शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
3
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
4
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
5
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
6
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
7
मुंबई इंडियन्सच्या संघात अंशुल कंबोजची एन्ट्री! टॉस जिंकून २३ वर्षीय ऑल राऊंडरला दिली संधी, जाणून घ्या कोण आहे तो
8
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
9
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
10
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
11
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
12
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
13
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
14
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
15
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
16
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
17
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
18
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
19
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
20
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  

एक लाख मराठ्यांना उद्योजक बनविणार -नरेंद्र पाटील 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2020 11:52 AM

राज्यातील एक लाख मराठ्यांना उद्योजक बनविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे प्रतिपादन महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी नगर येथे केले.

अहमदनगर : मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांना सोबत घेत अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करणार असून, राज्यातील एक लाख मराठ्यांना उद्योजक बनविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे प्रतिपादन महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी नगर येथे केले.पुणे महामार्गावरील मंगल कार्यालयात आयोजित अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ घेऊन उद्योजक व्हा, या कार्यक्रमात पाटील बोलत होते. आमदार संग्राम जगताप, माजी महापौर शीला शिंदे, उद्योजक चंद्रकांत गाडे, नगरसेवक गणेश भोसले, विनीत पाअुलबुधे, माजी नगरसेवक  बाळासाहेब पवार, निखील वारे, माजी सभापती सचिन जाधव आदींची प्रमुख उपस्थित होती. नरेंद्र पाटील पुढे म्हणाले, राजकीय जोडे बाजूला ठेवून अण्णासाहेब विकास महामंडळाची वाटचाल सुरू आहे. योजनेसाठी कुठल्याही राजकीय नेत्यांची शिफारस लागत नाही. कर्जाची संपूर्ण प्रक्रिया आॅनलाईन आहे. महामंडळाच्या योजनांची माहिती आणि येणा-या अडचणी सोडविण्यासाठी जिल्हा व तालुकानिहाय दौरे सुरू करण्यात आले आहे. दौºयांची सुरुवात जालना जिल्ह्यातून करण्यात आली. मराठा क्रांती मोर्चाच्यावेळी अनेकांनी समन्वयक म्हणून सक्षमपणे जबाबदारी पार पडली. मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांची जिल्हानिहाय बैठका घेण्यात येतील. या बैठकांमध्ये योजनांचा लाभ घेण्यासाठी येणाºया अडचणी सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल. शहरी भागात योजनांचा लाभ मिळेलच. परंतु, ग्रामीण भागातील युवकांना दिशा मिळत नाही. त्यांना दिशा देण्याचे काम महामंडळांच्या माध्यमातून केले जाणार असून, ही योजना शेतकºयांच्या बांधावर पोहोचविण्याचा मानस आहे, असे पाटील म्हणाले.सरकार घरी आणून रोजगार देणार नाही. उद्योजक बनण्यासाठी स्वत:च प्रयत्न करावे लागतील. महामंडळाच्या योजनांचा लाभ घेऊन उद्योजक होण्याचे स्वप्न पूर्ण करा, असे आवाहन पाटील यांनी यावेळी केले. यावेळी आमदार संग्राम जगताप यांच्यासह मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.राज्यातील १० हजार समाज बांधव महामंडळाच्या योजनांचा लाभ घेऊन स्वत:च्या पायावर उभे राहिले आहेत. आणखी ९० हजार उद्योजक बनविण्याचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक म्हणून काम केलेल्यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. सरकार समाजाच्या मागे खंबीरपणे उभे आहे, असेही नरेंद्र पाटील म्हणाले. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरbusinessव्यवसाय