शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

बारावी परीक्षेत दोन कॉपीबहाद्दर निलंबित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 1:22 PM

अकोला: उच्च माध्यमिक (बारावी) परीक्षेला गुरुवारपासून शांततेत सुरुवात झाली. गुरुवारी इंग्रजी विषयाच्या पेपरदरम्यान भरारी पथकांनी परीक्षा केंद्रांवर धाडी घातल्या.

अकोला: उच्च माध्यमिक (बारावी) परीक्षेला गुरुवारपासून शांततेत सुरुवात झाली. गुरुवारी इंग्रजी विषयाच्या पेपरदरम्यान भरारी पथकांनी परीक्षा केंद्रांवर धाडी घातल्या. या धाडीत पातूर येथील सावित्रीबाई फुले कनिष्ठ महाविद्यालयातील आणि अकोट येथील नरसिंग महाविद्यालयातील प्रत्येक एक अशा दोन कॉपीबहाद्दरांना रंगेहात पकडण्यात आले. भरारी पथकाने दोघांना निलंबित केले.बारावीच्या परीक्षेला गुरुवारपासून सुरुवात झाली असून, परीक्षा जिल्ह्यातून २६ हजार ९२0 विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. जिल्ह्यातील ८३ केंद्रांवर परीक्षा सुरू झाली आहे. परीक्षा केंद्र आणि परिसरात गैरप्रकार रोखण्यासाठी शिक्षण विभागाने व्हिडिओ शुटिंग पथकांसह भरारी पथके नियुक्त केले आहेत. महिला भरारी पथकाने अधिव्याख्याता कविता बोरसे यांच्या नेतृत्वात अकोट येथील नरसिंग महाविद्यालयात धाड घातली. या ठिकाणी एका विद्यार्थ्यास कॉपी करताना पकडले. तसेच प्राचार्य डॉ. प्रकाश जाधव यांच्या नेतृत्वातील जिल्हा शैक्षणिक गुणवत्ता व व्यावसायिक विकास संस्थेच्या पथकाने पातूर येथील सावित्रीबाई फुले कनिष्ठ महाविद्यालयात धाड घालून एका विद्यार्थ्याने कॉपी केल्यामुळे निलंबित केले. २२ फेब्रुवारीला हिंदी विषयाचा पेपर होणार आहे.अर्धा तास आधी न आल्यास पेपर नाही!परीक्षा केंद्रावर अर्धा तास आधी येणाऱ्या विद्यार्थ्यांनाच प्रवेश देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. परीक्षा सुरळीत आणि कॉपीमुक्त होण्यासाठी शिक्षण विभाग प्रयत्न करीत आहे. त्या दृष्टिकोनातूनच १0.३0 वाजतानंतर परीक्षा केंद्रावर येणाºया विद्यार्थ्यांना यंदा परीक्षेपासून मुकावे लागणार आहे. विद्यार्थी व पालकांची कोणतीही सबब ऐकून घेतली जाणार नाही. सकाळी ११ ते २ या वेळत पेपर होणार असल्याने, विद्यार्थ्यांनी अर्धा तास आधीच परीक्षा केंद्रावर पोहोचावे, असे आवाहन शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद, सहायक शिक्षण उपनिरीक्षक आत्माराम राठोड यांनी केले आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाexamपरीक्षा