संचारबंदीच्या काळात १३ हजार पॉझिटिव्ह ; १५ दिवसानंतरही रुग्ण कमी होईनात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:29 IST2021-05-05T04:29:22+5:302021-05-05T04:29:22+5:30

३१ मार्च ते १४ एप्रिल एकूण चाचण्या - ४०,९५५ पॉझिटिव्ह - ४,४७१ रुग्णालयातून सुटी - ६,१०१ पॉझिटिव्हिटी रेट ...

13,000 positives during curfew; Patients do not decrease even after 15 days! | संचारबंदीच्या काळात १३ हजार पॉझिटिव्ह ; १५ दिवसानंतरही रुग्ण कमी होईनात !

संचारबंदीच्या काळात १३ हजार पॉझिटिव्ह ; १५ दिवसानंतरही रुग्ण कमी होईनात !

३१ मार्च ते १४ एप्रिल एकूण चाचण्या - ४०,९५५

पॉझिटिव्ह - ४,४७१

रुग्णालयातून सुटी - ६,१०१

पॉझिटिव्हिटी रेट - १०.९१

रिकव्हरी रेट - ७९.०२

१५ एप्रिल ते ३ मे एकूण चाचण्या - ३२,६४१

पॉझिटिव्ह - ९, १५१

रुग्णालयातून सुटी - ७,५२१

पॉझिटिव्हिटी रेट - २८.०३

रिकव्हरी रेट - ८७.०२

या तीन कारणांमुळे रुग्णसंख्या वाढली

बंदीनंतरही अनेक जण विनाकारण घराबाहेर फिरत असून मास्कचा वापर टाळत आहेत. सकाळी ११ वाजता पर्यंत बाजारात गर्दी करत आहेत. त्यामुळे संसर्ग वाढण्याचा धोका वाढला आहे.

लक्षणे दिसून ही त्याकडे दुर्लक्ष करीत असून, चाचणीला घाबरत आहेत. घरीच उपचाराला प्राधान्य देत आहेत. अशा परिस्थितीतही लोक स्वत:चे विलगीकरण करुन घेत नाहीत. त्यामुळे कुटुंबातील इतर सदस्यांनाही संसर्ग वाढत आहे.

तरुण वर्ग विनाकारण किंवा कामानिमित्त घराबाहेर पडतो. बाहेरून आल्यानंतर योग्य काळजी न घेताच ते इतरांच्या संपर्कात येतात. या प्रकारामुळे घरात राहूनही अनेकांना कोरोनाचा संसर्ग होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

ग्रामीण भागात रुग्ण वाढले, कारण?

ग्रामीण भागात सर्वत्रच चाचण्यांची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे गंभीर लक्षणे दिसल्यावर त्यांना शहरात जावे लागते.

किरकोळ लक्षणे निदर्शनास येऊनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. अनेक जण घरगुती उपाययोजना करतात.

त्याचा काहीच फरक न पडल्यास शहरात डॉक्टरांकडे तीन ते चार दिवस उपचार घेतात. त्यानंतर बरे न वाटल्यास रुग्ण कोरोना चाचणी करतात.

या काळात कोविडचा रुग्ण अनेकांच्या संपर्कात येतो.

Web Title: 13,000 positives during curfew; Patients do not decrease even after 15 days!