शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

वृक्ष लागवडीसाठी १० हजार सीड बॉम्ब तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2020 10:32 IST

जिल्हा परिषद आगरकर विद्यालयात १० हजार सीड बॉम्ब तयार करण्याला जागतिक पर्यावरणदिनी सुरुवात करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्ह्यात वन जंगलाचे प्रमाण वाढविण्यासाठी डोंगराळ भागात बियाणे फेकण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या संकल्पनेतून शहरातील जिल्हा परिषद आगरकर विद्यालयात १० हजार सीड बॉम्ब तयार करण्याला जागतिक पर्यावरणदिनी सुरुवात करण्यात आली. त्यासाठी शिक्षण व बांधकाम सभापती चंद्रशेखर पांडे गुरुजी, जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागासह शहरातील पर्यावरणप्रेमींनी पुढाकार घेतला आहे.जिल्ह्यात जंगलाचे प्रमाण पाहता ते नगण्य आहे. जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र पाहता ५,६७३ चौ. किमी आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येक जिल्हा, राज्य, देशात किमान ३३ टक्के जंगल असणे अनिवार्य आहे. या जिल्ह्यात केवळ ३४०.३७ चौ. किमी. क्षेत्रावर जंगल आहे. त्यातही घनदाट जंगल केवळ ११ चौ. किमी क्षेत्रातच आहे. मध्यम स्वरूपाचे १०८ चौ. किमी तर खुले जंगल २२० चौ. किमी क्षेत्रात आहे. वाढती लोकसंख्या, हवा, पाणी, ध्वनीचे वाढलेले प्रदूषण पाहता हे प्रमाण अत्यल्प आहे.पर्यावरणातील विविध समस्या जंगलाचे प्रमाण घटल्यामुळे निर्माण होत आहेत. त्यावर उपाय म्हणून शासनाकडून वृक्षलागवडीचा कार्यक्रम सुरू आहे. त्यातून फारसे काही हातात पडत नसल्याचेच चित्र आहे. त्यामुळे वृक्षलागवडीऐवजी जंगलातच झाडांचे प्रमाण वाढवून जंगलक्षेत्र व वनाच्छादन वाढवण्याची संकल्पना गेल्या काही वर्षांपासून अ‍ॅड. आंबेडकर यांनी जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना सांगितली.पावसाळ्यात जंगलात बियाणे फेकण्यासाठी (सीड बॉम्बिंग) नियोजनही झाले. चालू वर्षात नव्याने नियुक्त पदाधिकाऱ्यांनी उपक्रम राबवण्याची तयारी केली. त्यासाठी शिक्षण विभागानेही पुढाकार घेत विविध साहित्यासाठी जुळवाजुळव केली आहे.माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद, प्राथमिक शिक्षणाधिकारी वैशाली ठग यांनीही त्यासाठी सहकार्य केले आहे.

शहरातील पर्यावरणप्रेमींसह नाथनचाही सहभाग!जिल्हा परिषदेचा हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सभापती पांडे गुरुजी यांच्यासोबत शिक्षणाधिकारी मुकुंद, डॉ. ठग, वृक्षप्रेमी नाथन, माजी नगरसेवक अजय गावंडे, नगरसेविका धनश्री देव, नीलेश देव, पूजा काळे, सतीश उंबरकर, शुक्ला, अंकुश ठोकळ, सौरभ बाछुका, नरेंद्र चिमणकर, भास्कर चित्रे यांनी सहभाग घेत जिल्हा परिषद आगरकर विद्यालयात १० हजार सीड बॉम्ब तयार केले आहेत.

प्रत्येकाने किमान २२ वृक्ष जगवावे...माणसाला त्याच्या हयातीत जगण्यासाठी लागणारा आॅक्सिजनचा पुरवठा किमान २२ वृक्षांकडून होतो. त्यामुळे प्रत्येकाने किमान तेवढे वृक्ष लावून जगवणे, हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. त्यासाठी जिल्हा परिषद कर्मचाºयांनी सीड बॉम्ब तयार करण्यात योगदान द्यावे, तसेच पर्यावरणप्रेमी नागरिकांनीही त्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन सभापती पांडे गुरुजी यांनी केले.

 

टॅग्स :Akolaअकोलाenvironmentपर्यावरण