शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

संडे Motivation - ..अन् मांजरी गाव बनले पाणीदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2019 11:23 AM

तालुक्यातील पूर्व भागाला मुळा नदी जीवनदायीनी ठरली आहे़ मांजरी येथे ग्रामस्थांनी एकजुटीतून वाळू उपसा रोखला आहे. स्थानिक ग्रामस्थांना बांधकामासाठी वाळूची गरज निर्माण झाल्यानंतर बैलगाडीतून वाळू वाहून नेली जाते़

भाऊसाहेब येवले राहुरी : तालुक्यातील पूर्व भागाला मुळा नदी जीवनदायीनी ठरली आहे़ मांजरी येथे ग्रामस्थांनी एकजुटीतून वाळू उपसा रोखला आहे. स्थानिक ग्रामस्थांना बांधकामासाठी वाळूची गरज निर्माण झाल्यानंतर बैलगाडीतून वाळू वाहून नेली जाते़ त्यामुळे हे गाव पाणीदार बनले आहे.मुळा नदीच्या पूर्व भागात अथांग वाळू साठा पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्क ा बसतो़ मांजरीसह परिसरातील गावकरीही अभिमानाने वाळू उपसू दिली जात नसल्याचे छातीवर हात ठेऊन सांगतात़ येथील शेतकऱ्यांनी थेट औरंगाबाद खंडपीठात जाऊन वाळूला विरोध केला़ दरवर्षी शासकीय परिपत्रक ग्रामपंचायतीकडे येते़ गावकरी एकमताने वाळू उचलायची नाही, असे म्हणणे मांडतात़ सर्वानुमते ठराव पारीत होतो़ त्यामुळे पूर्व भागात वाळूचा लिलाव होत नाही. त्यामुळे एक पिढीपासून वाळू नदीपात्रात मोत्यासारखी दिसत आहे़ वाळू जपली तर आपण जिवंत राहू याची खात्री गावक -यांना पटली आहे़त्यामुळे गावातील वाळू गावातच राहिली पाहिजे अशी ग्रामस्थांची धारणा झाली आहे़ गावाच्या परिसरात बांधकामासाठी वाळू लागल्यास नियम ठरवून देण्यात आला आहे़ चारचाकी वाहनातून वाळू वाहतूक नाही़ केवळ बैलगाडीने वाळू वाहण्याची परवानगी आहे़ त्यामुळे मर्यादीत स्वरूपात वाळूचा उपसा सुरू आहे. मुळा नदी पात्रातील वाळू न उचलल्यामुळे भूजल पातळी वाढली आहे़ परिसरात वाळू उचलण्याचे गुंडांनी केलेले प्रयत्न हाणून पडले आहे़ लष्करालादेखील येथील ग्रामस्थांनी वाळू उचलू दिली नव्हती, त्यामुळे वाळू उचलेगिरी करणा-यांच्या मनात भीती निर्माण झाली आहे़ गावक-यांचा वाळू उपसा करण्यास इतका विरोध आहे की कुणी चारचाकी घेऊन नदीपात्रात आले की सर्व गावकरी जमा होतात़गावक-यांची एकी पाहून कुणीही वाळू उचलीत नाही़ आपले वाहन जाळण्याची भीती असल्याने अलिकडील काळात कुणीही वाळू उचलण्याचा साहस करीत नसल्याचे चित्र आहे़वाळू उचलण्याच्या लिलावाला गावकरी ग्रामसभेत विरोध करतात़ वाळू संदर्भात ग्रामस्थांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे़ गाव वाचवयाचे असेल तर वाळ उचलू द्यायची नाही हे ग्रामस्थांचे धोरण आहे़ दररोज दहा ते बारा बैलगाड्या वाळू उचलली जाते़ त्याचा काहीही परिणाम होत नाही़ -विठ्ठल विटनोर, सरपंच, मांजरीवाळू सुरक्षित असल्यानेच विहिरी व बोअरवेलच्या पाण्याची पातळी टिकून आहे़ पिकांना दिलासा मिळाला आहे़ जनावरांच्याही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे़ वाळू घरगुती कामापुरती वापरली जाते़ त्यामुळे गावाचा फायदा होत आहे. - कृशाराम जाधव, शेतकरी

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरी