शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा "शिवसेना + राष्ट्रवादी + भाजपा सरकार" बनवण्याची ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली होती; तटकरेंचा गौप्यस्फोट
2
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
3
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
4
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
5
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
6
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
7
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
8
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
9
फोटोतील या अभिनेत्याला ओळखलंत का?, त्याची अवस्था पाहून चाहते झाले हैराण
10
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
11
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
12
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
13
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
14
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
15
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
16
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
17
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
18
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
19
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
20
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं

संडे स्पेशल : देशप्रेमाच्या जागृतीसाठी दोन जवानांची सायकल वारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2019 11:40 AM

पर्यावरण रक्षणासाठी विविध संदेश देत भारतीय नौदलात कार्यरत असलेले अहमदनगर जिल्ह्यातील दोन जवानांनी बारा दिवसांमध्ये सुमारे चौदाशे किलोमीटरचा प्रवास सायकलवरून पूर्ण करीत महाराष्ट्रासह गोवा राज्यात भ्रमंती केली आहे.

सचिन नन्नवरे

मिरी : पर्यावरण रक्षणासाठी विविध संदेश देत भारतीय नौदलात कार्यरत असलेले अहमदनगर जिल्ह्यातील दोन जवानांनी बारा दिवसांमध्ये सुमारे चौदाशे किलोमीटरचा प्रवास सायकलवरून पूर्ण करीत महाराष्ट्रासह गोवा राज्यात भ्रमंती केली आहे.नौसेनेच्या आयएनएस विराट या युद्धनौकेवर अभियंता असणारे मिरी (ता. पाथर्डी) येथील जवान सतीश धरम व हिवरेबाजार (ता. नगर) येथील शिवाजी ठाणगे यांच्यासह नाशिक जिल्ह्यातील अजय मोरे व शरद बोरस्ते तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील प्रतीक शहा व सिद्धार्थ कांबळे या सहा जवानांनी अवघ्या बारा दिवसांमध्ये सुमारे चौदाशे किलोमीटरचे अंतर सायकलवरून पार करीत पर्यावरण संवर्धनाचे विविध संदेश देऊन नागरिकांमध्ये जनजागृती केली.या जवानांनी खास सायकलवरून पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यासाठी सुटी काढून मुंबई येथील गेट वे आॅफ इंडिया येथून या भ्रमंतीला सुरूवात केली. मुंबईपासून अलिबाग, मुरूड, जंजिरा, आगरदांडा,वेळात या मार्गे गोव्यातून कोल्हापूर मार्गे सातारा, पुणे व लोणावळ्यावरून पुन्हा मुंबई येथील गेट वे आॅफ इंडिया येथे या सायकलवारीची सांगता झाली. या दरम्यान त्यांनी इंधन बचतीचा मुख्य संदेशासह, प्रदूषणमुक्त भारत, झाडे लावा-झाडे जगवा यासह विविध संदेश दिले. या भ्रमंतीमध्ये विविध गावातील नागरिकांनी केलेल्या स्वागतामुळे आपल्याला प्रेरणा मिळाली. हा सायकल प्रवास आपण पुढेही सुरू ठेवणार असल्याचे या जवानांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. या प्रवासासाठी आम्ही समाजसेवी संस्थेकडे विचारणा केली होती. परंतु त्यांनी कोणतीही आर्थिक मदत न देता अनेक जाचक अटी घातल्या. त्यामुळे या प्रवासासाठी आलेला सुमारे एक लाख रूपयांचा खर्च सर्वांनी स्वखर्चाने केल्याचे त्यांनी सांगितले.प्रवासादरम्यान वाचविले अपघातग्रस्तांचे प्राणप्रवासादरम्यान कोकणातील काशिद घाटात एका चारचाकी गाडीचा भीषण अपघात झाला होता. तेव्हा वैद्यकीय माहिती असलेले हिवरेबाजार येथील जवान शिवाजी ठाणगे यांनी वेळीच प्रथमोपचार करून अपघातग्रस्तांना रूग्णालयात दाखल केल्याने जखमींचे प्राण वाचल्याचे समाधान वाटत असल्याचे जवानांनी अभिमानाने सांगितले.जुलै २०१९ मध्ये सेवानिवृत्त होत आहे. निवृत्तीनंतर पर्यटनाच्या हंगामानुसार महाराष्ट्रभर सायकलवर प्रवास करून सायकल चालवा, पर्यावरण वाचवा हा संदेश देणार आहे. सायकल चालविल्याने आरोग्य निरोगी राहत असल्याने दररोज सायकल चालविणे गरजेचे आहे. - सतीश धरम, भारतीय नौदलातील अभियंता.

 

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर