शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
विराट कोहलीचा भन्नाट रन आऊट! नाका तोंडाशी पाणी आल्यावर RCB कडून झाली सांघिक कामगिरी
3
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
4
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
5
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
6
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

शिर्डी मतदारसंघ पाणीदार करणार : सदाशिव लोखंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2019 4:47 PM

काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने समन्यायी पाणी वाटप कायदा केला.

शिवाजी पवारश्रीरामपूर : काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने समन्यायी पाणी वाटप कायदा केला. त्यांच्याच पापामुळे मराठवाड्याला पाणी देण्याची वेळ आली आहे. घाटमाथ्यावरून समुद्राला वाहून जाणारे ६० टीएमसी पाणी प्रवरा व गोदावरी खोऱ्यात वळवून येथील पाणी प्रश्न कायमचा सोडविण्यासाठी पुढील पाच वर्षात प्रयत्न करणार आहे, असे आश्वासन खासदार सदाशिव लोखंडे यांनी दिले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुक्रवारी येथे झालेल्या सभेसाठी आले असता लोखंडे यांच्याशी ‘लोकमत’ ने संवाद साधला. यावेळी शिवसेनेचे संपर्क प्रमुख आमदार नरेंद्र दराडे, अशोक थोरे हे उपस्थित होते. लोखंडे यांनी अनेक मुद्यांवर दिलखुलास संवाद साधला. विरोधकांकडून करण्यात आलेल्या आरोपांचाही त्यांनी चांगलाच समाचार घेतला. लोखंडे म्हणाले, आघाडी सरकारने जरी निळवंडे धरण पूर्णत्वाला नेले असले तरी तेवढे पुरेसे नाही. जोपर्यंत शेतात पाणी पोहोचत नाही, तोपर्यंत त्या कामाला काहीही अर्थ नाही. आपण केंद्र सरकारकडून धरणाला मंजुरी मिळवून देत कालव्याच्या कामांना चालना दिली. मतदारसंघातील पूर्वेकडील श्रीरामपूर, नेवासे, राहुरीच्या काही भागाच्या पाण्याचाही आपण विचार केला आहे. घाटमाथ्यावरचे पाणी वळविण्याचा प्रस्ताव केंद्राकडे दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सकारात्मक आहेत. हा प्रकल्प झाल्यास नगरसह मराठवाड्याचाही पाणी प्रश्न सुटणार आहे. मतदारसंघात आपण कृषी उत्पादक कंपन्या सुरू केल्या. त्यामुळे शेती उद्योगाला चांगले दिवस येतील. देशात शिर्डीसाठी या कंपन्या मंजूर करून आणल्या. ही संधी फार थोड्या खासदारांना मिळाली, असे लोखंडे म्हणाले.प्रत्येक तालुक्यात विकासाचा समतोल साधलाश्रीरामपुरच्या टपाल कार्यालयात नुकतेच पासपोर्ट कार्यालय सुरू केले. त्यामुळे येथील तरूणांना परदेशात जाता येणार आहे. देशात फार मोजक्याच ठिकाणी ही मंजुरी मिळाली आहे.विकास करताना मतदारसंघातील प्रत्येक तालुक्याच्या विकासाचा समतोल साधण्याचा प्रयत्न आहे. पुढील पाच वर्षासाठी माझ्या चांगल्या योजना आहेत, असे ते म्हणाले.विरोधी उमेदवाराचा प्रशासनावर वचक नाही. त्यांच्याकडून कामे होत नाहीत. हे सर्व जनतेला माहीत आहे. माझ्याकडे कामाचा चांगला अनुभव आहे, असे लोखंडे यांनी सांगितले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरshirdi-pcशिर्डीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019