शहरं
Join us  
Trending Stories
1
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
2
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार
3
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
6
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
7
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
8
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
9
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
10
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
11
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
12
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
13
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
14
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
15
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
16
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!

सुखी संसारात स्मार्टफोन कालवतोय बिब्बा

By अरुण वाघमोडे | Published: December 23, 2018 11:01 AM

बहुतांशीवेळा क्षुल्लक कारणांतून पती-पत्नीत वाद होतात़ हे वाद मात्र क्षणिक असतात़ स्वारी म्हटले की, पुन्हा संसाराचा गाडा रूळावर येतो

अरुण वाघमोडेअहमदनगर : पती-पत्नीच्या वादात एकेकाळी सासरी पती, सासू-सासऱ्याकडून त्रास, हुंड्यासाठी छळ, पतीचे व्यसन, विवाहबाह्य सबंध हे कळीचे मुद्दे ठरत होते. बदल्या काळात मात्र ‘मोबाईल आणि सोशल मीडिया’ संसार तुटण्यास कारणीभूत ठरत आहे.जिल्हा पोलीस दलाच्यावतीने महिलांसाठी चालविल्या जाणा-या दिलासा सेलकडे १५ आॅगस्ट २०१७ ते डिसेंबर २०१८ या काळात एकूण पती-पत्नीच्या वादातून २२३५ तक्रारी दाखल झाल्या आहेत. दिलासा सेलकडून झालेल्या समुपदेशनातून यातील ७५४ जोडप्यांनी आपसातील वाद मिटविले आहेत. ४६६ जणांनी स्वतंत्र निर्णय घेतला आहे. २१५ प्रकरणे गुन्हा दाखल पात्र ठरली आहेत.८ जणांना मानसोपचार तज्ज्ञांकडे पाठविण्यात आले आहे तर ७ जोडप्यांनी घटस्पोट घेतला आहे. एकूण दाखल तक्रांरीपैकी ४५ ते ५० टक्के प्रकरणात मोबाईल हेच वादाचे कारण समोर आले आहे.

बहुतांशीवेळा क्षुल्लक कारणांतून पती-पत्नीत वाद होतात. हे वाद मात्र क्षणिक असतात़ स्वारी म्हटले की, पुन्हा संसाराचा गाडा रूळावर येतो. गेल्या काही वर्षांत मात्र या नाजूक नात्याला ‘स्मार्ट फोन’ची दृष्ट लागली आहे. दिलासा सेलकडे गेल्या वर्षभरात पती-पत्नीच्या वादातून दाखल झालेल्या २२३५ तक्रारींपैकी ९०० जोडप्यांनी मोबाईल हेच वादाचे कारण नमूद केले आहे. मोबाईलमुळे काडीमोडपर्यंत आलेल्यांमध्ये नवविवाहितांची सर्वाधिक संख्या आहे.१५ आॅगस्ट २०१७ ते डिसेंबर २०१८ - २२३५ - तक्रारी दाखलपत्नींच्या तक्रारीपती तासनंतास मोबाईलवर बोलतो, आॅफिसमधून घरी आल्यानंतर व्हाटसअ‍ॅप आणि फेसबुकवर व्यस्त असतो, मला वेळ देत नाही, माझ्यापेक्षा त्याला त्याच्या व्हाटसअ‍ॅपवरील मैत्रिणी महत्त्वाच्या वाटतात, समजावून सांगितले तर माझ्यावरच रागावतो, मुलांना वेळ देत नाही, घरातील सर्व कामे मलाच करावे लागतात, मला त्याच्या मोबाईल पाहून देत नाही, त्याच्या मोबाईलचा पासवर्ड सांगत नाही. माझी त्याला कदरच नाही, माझी भावना तो समजून घेत नाही. तो आता माझ्यावर पहिल्यासारखं पे्रम करत नाही, मोबाईल ‘माझी सवत’ झाली आहे.पतींच्या तक्रारीआॅफिसमधील कारणांमुळे फोनवर बोलावे लागते, व्हॉटसअप गु्रप हा आता व्यवसायाचा भाग झाला आहे.  ‘ती’ शुल्लक कारणातून सतत कटकट करत असते. छोट्या-मोठ्या गोष्टींवरून संशय घेते. मी तिला घरात काहीच कमी पडू देत नाही.  माझ्यापेक्षा ती जास्त मोबाईलवर बोलते, तिच्या जुन्या मित्रांच्या ती संपर्कात आहे, माहेरी जास्त बोलते, तिच्या नातेवाईकांमध्ये माझी तिने बदनामी केली आहे. ती घरी असते तिला कशाला हवा स्मार्ट फोन, हिच्यामुळे माझे वैयक्तिक आयुष्य संपून चालले आहे. हिच्या कटकटीला मी आता वैतागलो आहे.

मुलांची फरपटपती-पत्नीतील भांडण विकोपाला गेल्यानंतर हा वाद प्रथम नातेवाईकांकडे जातो़ तेथे काहीच तोडगा निघाला नाही. तर पत्नी थेट माहेरी निघून जाते़ वाद आणखी वाढतो. त्यानंतर पोलीस ठाण्यात तक्रारी आणि हे प्रकरण दिलासा सेलकडे येते. दिलासा सेलमध्ये पती-पत्नी व त्यांच्या नातेवाईकांना एकत्र बोलावून समजावून सांगितले जाते. यातील काही जण आपसातील वाद मिटवून घेतले आहेत तर काहीचें वाद थेट विकोपाला गेल्याने ‘घटस्पोट’ हाच पर्याय त्यांनी निवडला आहे़ यामध्ये त्यांच्या मुलांची फरपट होत आहे.पती-पत्नींमध्ये मोबाईलमुळे वाद होण्याचे सर्वाधिक प्रमाण आहे. मोबाईल हे कारण क्षुल्लक वाटत असले तरी याच कारणातून सुखी संसार विस्कटलेले दिसतात़. दिलासा सेलकडे आलेल्या जोडप्यांचे समुपदेशन केले जाते. त्यांच्या नातेवाईकांनाही समजावून सांगितले जाते.  घटस्पोटाचे दुष्परिणाम त्यांना सांगितले जातात. यातून अनेकांचे प्रबोधन होते़ काही प्रकरणात वाद विकोपालाच गेला असते तर संबंधित महिलेला कायदेशीर मदत केली जाते. - कल्पना चव्हाण, निरीक्षक, दिलासासेल

 

टॅग्स :Ahmed Shahzadअहमद शहजादahmednagar policeअहमदनगर पोलीस