शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

रोहित्र जळाल्याने राहुरी तालुक्यातील दोनशे एकरावरील पिके जळण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 5:09 PM

महावितरणचे वीज रोहित्र जळण्याचे प्रकार वाढल्याने राहुरी तालुक्यातील शेतकरी हैराण झाले आहेत. जुना कणगर रस्ता परिसरात असलेल्या भिंगारकर रोहित्र गेल्या तीन आठवड्यांपासून जळाल्याने ऊस, घास, गहू पिके धोक्यात आली आहेत.

राहुरी : महावितरणचे वीज रोहित्र जळण्याचे प्रकार वाढल्याने राहुरी तालुक्यातील शेतकरी हैराण झाले आहेत. जुना कणगर रस्ता परिसरात असलेल्या भिंगारकर रोहित्र गेल्या तीन आठवड्यांपासून जळाल्याने ऊस, घास, गहू पिके धोक्यात आली आहेत. दोनशे एकरावरील पिके जळण्याच्या मार्गावर आहेत. महावितरणने लक्ष न दिल्यास कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा इशारा मंगळवारी शेतक-यांनी दिला.भिंगारकर रोहित्रावर ३५ वीज जोड आहेत. दीड महिन्यात हे रोहित्र दुस-यांदा जळाले. गेल्या तीन आठवड्यांपासून पुन्हा रोहित्र जळाल्याने शेतक-यांनी महावितरणाला रोहित्र दुरूस्ती करण्यासंदर्भात विनंती केली. शेतक-यांनी वीज देयके भरल्याची झेरॉक्सही महावितरणकडे दिली. मात्र महावितरणने लक्ष न दिल्याने पाणी असूनही शेतातील उभी पिके जळतांना बघण्याची नामुष्की शेतक-यांवर आली आहे.रोहित्र दुरूस्तीसाठी महावितरणकडून अहवाल हवा असतो. मात्र महावितरणने अहवाल न दिल्याने नादुरूस्त रोहित्र शेतातच आहे. रोहित्र काढून नवीन रोहित्र मिळणे गरजेचे आहे. रोहित्र दुरूस्त करण्याची सुविधा राहुरी येथे नाही. त्यामुळे थेट बाभळेश्वरला रोहित्र घेऊन जावे लागते. त्यानंतर शेतक-यांना दुसरे रोहित्र दिले जाते. रोहित्र पोहच करण्यासाठी शेतक-यांनाच महावितरणच्या कर्मचा-यांना वाहन पुरवावे लागते. श्रीरामपूर, बाभळेश्वर किंवा बाभूळगाव येथे पर्यायी रोहित्र उपलब्ध होते. राहुरी येथे मोठ्या प्रमाणावर प्रमाणावर रोहित्र जळत असताना स्थानिक पातळीवर रोहित्र उपलब्ध करून देण्याची गरज आहे. यासंदर्भात महावितरणच्या उपअभियंत्याशी संपर्क साधला असता ते रजेवर असल्याचे सांगण्यात आले.

उसाचे पीक ३० कांडयांवर आले आहे. मात्र गेल्या तीन आठवड्यांपासन रोहित्र नादुरूस्त आहे. त्यामुळे पीक जळू लागले आहे. परिसरातील शेतक-यांचे नुकसान झाले आहे. शेतक-यांनी वीज बिल भरूनही महावितरण दखल घेत नाही़ रोहित्र दुरूस्तीसाठी शेतक-यांना बरेच दिवस वाट पहावी लागते. दुरूस्तीसाठी राहुरी येथे सुविधा उपलब्ध पाहिजे. विजेचा प्रश्न न सोडविल्यास आंदोलनाशिवाय पर्याय नाही.-मुरलीधर वराळे, ऊस उत्पादक शेतकरी.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरीmahavitaranमहावितरण