शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

आचारसंहितेमुळे तमाशाचे फड संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2019 4:58 PM

राज्यातील लोकसभा निवडणुका व गावोगावी यात्रा, जत्रा एकाच वेळी आल्याने आचारसंहितेमुळे गावच्या जत्रेतील महाराष्ट्राची लोककला संकटात सापडली आहे.

मच्छिंद्र देशमुखकोतूळ : राज्यातील लोकसभा निवडणुका व गावोगावी यात्रा, जत्रा एकाच वेळी आल्याने आचारसंहितेमुळे गावच्या जत्रेतील महाराष्ट्राची लोककला संकटात सापडली आहे. संध्याकाळी सात ते दहा वाजेपर्यंतच तमाशाला परवानगी दिली जाते. त्यामुळे एका बाजूला आचारसंहितेचा त्रास तर दुसरीकडे पोलिसांचा जाच, अशा दुहेरी संकटात तमाशा सापडला आहे. या आचारसंहितेमुळे तमाशा कलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे.राष्ट्रपती पारितोषिक विजेत्या विठाबाई भाऊ नारायणगावकर यांचा मुलगा कैलास विठाबाई नारायणगावकर यांना संगमनेर तालुक्यातील वडगाव लांडगा येथे शंभर कलावंतांसह चार दिवस कार्यक्रमाअभावी एकाच ठिकाणी राहुटी देऊन रहावे लागले. यामुळे कलावंतांवर उपासमारीची वेळ आली, असे त्यांनीसांगितले.

सध्या राज्यात सुमारे वीस हजार तमाशे व दीड लाख लोककलावंत आहेत. यात २०० तमाशांचे फड नोंदणीकृत आहेत. त्यातील २००० तमाशांचे फड मध्यम स्वरुपाचे आहेत. मध्यम स्वरुपाच्या तमाशात २० पेक्षा जास्त कलाकार असतात. तर त्यांच्या चार पट गाव तमाशे आहेत. गाव तमाशांमध्ये प्रामुख्याने आदिवासी, ठाकरी, कोकणी, खानदेशी, दशावतारी, नाचे अशा कलावंतांचा समावेश असतो.तमाशातील कलावंत हा राजकारणात व्होट बॅक ठरत नाही. इतर व्यावसायिक रंगभूमीला महामंडळ आहे. तमाशात वंचितांची संख्या मोठी आहे. त्यावर पोटपाणी चालणारे लोक महाराष्ट्रात मोठ्या संख्येने आहेत. तमाशाच्या सांस्कृतिक विकासाचा अजेंडा ठरविण्यासाठी मालक, अभ्यासक, सावकारांनी एकत्र लढाई दिली तर गळचेपी होणार नाही. - डॉ. मिलिंद कसबे, तमाशाचे अभ्यासक.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर