शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
3
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
4
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
5
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
6
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
7
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
8
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
9
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
10
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
11
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
12
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
13
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
14
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
15
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
16
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
17
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
18
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
19
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
20
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं

भंडारदरा-मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात रिमझिम पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2020 12:36 PM

अकोले : आर्द्रा नक्षत्राच्या आषाढसरींची भुरभुर सोमवारी शहर परिसराने अनुभवली तर सायंकाळी भंडारदरा व मुळाधरण पाणलोटातील हरिश्चंद्रगड- रतनगड- घाटघर-कळसूबाई परिसरात हलका ते मध्यम पाऊस सुरू झाला.

अकोले : आर्द्रा नक्षत्राच्या आषाढसरींची भुरभुर सोमवारी शहर परिसराने अनुभवली तर सायंकाळी भंडारदरा व मुळाधरण पाणलोटातील हरिश्चंद्रगड- रतनगड- घाटघर-कळसूबाई परिसरात हलका ते मध्यम पाऊस सुरू झाला. दुबार पेरणीचे संकट सध्या टळले असले तरी शेतकºयांना आषाढाच्या जोरदार सरींची आस लागली आहे. भंडारदरा धरणात यंदा केवळ साडेसात टक्के नवे पाणी आले असून आजमितीस २६ टक्के जलसाठा आहे. 

यावर्षी २९ जून २०२०ला घाटघर येथे अवघा १६ तर पांजर येथे १५ मिलीमीटर पाऊस झाला. गत वर्षी २९ जून २०१९ ला जिल्ह्याची चेरापुंजी घाटघर येथे ११५ मिलीमीटर म्हणजे पावणेपाच इंच पाऊस पडल्याची नोंद होती. यंदा मात्र पावसाच्या आगारातच पावसाने दडी मारल्याने भात उत्पादक आदिवासी शेतकºयांची चिंता वाढली आहे.तालुक्यातील पश्चिम घाटमाथ्यावरील डोंगर-शिखरांशी ढगांची झुंबी होत मान्सून सक्रिय होण्याची वाट शेतकरी पाहत आहे. जोराचा पाऊस आला तरच तरारलेल्या भात रोपांची आवणी सुरु होईल. 

भंडारदरा धरणात सोमवारी नव्या २३ तर  १ जून २०२० पासून ८३४ दशलक्ष घनफूट पाण्याची आवक झाली आहे. मात्र वीजनिर्मिती चालू प्रकल्प असल्याने भंडारदरा धरणातून ८१९ क्युसेकने निळवंडेत पाणी सोडले जात आहे. १९८ दलघफू क्षमतेचा आंबीत लघु पाटबंधारे तलाव ओसंडून वाहू लागला आहे. तालुक्यातील इतर तेरा छोटे लघुपाटबंधारे प्रकल्प मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. मुळानदी वाहती होत पिंपळगावखांड प्रकल्पात पाण्याची आवक सुरु झाली, मात्र ती अल्प आहे. चार दिवसांपूर्वी तालुक्यात शुक्रवारी २५ तारखेला अकोले शहर परिसरात ६६ मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. वातावरणातील उकाडा वाढला आणि आकाशात ढग जमा होताना दिसत आहेत, पण पाऊस बरसत नाही अशी स्थिती होती. दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर सोमवारी सायंकाळी उशिरा पावसाच्या हलक्या सरींना सुरुवात झाली. भाताची रोपे तरारली असून भातशेती मशागतीलाही काही ठिकाणी सुरुवात झाली आहे.  भंडारदरा धरणात २ हजार ८५० दशलक्ष घनफूट तर निळवंडे धरणात ३ हजार ९२० दशलक्ष घनफूट पाणीसाठा आजमितीस आहे. १ हजार ६० दलघफू क्षमतेच्या आढळा धरणात ३८० पाणीसाठा आहे. मुळा धरणाचा सध्याचा पाणीसाठा ७ हजार ३३४ दलघफू असून यंदा केवळ ५१२ दलघफू नव्या पाण्याची आवक आतापर्यंत झाली आहे. पाऊस सुरु होताच तालुक्यातील रस्त्यांमधील खड्ड्यांची तोंड उसवू लागली आहेत. अकोले परिसरात खड्ड्यांमध्ये पाणी साठल्याने गाळ राबडीतून गाड्यांना वाट काढावी लागत आहे.