शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
2
Ajit Pawar : 'पवार साहेबांच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी होती, मी जर त्यांच्याबरोबर... '; अजितदादांनी सांगितला २००४ चा प्रसंग
3
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
4
'या' चुकांमुळे बुडालं Anil Ambani यांचं साम्राज्य, पाहा टीना अंबानी आता काय करतात? किती आहे संपत्ती
5
बसपा प्रमुख मायावतींनी केली मोठी कारवाई, आनंद मोहन यांना राष्ट्रीय समन्वयक पदावरून हटवले
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियात तेजी, HDFC Bank घसरला
7
लाईव्ह कॉन्सर्टमध्येच नखं कापायला लागला अरिजीत सिंग, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; Video व्हायरल
8
मतदारांना प्रलोभन दाखविणारी भाषणे; भाजप आणि अजित पवारांना आयोगाची नोटीस
9
तिरुपती बालाजी मंदिरात लग्न करणार जान्हवी कपूर? दोनच शब्दात कमेंट करत म्हणाली...
10
संपादकीय: वडाची साल पिंपळाला
11
'मालेगावचा कट करकरेंमुळे उघडा पडला अन्...'; २६/११ चा उल्लेख करत ठाकरे गटाचा मोठा दावा
12
मोदी-शाह यांचे पासपोर्ट जप्त करा, ४ जूननंतर देश सोडून पळून जातील - संजय राऊत
13
वांद्रे-वरळी सी-लिंक मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग; आरोपी तरुणाला थांबविण्यासाठी रंगला थरार
14
HDFC च्या कोट्यवधी ग्राहकांसाठी मोठी बातमी! Car आणि Home Loan च्या ग्राहकांवर होणार परिणाम
15
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
16
"निवडणुकीमुळे वातावरण गरमच आहे आणि.."; वाईत मतदान केल्यानंंतर 'आई कुठे..' फेम अभिनेत्रीचा अनुभव
17
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
18
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
19
‘मित्रांनो, क्षमा करा; मुंबईत आता आणखी लोकांचे स्वागत नाही’
20
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार

अवकाळी पावसाचा फटका ; २० मेंढ्यांचा व कोकरांचा मृत्यू ; मृत मेंढ्यांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2021 12:00 PM

घारगाव (जि. अहमदनगर)  : अवकाळी पावसाच्या तडाख्यामुळे संगमनेर तालुक्यातील नांदूर खंदरमाळ व खंदरमाळवाडी शिवारात २० मेंढ्या व कोकरांचा मृत्यू झाल्याची घटना (२ डिसेंबर) गुरुवारी सकाळी घडली. यात मेंढपाळांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

 

घारगाव (जि. अहमदनगर)  : अवकाळी पावसाच्या तडाख्यामुळे संगमनेर तालुक्यातील नांदूर खंदरमाळ व खंदरमाळवाडी शिवारात २० मेंढ्या व कोकरांचा मृत्यू झाल्याची घटना (२ डिसेंबर) गुरुवारी सकाळी घडली. यात मेंढपाळांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

संगमनेर तालुक्यातील पठार भागात बुधवारी कमी-जास्त प्रमाणात अवकाळी पाऊस सुरू झाला आहे. याचा फटका मेंढपाळांना बसला आहे. 

पठारभागात चाऱ्याचा तुटवडा निर्माण झाल्यानंतर दरवर्षी साकुर पठार भागातील मेंढपाळ लगतच्या पुणे जिल्ह्यात मेंढ्या चारण्यासाठी जात असतात. सतु रेवजी सोडनर,संदीप शंकर जांबुळकर,संजु लहानु झिटे (सर्व राहणार मांडवे बु. ता.संगमनेर) सिद्धु सावळेराम कोकरे (रा. चिंचेवाडी,साकुर)पोपट गंगाराम कुदनर (रा.शिंदोडी ता.संगमनेर), मारुती हरी कुळाळ रा. जांबुत बु.)  हे मेंढपाळ काही दिवसांपूर्वी मेंढ्या घेऊन पुणे जिल्ह्यात गेले होते. ते पुन्हा साकुर पठारभागात परतत असताना ते नांदूर खंदरमाळ व खंदरमाळ येथील माळरानावर मुक्कामी होते. मात्र, निसर्गाच्या अवकृपेमुळे झालेल्या अवकाळी पावसाने व थंडीने २० मेंढ्या व कोकरांचा मृत्यू झाला आहे. मृत मेंढ्या व कोकरांचा संख्येत वाढ होण्याची शक्यता असल्याचे मेंढपाळ संजय झिठे यांनी सांगितले. 

दरम्यान, माहिती मिळताच नांदूर खंदरमाळ गावचे तलाठी युवराज सिंग जारवाल,महसूल कर्मचारी गणेश सोनवणे, पशुवैद्यकीय अधिकारी भास्कर कुतळ यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRainपाऊस