शहरं
Join us  
Trending Stories
1
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
2
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
3
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
4
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
5
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
6
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
7
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
8
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
9
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
10
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
11
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
12
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
13
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
14
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
15
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
16
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
17
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
18
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
19
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
20
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...

पाथर्डी तालुक्यातील ५० गावांच्या पाण्याचा प्रश्न तीव्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2021 4:36 AM

अहमदनगर : पाथर्डी तालुक्यातील ५० गावांना मुळा धारणातून शेतीसाठी पाणी सोडण्याची मागणी संयुक्तिक नसल्याचे लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाने नाशिक येथील ...

अहमदनगर : पाथर्डी तालुक्यातील ५० गावांना मुळा धारणातून शेतीसाठी पाणी सोडण्याची मागणी संयुक्तिक नसल्याचे लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाने नाशिक येथील जलसंपदा विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांना निवेदन दिले आहे. त्यामुळे पाथर्डी तालुक्यातील ५० गावांना पाणी उपलब्ध न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा स्थानिक कार्यकर्त्यांनी दिला आहे.

मुळा धरणाचे पाणी पाथर्डी तालुक्यातील ५० गावांना शेतीसाठी मिळावे याबाबतच्या मागणीचे निवेदन सन २०१८ मध्ये पाथर्डी तालुक्यातील कुत्तरवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते तुळशीराम सानप यांनी दिले होते. त्यानंतर लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाने जससंपदा विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांना पत्र लिहून पाणी देणे संयुक्तिक नसल्याचे कळविले आहे. सद्य:स्थितीत प्रकल्पाचे पाणी वापरामध्ये १,९७४ दशलक्ष इतकी तूट आहे. त्यामुळे मागणी केलेल्या पन्नास गावांना शेतीसाठी पाणी उपलब्ध होऊ शकत नाही. त्यामुळे प्रस्थापित मागणी तांत्रिकदृष्ट्या संयुक्त नाही, असे २८ डिसेंबर २०२० च्या पत्रात नमूद करण्यात आले होते.

त्यामुळे सानप यांनी गत आठवड्यात मुंबईत जलसंपदामंत्री जयंत पाटील, पालकमंत्री हसन मुश्रईफ यांची भेट घेतली. यावेळी त्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पाइपलाइनच्या साह्याने मुळा धरणाचे पाणी पाथर्डी तालुक्यातील मौजे शिरसाटवाडी तलाव, मोहरी तलाव, घाटशीळ पारगाव मध्यम प्रकल्पामध्ये सोडून पाथर्डी तालुक्यातील ५० गावांना शेतीसाठी पाणी द्यावे. सध्या मुळा धरणाचे पाणी साकेगाव (ता. पाथर्डी) येथे उपलब्ध आहे. तेथून मध्यम प्रकल्प पारगाव, शिरसवडी तलावांमध्ये मुळा धरणाचे पाणी पाइपलाइनने सोडले, तर तांत्रिकदृष्ट्या अडचण येणार नाही. मुळा धरणाच्या भिंतीची उंची दोन ते तीन फूट वाढवून मुळा धरणाचे पाणी पाथर्डी तालुक्यातील ५० गावांना देण्याबाबतचा कार्यवाहीचा प्रश्न अधिवेशनामध्ये विशेष बाब म्हणून उपस्थित करावा. मुळा धरणाचे पाणी पाथर्डी तालुक्यातील ५० गावांना शेतीसाठी देण्याबाबतचा मुद्दा उपस्थित केला नाही, तर १० मे रोजी पाथर्डीत रास्ता रोको करण्याचा इशारा दिला आहे.