शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

कोपरगाव तालुक्यात पाणी टंचाईचा झळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 12:21 PM

तालुक्यातील रांजणगाव देशमुखसह परिसरातील धोंडेवाडी, मानेगांव, वेस, सोयगांव व बहादपूर या गावांना सध्या पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असून गावातील उद्भव आटल्याने पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. किमान आठवड्यातून ५०० रुपये खर्च करण्याची वेळ ग्रामस्थांवर आले आहे. टँकरचे प्रस्ताव देवूनही टँकर सुरू होत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

ठळक मुद्देरांजणगाव देशमुखसह पाच गावात पाणी टंचाई

रोहित टेकेकोपरगाव : तालुक्यातील रांजणगाव देशमुखसह परिसरातील धोंडेवाडी, मानेगांव, वेस, सोयगांव व बहादपूर या गावांना सध्या पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असून गावातील उद्भव आटल्याने पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. किमान आठवड्यातून ५०० रुपये खर्च करण्याची वेळ ग्रामस्थांवर आले आहे. टँकरचे प्रस्ताव देवूनही टँकर सुरू होत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

या सर्व गावात उन्हाळ्यात मोठ्या दुष्काळाला सामोरे जावे लागते. प्रत्येक कुटुंबाला दैनंदिन वापरासाठी व पशुधनासाठी पाण्याची गरज भासत आहे. पाणी मिळविण्यासाठी कुटुंबातील महिलांना व पुरुषांनाही भटकंती करावी लागत आहे. तसेच वेळ पडल्यास पाण्यासाठी पैसेही मोजावे लागत आहे. रांजणगाव देशमुखसह परिसरातील पाच गावांना पिण्याचे पाणी पुरवठा करण्यासाठी पोहेगाव येथून गेलेल्या पाटाचे पाणी पाईपलाईनद्वारे धोंडेवाडी येथील तलावात आणण्याची योजना आहे. मात्र वीजपंपाला लागणाऱ्या विजेचे सुमारे ३० लाख रुपये बिल थकल्याने वीजपुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती थांबणार तरी कधी? असा सवाल ग्रामस्थ विचारीत आहेत. यासंदर्भात कोपरगाव तहसीलदार यांच्याशी प्रस्तुत प्रतिनिधीने भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनी फोन उचलला नाही.

एक-दीड महिन्यापासून परिसरात टँकर सुरू करावे, या मागणीचा प्रस्ताव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे दिला आहे, परंतु यावर अद्यापपर्यंत कोणतीच कार्यवाही झालेली नाही. सध्या ग्रामस्थ भिषण पाणी टंचाईचा सामना करीत आहे. मागणी करून महिना उलटून गेला तरी कोणतीच कार्यवाही न झाल्याणे शासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे असा आमचा आरोप आहे. - संदीप रणधीर, सरपंच, रांजणगावसदर गावचा टँकर मागणीचा प्रस्ताव गेल्या आठ दिवसापूर्वी मला मिळाला आहे. त्याची आमच्यास्तरावरील सर्व पूर्तता करीत तहसीलदार यांच्याकडे पाठवला आहे. त्यामुळे हा विषय त्यांच्या स्तरावर आहे. - कपीलनाथ कलोडे, गटविकास अधिकारी,पंचायत समिती, कोपरगाव .

सध्या ग्रामस्थांना पाण्यासाठी मोठी पायपीट करावी लागत आहे. अनेक वेळा पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. किमान आठवड्याला ५०० रूपयांचे पाणी विकत घ्यावे लागते. त्यामुळे सामान्य नागरिकांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. प्रशासनाने तत्काळ टँकर सुरु करावा. - गोरक्षनाथ वर्पे, नागरिक रांजणगाव देशमुख, ता.कोपरगाव. देशमुख, ता.कोपरगाव.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKopargaonकोपरगाव