शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
2
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
3
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
4
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
5
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
6
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
7
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
8
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
9
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
10
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
11
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
12
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
13
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
14
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
15
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
16
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
17
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
18
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
19
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
20
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 

पाणी सोडण्याच्या पूर्वतयारीसाठी लागणार वेळ : जायकवाडीला जिल्ह्यातून जाणार ५.७५ टीएमसी पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 12:50 PM

नगर व नाशिक जिल्ह्यांतील धरणांतून जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचे आदेश गोदावरी महामंडळाने जलसंपदा विभागाला दिलेले आहेत.

अहमदनगर : नगर व नाशिक जिल्ह्यांतील धरणांतून जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचे आदेश गोदावरी महामंडळाने जलसंपदा विभागाला दिलेले आहेत. परंतु पाणी सोडण्याच्या पूर्वतयारीसाठी तीन ते चार दिवसांचा वेळ लागणार असल्याने त्याबाबत जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. दरम्यान, नगर जिल्ह्यातील धरणांतून ५.७५ टीएमसी पाणी जायकवाडीसाठी जाणार आहे.नगर व नाशिक जिल्ह्यांतील धरणांतून जायकवाडी धरणात एकूण ८.९९ टीएमसी पाणी सोडण्याचा आदेश मंगळवारीगोदावरी महामंडळाने जलसंपदा विभागाला बजावला. त्यानंतर जिल्ह्यातून राजकीय, प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू झाल्या.तातडीने पाणी सोडण्याचा आदेश असला तरी पाणी सोडण्याच्या पूर्वतयारीला व पाणी सोडण्याच्या नियोजनाला तीन ते चार दिवसांचा वेळ लागणार आहे. प्रवरा व मुळा नदीतून पाणी जाणार असून, यादरम्यान असलेल्या बंधाऱ्यांच्या फळ्या काढणे, पाणी सोडल्यानंतर अवैध उपसा होऊ नये म्हणून नदीकाठच्या गावांचा वीजपुरवठा खंडित करणे, पाणीप्रश्नावरून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये म्हणून पोलीस बंदोबस्त तैनात करणे, पाणीचोरी होऊ नये म्हणून पाटबंधारे विभागाचे पथक नेमणे आदी उपाययोजनांसाठी प्रशासन तयारी करत आहे.जिल्ह्यातील भंडारदरा, निळवंडे व आढळा या तिन्ही धरणांतून ३.८५ टीएमसी पाणी प्रवरा नदीतून जायकवाडीसाठी जाणार आहे. निळवंडे ते जायकवाडी हे अंतर १७२ किलोमीटर असून त्यात १५ कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आहेत. याशिवाय मुळा धरणातून १.९० टीएमसी पाणी सोडण्यात येणार असून मुळा ते जायकवाडी हे अंतर ६५ किलोमीटर आहे. यादरम्यान, ७ कोल्हापूर बंधारे आहेत. बंधाºयांच्या फळ्या काढण्यापासून सर्व तयारीसाठी पाटबंधारे विभाग नियोजन करत आहे. त्यानंतर प्रत्यक्ष पाणी सोडण्याबाबत निर्णय होणार आहे.पाणी सोडण्याचे आदेश आलेले आहेत. परंतु जिल्हा प्रशासनाला तयारी करण्यासाठी वेळ लागेल. जिल्ह्यासाठी किती पाणी आरक्षित ठेवायचे, पाणी सोडण्यास कोणाचा विरोध आहे का? या सर्व बाबी विचारात घेऊन पाणी सोडण्याचा निर्णय घेऊ. - राहुल द्विवेदी, जिल्हाधिकारी

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय