शहरं
Join us  
Trending Stories
1
या निवडणुकीनंतर राज्यातील काही दुकाने बंद होतील, त्यात राज ठाकरेंचेही दुकान; राऊतांची टीका
2
Swati Maliwal : "माझं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न..."; स्वाती मालीवाल यांनी मारहाण प्रकरणावर मांडली व्यथा
3
निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास 'प्लॅन बी' काय?; अमित शाहांनी सांगितलं विजयाचं सीक्रेट
4
'ममता बॅनर्जींची किंमत किती, 10 लाख?'; माजी न्यायमूर्ती, नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य, टीएमसी संतप्त 
5
ठाणे, अहमदाबाद अन् शेवटी हॉटेल बदलण्यासाठी तयारी...; भावेश भिंडे पोलिसांना कसा सापडला?
6
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
7
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
8
प्रसिद्ध मराठी अभिनेता अमित खेडेकरला मातृशोक; वयाच्या 60 व्या वर्षी मालवली आईची प्राणज्योत
9
अशी महिला, जिनं उभं केलं ₹७००० कोटींचं साम्राज्य; नंतर त्याच कंपनीतून काढून टाकलं, वाचा कोण आहेत त्या?
10
पहिल्याच भेटीत तैमूरचं वागणं पाहून थक्क झाला जयदीप अहलावत; म्हणाला, 'तो मोठ्या स्टाइलमध्ये...'
11
'मुंबई पुणे मुंबई 4' कधी येणार? मुक्ता बर्वे म्हणाली, "मी, स्वप्नील आणि सतीश...'
12
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
13
२०१४ पासून पत्रकार परिषद का घेतली नाही? पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मी संसदेला उत्तरदायी'
14
"आजवर तुम्ही चुकीचं नाव घेताय..", अखेर ईशा देओलने सांगितला तिच्या नावाचा खरा उच्चार
15
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
16
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
17
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; महिंद्रात तेजी, Adani Ports घसरला
18
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
19
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड
20
भाजपा उत्तर भारतीय मोर्चानं राज ठाकरेंची केली पाठराखण; शरद पवार, उद्धव ठाकरेंना सुनावलं

नगर जिल्ह्यात दोन शासकीय कृषी महाविद्यालये ? ; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार हळगावचे भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 8:15 PM

शासनाने नियुक्त केलेल्या तज्ज्ञ समितीने श्रीगोंदा व जामखेड तालुक्यांत कृषी महाविद्यालय सुरू करण्यास अनुकूलता दर्शविल्याचे समजते. त्याआधारे दोन्ही कृषी महाविद्यालयांना मंगळवारी होणा-या मंंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी मिळणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

अहमदनगर : शासनाने नियुक्त केलेल्या तज्ज्ञ समितीने श्रीगोंदा व जामखेड तालुक्यांत कृषी महाविद्यालय सुरू करण्यास अनुकूलता दर्शविल्याचे समजते. त्याआधारे दोन्ही कृषी महाविद्यालयांना मंगळवारी होणा-या मंंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी मिळणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. दक्षिण नगर जिल्ह्यात एकाच वेळी दोन महाविद्यालयांना मंजूरी देऊन स्वपक्षातील वाद मिटविण्याबरोबरच दक्षिणेतील नेत्यांना बळ देण्याचे नवे धोरण सरकार राबवित असल्याची चर्चा सध्या जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात आहे.शेती व्यवसायाची अलीकडच्या काळात कमालीची वाताहात झाली़ कधी नव्हे ते नगर जिल्ह्यातही शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरू झाले़ विशेष म्हणजे जिल्ह्यात स्वतंत्र कृषी विद्यापीठ आहे. त्याचा जिल्ह्यातील किती शेतक-यांना फायदा झाला, हा संशोधनाचा विषय आहे़ ते कमी म्हणून काय जिल्ह्यात नव्याने दोन कृषी विज्ञान केंद्रे आली. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्या बाभळेश्वर येथे तर माजी आमदार चंद्रशेखर घुले यांच्या दहिगाव-ने येथे नव्याने कृषी विज्ञान केंद्र सुरू झाले. केंद्रात व राज्यात आघाडीची सत्ता असल्याने ही केंद्र जिल्ह्यातील आघाडीच्या लोकप्रतिनिधींनी घेतली. दोन्ही केंद्र उत्तर नगर जिल्ह्यात सुरू झाली. दक्षिण नगर जिल्हा तसा दुष्काळी़ परंतु, या भागातील शेतक-यांना बळ देणारी एकही मातृसंस्था उभी राहिली नाही. दक्षिण नगर जिल्ह्याने जिल्ह्याला दोन पालकमंत्री दिले. ते दोन्ही सध्या भाजपात आहेत. माजी पालकमंत्री बबनराव पाचपुते जिल्ह्याचे पालकमंत्री राहिलेले आहेत. त्यावेळी राष्ट्रवादीत असलेले पाचपुते सध्या भाजपात आहेत. पालकमंत्री राम शिंदे हे मूळ भाजपाचेच आहेत. जिल्हा तिथे कृषी महाविद्यालय हे सरकारचे धोरण जाहीर होताच शिंदे यांनी त्यांच्या जामखेड तालुक्यातील हळगावाला कृषी महाविद्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव दिला. परंतु, शिंदे यांचा हा प्रस्ताव पाचपुतेंच्या चांगलाच जिव्हारी लागला़ त्यांनी थेट महाविद्यालयावरच दावा ठोकला. वाद अखेर न्यायालयात गेला. न्यायालयाने तज्ज्ञ समिती नियुक्तीचा आदेश दिला. या समितीने दोन्ही तालुक्यांतील वस्तुस्थितीचा अहवाल सादर केला असून, दोन्ही ठिकाणी महाविद्यालय सुरू करण्यास हारकत नसल्याचे सरकारला कळविले आहे. पण, एका जिल्ह्यात एकच कृषी महाविद्यालय, असे सरकारचे धोरण आहे. मात्र स्वपक्षातील दोन्ही नेते महाविद्यालयांसाठी इरेला पेटल्याने सरकारकडून दोन्ही महाविद्यालयांना मंजुरी देण्याच्या जोरदार हालचाली सुरू असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर