शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
3
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
4
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
5
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
6
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
7
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
8
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
9
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
10
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
11
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
12
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
13
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
14
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
15
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
16
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
17
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
18
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
19
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
20
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले

कोरोनामुळे दुसऱ्यांदा संगमनेरातील ‘विजय रथोत्सव’ रहित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 4:21 AM

असा आहे ‘विजयरथोत्सवा’चा इतिहास विजय रथोत्सवावर १९२७ ते १९२९ अशी सलग तीन वर्षे ब्रिटीशांनी बंदी घातली होती. बंदीचा विरोध ...

असा आहे ‘विजयरथोत्सवा’चा इतिहास

विजय रथोत्सवावर १९२७ ते १९२९ अशी सलग तीन वर्षे ब्रिटीशांनी बंदी घातली होती. बंदीचा विरोध झुगारून १९२७ साली ब्रिटीशांनी अडविलेल्या रथाची पाच दिवसांनंतर व १९२८ साली दोन महिने पूजा केल्यानंतर हा रथ पुढे नेण्यात आला. २३ एप्रिल १९२९ साली हनुमान जन्ममोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आदल्या दिवशी रथोत्सवावर बंदी घालण्यात आली. जन्मोत्सवाच्या पहाटे मंदिर परिसरासह मिरवणूक मार्गावर सुमारे पाचशे पोलिसांचा गराडा पडला. पहाटे मंदिरातील धार्मिक कार्यक्रम पार पडल्यानंतर सकाळी नऊ वाजेच्या सुमारास रथात दोन लहान मुलींनी हनुमानाची छोटी मूर्ती ठेवण्याचा प्रयत्न केला असता, पोलिसांनी त्यांना अडवत ती मूर्ती पुन्हा मंदिरात नेऊन ठेवली. पोलीस मिरवणुकीस करत असलेला विरोध पाहून अनेकजण घरी गेले. अचानक एवढ्यात दोनशे-अडीचशे महिलांनी एकत्र येऊन रथाचा ताबा घेतला. ही बातमी गावात वाऱ्यासारखी पसरताच मंदिर परिसरात महिलांची संख्या वाढली. पोलिसांनी त्यांच्याशी अनेक युक्तिवाद केले, भीती दाखविली, अटक करण्याची-खटले भरण्याची धमकीही दिली. परंतु आदिशक्तीचे रूप धारण केलेल्या महिलांनी रथ पुढे नेण्याचा निर्धार केला.

पोलिसांनी काही तरुणांना बेड्या घालून अटकेचा प्रयत्न केला व याच गडबडीचा फायदा घेत झुंबरबाई अवसक, बंकाबाई परदेशी, लीला पिंगळे व इतर महिलांनी रथावर चढून हनुमान प्रतिमा ठेऊन ‘बलभीम हनुमान की जय’असा गजर करीत रथाचा दोर ओढून तो पुढे नेला. तेव्हापासून प्रथम हा रथ ओढण्याचा मान महिलांना आहे. पोलिसांनी मिरवणुकीने आणलेला केशरी ध्वज रथावर लावल्यानंतर त्यांच्या हस्ते मारूतीरायाच्या उत्सव मूर्तीची पूजा होऊन रथोत्सवाला सुरुवात होते.