शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
4
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
5
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
6
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
7
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
8
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
9
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
10
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
11
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
12
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
13
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
14
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
15
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
16
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
17
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
18
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
19
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
20
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती

अकोला जिल्ह्यात १.९६ लाख शेतकऱ्यांचे १.३१ लाख हेक्टरवरील पीक, जमिनीचे नुकसान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2021 10:38 IST

Agriculture News : शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ११५ कोटी ३५ लाख ३४ हजार २१६ रुपये मदतनिधी मागणीचा प्रस्तावदेखील शासनाकडे सादर करण्यात आला आहे.

अकोला : अतिवृष्टी आणि पुराच्या तडाख्यात जिल्ह्यातील १ लाख ९६ हजार ६४२ शेतकऱ्यांचे १ लाख ३१ हजार ४९४ हेक्टरवरील पिकांसह शेतजमिनीचे नुकसान झाल्याचा अंतिम अहवाल जिल्हा प्रशासनामार्फत मंगळवारी शासनाकडे सादर करण्यात आला असून, नुकसान झालेल्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ११५ कोटी ३५ लाख ३४ हजार २१६ रुपये मदतनिधी मागणीचा प्रस्तावदेखील शासनाकडे सादर करण्यात आला आहे.

जिल्ह्यात २१ जुलै रोजी रात्रभर बरसलेल्या मुसळधार पावसाने नदी व नाल्यांना पूर आला होता. अतिवृष्टी आणि पुराच्या तडाख्यात जिल्ह्यात खरीप पिके पाण्यात बुडाली तसेच शेतजमीन खरडून गेल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पीक आणि जमिनीचे नुकसान झाल्याने आधीच अडचणीत असलेला शेतकरी संकटात सापडला. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनामार्फत तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायकांच्या पथकांमार्फत जिल्ह्यातील पीक नुकसानासह खरडून गेलेल्या शेतजमिनीच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. पंचनामे पूर्ण करण्यात आल्यानंतर जिल्हा प्रशासनामार्फत जिल्ह्यातील शेती आणि पिकांच्या नुकसानीचा अंतिम अहवाल विभागीय आयुक्तांमार्फत शासनाकडे सादर करण्यात आला. त्यानुसार अतिवृष्टी व पुराच्या तडाख्यात जिल्ह्यात १ लाख ९६ हजार ६८२ शेतकऱ्यांचे १ लाख ३१ हजार ४९४ हेक्टर ९४ क्षेत्रावरील पिकासह शेतजमिनीचे नुकसान झाले असून, नुकसान झालेल्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ११५ कोटी ३५ लाख ३४ हजार २१६ रुपये मदतनिधी मागणीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनामार्फत शासनाकडे सादर करण्यात आला.

पीक, शेती नुकसानीचा असा आहे अंतिम अहवाल!

क्षेत्राचा प्रकार             शेतकरी             क्षेत्र (हेक्टर) अपेक्षित निधी (रुपये)

जिरायती पिके             १७८०८३             १२१२९५.३६            ८२४८०८४४८

बागायत पिके             १०४१             ५७९.१८             ७८१८९३०

फळ पिके                         ९०९             ५८२.३३             १०४८१९४०

खरडून गेलेली जमीन १६६४९             ९०३८.०७            ३१०४२४८९८

..................................................................................................................................

एकूण                         १९६६८२             १३१४९४             ११५३५३४२१६

 

तालुकानिहाय शेतकरी आणि पिकांचे नुकसान !

तालुका             शेतकरी             क्षेत्र (हेक्टर)

अकोला             ६६८३५             ४७७३९.००

अकोट             ९८९५             ५५१६.०६

तेल्हारा             २८७७             २०५३.२३

बाळापूर             २५१७४             २१३९८.४८

पातूर             ३२०२८             २०९०७.०१

बार्शीटाकळी            ३९५७८             २३०५१.०२

मूर्तिजापूर             १६९६             ६२९.७५

 

‘या’ पिकांचे झाले नुकसान!

अतिवृष्टी व पुराच्या तडाख्यात जिल्ह्यात सोयाबीन, कापूस, ज्वारी, तूर, मूग, उडीद इत्यादी जिरायती खरीप पिकांसह भाजीपाला, कांदा व इतर बागायती पिके आणि पपई, केळी, लिंबू, पेरू, आंबा, संत्रा, डाळिंब आदी फळपिकांचे नुकसान झाले आहे.

 

अतिवृष्टी व पुरामुळे जिल्ह्यातील पिकांसह शेतजमिनीच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण करण्यात आले असून, नुकसानीचा अंतिम अहवाल मंगळवारी शासनाकडे सादर करण्यात आला.

- डाॅ. कांतप्पा खोत

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीFarmerशेतकरी