शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
6
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
7
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
8
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
9
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
10
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
11
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
12
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
13
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
14
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
15
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
16
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
17
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
18
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
19
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
20
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू

अतिवृष्टीमुळे राहुरी तालुक्यात शेतात पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2020 3:02 PM

तालुक्यात जूनमध्ये झालेल्या चांगल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात खरीपाच्या पेरण्या झाल्या. बाजरी, सोयाबीन  पिके काढणीला आले. परंतु, अतिवृष्टीमुळे शेतात पाणी साचले. ओढे- नाले तुडुंब भरून वाहत असल्याने, त्यांचे पाणी शेतात शिरले.

राहुरी : तालुक्यात तीन   दिवसांपासून सुरू असलेली अतिवृष्टी. ओढ्या- नाल्यांचे पाणी शेतात शिरल्याने धोक्यात आलेली खरिपाची पिके. अशा ओल्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेत आहे. 

 शुक्रवारी (ता. १९) तहसीलदार फसियोद्दीन शेख यांनी आंबी येथे समक्ष पाहणी करून महसूल विभागाला अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचा आदेश दिला. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

तालुक्यात जूनमध्ये झालेल्या चांगल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात खरीपाच्या पेरण्या झाल्या. बाजरी, सोयाबीन  पिके काढणीला आले. परंतु, अतिवृष्टीमुळे शेतात पाणी साचले. ओढे- नाले तुडुंब भरून वाहत असल्याने, त्यांचे पाणी शेतात शिरले. कपाशी, सोयाबीन, मका, भुईमूग, कांदा रोपासह चारा पिके, फळबागांचे अतोनात नुकसान झाले. आंबी- देवळाली प्रवरा रस्ता, तांभेरे- सोनगाव- सात्रळ रस्ता पाण्याखाली गेला. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनीही अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले.

प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली. फळबागांचे यापूर्वी पंचनामे करण्यात आले. परंतु, त्यांना अद्याप मदत जाहीर झालेली नाही.

 तालुक्यात अनेक ठिकाणी शेतांना तळ्याचे स्वरूप आले आहे. खरीपाची पिके पाण्यावर तरंगत आहेत. भाजीपाल्याची पिके सडली आहेत. शासनाने पिकांचे पंचनामे करून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा. अशी शेतकरी मागणी करीत होते. पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

---

तालुक्‍यातील दृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांची पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. शुक्रवारी आंबी येथे समक्ष नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली. तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यक यांच्या पथकातर्फे पंचनामे केले जातील. 

- फसियोद्दीन शेख, तहसीलदार, राहुरी

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRainपाऊस