शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

एसटी नसल्याने विद्यार्थी शाळेपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 4:20 AM

पळवे : २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू झालेले असताना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तालुक्यात जाण्या-येण्यासाठी बसची सुविधा नसल्याने ...

पळवे : २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू झालेले असताना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तालुक्यात जाण्या-येण्यासाठी बसची सुविधा नसल्याने शैक्षणिक नुकसान होत आहे. शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी पारनेर तालुक्यातील पारनेर ते पाडळी-रांजणगाव एसटी बसच्या फेऱ्या सुरू कराव्यात, अशी मागणी पालकांसह ग्रामस्थांमधून केली जात आहे.

म्हसणे सुलतान, बाबुर्डी, भोयरे गांगर्डा, रूई छत्रपती, कडूस, पाडळी रांजणगाव, श्रीगोंदा तालुक्यातील सारोळा सोमवंशी आदी गावांतील विद्यार्थी पारनेर येथील महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. २३ नोव्हेंबर २०२० रोजी शालेय शिक्षण विभागाने इयत्ता ९ ते १२ वीच्या शाळा सुरू करण्यात याव्यात, असे आदेश काढले. शहरातील सर्व एसटी बस टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आल्या. मात्र ग्रामीण भागात अद्याप एसटी बसच्या सेवा बंद असल्याने पालकांसह विद्यार्थ्यांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. विशेषत: शाळा सुरू झाल्यापासून विद्यार्थिनींना शालेय शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. पालकांकडे दुचाकी असणारे शाळेत दुचाकीवरून जातात. मात्र ज्यांच्या पालकांकडे दुचाकी नाहीत अशा विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. शासनाच्या वतीने २७ जानेवारीपासून इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंत शाळा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र अद्याप ग्रामीण भागात एसटी बस सुरू नसल्याने मुलांना शाळेत पाठवायचे कसे, या विवंचनेत पालकवर्ग सापडला आहे.