शंभर कॅबिनेट झाल्या तरी धनगर समाजाला आरक्षण नाही - सुप्रिया सुळे

By admin | Published: May 31, 2017 04:07 PM2017-05-31T16:07:02+5:302017-05-31T16:07:15+5:30

भाजपा सरकारने आरक्षणाचे गाजर दाखवून सत्ता मिळवली मात्र सत्तेत आल्यानंतर सरकारने अभ्यासाचे कारण देत आरक्षणाला टाळाटाळ केली, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

There is no reservation for Dhangar community even after having 100 cabinet - Supriya Sule | शंभर कॅबिनेट झाल्या तरी धनगर समाजाला आरक्षण नाही - सुप्रिया सुळे

शंभर कॅबिनेट झाल्या तरी धनगर समाजाला आरक्षण नाही - सुप्रिया सुळे

Next
>ऑनलाइन लोकमत
अहमदनगर/ जामखेड, दि. 31 - धनगर समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय सर्वप्रथम राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी घेतला होता. भाजपा सरकारने आरक्षणाचे गाजर दाखवून सत्ता मिळवली मात्र सत्तेत आल्यानंतर सरकारने अभ्यासाचे कारण देत आरक्षणाला टाळाटाळ केली, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. 
 
बारामतीत येऊन पहिल्याच कॅबिनेटमध्ये धनगर समाजाचा आरक्षणाचा निर्णय घेऊ असे मुख्यमंत्री  म्हणाले होते. परंतु त्यानंतर  शंभर कॅबिनेट झाल्या तरी आरक्षणाचा  निर्णय झाला नाही, असे सांगत ""सरकार कसला अभ्यास करतेय हे माहीत नाही"", असा उपरोधिक टोला राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारला हाणला आहे. 
 
सुप्रिया सुळे यांनी चोंडी येथे येऊन पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचे दर्शन घेऊन नक्षत्र उद्यानाची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी आण्णासाहेब डांगे यांच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी आश्रमशाळा येथे  पत्रकार परिषदेत घेतली. तेथे त्यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले. परदेशातून आल्यानंतर दत्तू भोकनळ या खेळाडूंनी अवघ्या सहा दिवसात अभ्यास करून ६० टक्के मार्क मिळवले मात्र हे सरकार तीन वर्षांपासून अभ्यास करतेय तरी त्यांना निर्णय घेता येत नाही. यावरून हे सरकार किती "ढ" आहे याची प्रचिती येते, असेही त्या यावेळी म्हणाल्या आहेत. 
 
सरकारचे अपयश झाकण्यासाठी शिवार संवाद यात्रा सुरू केली आहे. या सरकारच्या काळात सर्वाधिक आत्महत्या झाल्या मात्र सरकार शेतकऱ्यांना हमी भाव देण्याऐवजी जाहिरातींवर खर्च करीत आहे. जाहीरात खर्च कमी केल्यास शेतकऱ्यांना हमी भाव देणे शक्य होईल, असा सल्लाही त्यांनी सरकारला दिला.  
 
आघाडी सरकारने अहिल्यादेवीचे जन्मगाव चोंडी येथे विकासासाठी तेरा कोटीचा निधी देऊन पर्यटन स्थळाचा दर्जा दिला. येथे संशोधनासाठी बाहेरून लोक येतात. त्यासाठी अद्यावत ग्रंथालय सुरू करण्याबाबत माजी मंत्री आण्णासाहेब डांगे यांना सूचना दिल्या. यावेळी ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख, माजी मंत्री आण्णासाहेब डांगे, महीला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले आदी उपस्थित होते.                         
 

Web Title: There is no reservation for Dhangar community even after having 100 cabinet - Supriya Sule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.