शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
2
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
3
मतदानादरम्यान, किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
4
"मराठी 'not welcome' म्हणणार्‍यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
5
Baramati Lok Sabha Election 2024 : 'ही चिडचिड खूप काही सांगून जाते...', रोहित पवारांनी दत्तात्रय भरणेंचा व्हिडीओ केला शेअर, म्हणाले...
6
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
7
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
8
भन्साळींच्या 'हीरामंडी'त चुकाच चुका! सोनाक्षीच्या हातातील पेपरमध्ये 'कोरोनाच्या बातम्या'
9
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
10
महाराष्ट्राची लढाई बारामतीत होते की काय? संजय राऊतांची मोदी-शाह यांच्यावर टीका
11
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
12
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
13
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!
14
"इंग्रजांनी उभारलेल्या व्यवस्थेला गंज लागलाय..," UPSCचा उल्लेख करत माजी RBI गव्हर्नरांनी उपस्थित केला प्रश्न
15
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
16
अजबच! गणितात २०० पैकी २१२, तर भाषेमध्ये २११ गुण, मुलीचं प्रगती पुस्तक होतंय व्हायरल  
17
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
18
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर
19
१०० वर्षांनी वृषभेत चतुर्ग्रही योग: ५ राशींना वरदान काळ, बंपर फायदा; सुवर्ण संधी, अपार लाभ!
20
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?

जगण्याची ओढ आम्हा मरु देत नाही; लोणीव्यंकनाथच्या माळावर उतरलेल्या वडार समाजाच्या जिद्दीला सलाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2017 7:07 PM

‘यांत्रिकीकरणामुळे वडार समाजाचे पाटा-वरवंटा घडविण्याचे काम थांबले. माती काम संपले. विहीर खोदाईचे काम आटले आणि अवघा संसार उघड्यावर आला. पोटासाठी रोज एक गाव तुडविण्याची वेळ आली. त्यामुळे मुलेही शिक्षणाच्या हक्कापासून वंचित राहिली. समाजावर उपासमारीची वेळ आली आहे. पण जगण्याची ओढ मरु देत नाही’, आवंढा गिळत सुनीता पवार सांगत होत्या.

ठळक मुद्देलोणीव्यंकनाथ-हंगेवाडी परिसरातल्या उघड्या-बोडख्या माळरानावर वडार समाजातील १५ कुटुंबाचा काफिला उतरला आहे.पोटासाठी हाताला मिळेल या आशेने ते लहान मुलांसह लोणीव्यंकनाथ-हंगेवाडी परिसरात आले. वाढती बेकारी व बेरोजगारीने त्यांचा संसार उघड्यावर आणला आहे.बहुतेक कुंटूबांना गावात स्वत:चा निवारा नाही. फक्त मतदानकार्ड, आधारकार्ड आणि रेशनकार्ड आहे. गावात काम नाही. त्यामुळे या कुंटुबांना हाताला काम शोधत वर्षातील आठ महिने राज्यभर भटकावे लागते. पोटाची लढाई लढता लढता मुलांचे भविष्य उद्धवस्त होत असल्याची खंत सुनीता पवार यांनी व्यक्त केली. 

बाळासाहेब काकडेश्रीगोंदा : ‘यांत्रिकीकरणामुळे वडार समाजाचे पाटा-वरवंटा घडविण्याचे काम थांबले. माती काम संपले. विहीर खोदाईचे काम आटले आणि अवघा संसार उघड्यावर आला. ऊन, वारा, थंडीचा मारा झेलू लागला. पोटासाठी रोज एक गाव तुडविण्याची वेळ आली. त्यामुळे मुलेही शिक्षणाच्या हक्कापासून वंचित राहिली. श्रमाला देव मानणा-या वडार समाजाच्या रोजगारावर यांत्रिकीकरणाचा वरवंट फिरला. समाजावर उपासमारीची वेळ आली आहे. पण जगण्याची ओढ मरु देत नाही’, आवंढा गिळत सुनीता पवार सांगत होत्या.लोणीव्यंकनाथ-हंगेवाडी परिसरातल्या उघड्या-बोडख्या माळरानावर वडार समाजातील १५ कुटुंबाचा काफिला उतरला आहे. त्यातीलच या सुनीता पवार. ‘लोकमत’ने या कुटूंबाला कोठून आलात, कोठे चाललात असे विचारले तर सुनीता पवार, लक्ष्मण पवार, मनोज पवार त्यांची कहाणी सांगू लागले. ते मुळचे कर्जत तालुक्यातील मिरजगावचे. पोटासाठी हाताला मिळेल या आशेने ते लहान मुलांसह लोणीव्यंकनाथ-हंगेवाडी परिसरात आले. वाढती बेकारी व बेरोजगारीने त्यांचा संसार उघड्यावर आणला आहे.मिरजगावात वडार समाजाची संख्या मोठी आहे. बहुतेक कुंटूबांना गावात स्वत:चा निवारा नाही. फक्त मतदानकार्ड, आधारकार्ड आणि रेशनकार्ड आहे. गावात काम नाही. त्यामुळे या कुंटुबांना हाताला काम शोधत वर्षातील आठ महिने राज्यभर भटकावे लागते. पोटाची लढाई लढता लढता मुलांचे भविष्य उद्धवस्त होत असल्याची खंत सुनीता पवार यांनी व्यक्त केली. आमच्या १५ कुटूंबात ३६ मुले आहेत. शासनाचा शाळाबाह्य मुलांना शाळेत आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. पण आमच्यापर्यंत सर्व शिक्षा अभियानाची टीम पोहचत नाही, असे सांगण्यासही त्या विसरल्या नाहीत.आमची मुलं जून ते नोव्हेंबर या महिन्यात मिरजगावला शाळेत जातात. नंतर आठ महिने आमच्या मागे भटकंती करतात. त्यामुळे हातात लेखणीऐवजी टीकाव अन् फावडे येते़ हाताला फोड येतात. फुटतात. येथूनच सुरु होतो, त्यांचा वेदना पचवण्याचा प्रवास. पुढे काहीजण व्यवसनाच्या आहारी जातात. टीकेचे धनी होतात. पण त्यांच्या वेदना, त्यांचा वनवास कोणाला कळला आहे का, असा सुन्न करणारा प्रश्न मनोज पवार उपस्थित करतो.

मुल शिकली पाहिजेत

माझे शिक्षण पाचवीपर्यंत पुण्यात झाले आणि वडिलांनी रामदास पवार यांच्याशी विवाह लावून दिला. आम्ही पोटासाठी भटकतो. मुलं थंडी, वा-यात आमच्याबरोबर कुडकुडतात. पोटात तुटते. पण काय करणार? आमच्या मुलांना शासनाने शिकविले पाहिजे एवढीच इच्छा आहे, असे सुनीता पवार यांनी सांगितले.

... तरच पुढची पिढी जगेल

आम्हला ना जमीन-जुमला, ना इमला. कष्ट करणे आणि जीवन जगणे हेच आमच्या प्राक्तनात लिहिलेले आहे. रोजगाराचे मार्ग बदलले आहेत. आता मुलांना शिक्षण मिळाले तरच पुढची पिढी तरू शकते, असे मनोज विठ्ठल पवार म्हणाले.

पाच-सहा हजाराला मिळणारे गाढव आता पन्नास हजाराला झाले आहे. त्यामुळे महागाचे गाढव घेऊन माती वाहने परवडत नाही. यांत्रिकीकरणामुळे तो धंदाही संपला. गाढव आमची लक्ष्मी आहे. पण ती पुजायलाही मिळत नाही.-लक्ष्मण पवार

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदा