शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

राज्यातील सर्व शाळा सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 4:14 AM

अहमदनगर : कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्यातील प्राथमिक व माध्यमिक विद्यालय सुरू करण्यास परवानगी देण्यात यावी, अशी मागणी करणारे पत्र पद्मश्री ...

अहमदनगर : कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्यातील प्राथमिक व माध्यमिक विद्यालय सुरू करण्यास परवानगी देण्यात यावी, अशी मागणी करणारे पत्र पद्मश्री पोपटराव पवार यांनी नुकतेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, राज्यमंत्री बच्चू कडू यांना पाठविले आहे.

हिवरे बाजार (जि. अहमदनगर) या आदर्श गावात लोकांचा सहभाग व सामाजिक शिस्त असल्यामुळे हे गाव कोरोनामुक्त झालेले असून त्याच अनुभवातून विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून गावातील शाळा सुरू केली आहे. विद्यार्थी, पालक, शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक व ग्रामपंचायत यांनी स्वत:च्या जबाबदारीवर १५ जून २०२१ पासून ५ वी ते ७ वी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व इ. ८ ते १० वी यशवंत माध्यमिक विद्यालय सुरू केलेले आहे. त्यामुळे विद्यार्थी अतिशय आनंदी आहेत. गेले ८ दिवस कुठल्याही प्रकारची अडचण जाणवली नाही.

हिवरे बाजार हे गाव १५ मे २०२१ रोजी कोरोनामुक्त झाले. त्यात कोरोना सुरक्षा मुख्य समितीत फ्रंटलाईन वर्कर म्हणून प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातील शिक्षक काम करीत होते. त्यामुळे विद्यार्थी व पालक यांच्याशी शिक्षकांचा संवाद चालूच होता. गावातील सर्व्हेतून मुलांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सर्वांनी जबाबदारी स्वीकारून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे जी गावे, वाड्या, वस्त्या व पाडे यामध्ये कोरोनाचा शिरकाव झालेला नाही तसेच जी गावे उत्तम नियोजनातून कोरोनामुक्त झालेली आहेत, अशा ठिकाणी कोरोनाविषयक जबाबदारी पालक, शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायत यांनी घेतल्यास शाळा सुरू करण्यास परवानगी देण्यात यावी, अशी विनंती पवार यांनी या पत्रातून मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

...........

मुले विसरली लिखाण, वाचन

१६ ते ३० मे या कालावधीत प्रत्यक्षात शाळा सुरू करण्याबाबत विद्यार्थी व पालक सर्व्हे करून प्रत्यक्षात चर्चा केली. त्यांची मते जाणून घेतली. त्यातून असे लक्षात आले की, विद्यार्थी लिखाण, वाचन विसरून गेलेले आहेत. ग्रामीण भागात ऑनलाईन अभ्यासक्रमात इंटरनेट व त्या अनुषंगिक इतर सोयी-सुविधा नसल्यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे समोर आले आहे, असे मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.

.......................