
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
20
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

 वऱ्हाडातील धरणात २० टक्केच जलसाठा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 13:54 IST

पश्चिम विदर्भातील  अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्ह्यातील धरणातील जलसाठ्याची स्थिती वाईट आहे

ठळक मुद्दे१८ धरणांपैकी पाच धरणांतील जिवंत जलसाठा संपला असून, पातळी शून्य टक्के आहे. वाशिम जिल्ह्यातील अडाणमध्ये ४६.२० टक्के, तर एकबुर्जी धरणात ३४.१७ टक्के वाढ झाली आहे. मागील एक महिन्यात केवळ सहा टक्के एवढीच जलसाठ्यात वाढ झाली.

अकोला : पश्चिम विदर्भातील (वऱ्हाड) मध्यम व लघु मिळून ४८४ धरणात (प्रकल्प) ५ जुलैपर्यंत केवळ २० टक्केच जलसाठा संचयित झाला. ४ जून रोजी या धरणांमध्ये १४ टक्के जलसाठा होता.  म्हणजेच पावसाळ््याच्या मागील एक महिन्यात केवळ सहा टक्के एवढीच जलसाठ्यात वाढ झाली. या उन्हाळ््यात तीव्र टंचाईचा सामना करणाऱ्या नागरिकांसह शेतकऱ्यांना आता दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.पश्चिम विदर्भातील  अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्ह्यातील धरणातील जलसाठ्याची स्थिती वाईट आहे. या तीन जिल्'ातील १८ धरणांपैकी पाच धरणांतील जिवंत जलसाठा संपला असून, पातळी शून्य टक्के आहे. अकोलेकरांची लाइफलाइन असलेल्या काटेपूर्णा धरणात तर ९.५५ टक्केच जलसाठा आहे. यात अर्धा गाळ असल्याने अकोलेकरांवरील जलसंकट अद्याप संपले नाही. याच जिल्ह्यातील निर्गुणा, उमाव मोर्णा धरणात शून्य टक्के जलसाठा आहे. बुलडाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा धरणातील जलसाठा संपला असून, अद्याप एक थेंबही वाढ झाली नाही. याच जिल्ह्यातील मस व कोराडी धरणातील जलसाठा शून्य टक्के आहे. तोेरणा २.७९, तर उतावळी धरणातील पातळी ३.१३ टक्के आहे. वाशिम जिल्ह्यातील सोनल धरणात ११.५२ टक्के आहे. बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा या मोठ्या धरणात १०.३४ टक्के, पेनटाकळी धरणात २.२० टक्के, ज्ञानगंगा मध्यम प्रकल्पात १८.१८ टक्के, पलढगमध्ये ११.८५ टक्के, मन धरणात १०.४५ टक्के जलसाठा शिल्लक आहे. वाशिम जिल्ह्यातील अडाणमध्ये ४६.२० टक्के, तर एकबुर्जी धरणात ३४.१७ टक्के वाढ झाली आहे. 

 वाशिम जिल्'ातील धरणात वाढला जलसाठा!मान्सूनपूर्व पाऊस व त्यानंतर झालेल्या पावसामुळे वाशिम जिल्ह्यातील अडाण धरणातील जलसाठा १२ टक्क्यांहून ४६.२० टक्क्यांवर पोहोचला असून, याच जिल्ह्यातील एकबुर्जी धरणातील १०.७८ टक्क्याहून ३४.१७ टक्क्यावर पोहोचला आहे. बुलडाणा जिल्'ातील दोन धरणात १ ते २ टक्के वाढ झाली. अमरावती जिल्'ातील उर्ध्व वर्धा धरणात केवळ ३४.७२ टक्के जलसाठा शिल्लक आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पूसमध्ये ४८.६७, अरुणावती १५.४८ तर बेंबळा धरणात १६.५९ टक्केच जलसाठा आहे. अकोला, बुलडाणा व अमरावती जिल्ह्याच्या सीमेवरील वाण धरणात गत एक महिन्यात जलसाठा वाढला नसून, गतवर्षीचा ५८.३९ टक्के जलसाठा शिल्लक आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाDamधरणWaterपाणी