शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
2
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
3
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
4
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
5
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
6
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
7
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
8
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
9
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
10
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
11
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
12
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
13
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
14
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
15
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
16
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
17
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
18
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
19
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
20
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!

बँकांच्या असहकार्यामुळे सायबर गुन्ह्यांचा तपास रखडला; गुन्हेगारांकडून बँक खात्यांचा गैरवापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2019 2:24 PM

सायबर गुन्ह्यांच्या तपासात पोलिसांना बँकांकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याने येथील सायबर पोलीस ठाण्यातील ५०० तक्रारींचा तपास रखडला आहे.

अरुण वाघमोडे । अहमदनगर : सायबर गुन्ह्यांच्या तपासात पोलिसांना बँकांकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याने येथील सायबर पोलीस ठाण्यातील ५०० तक्रारींचा तपास रखडला आहे. पोलिसांच्या मदतीसाठी बँकांना नियंत्रित करणारी अथवा आदेश देऊ शकणारी कुठलीच यंत्रणा कार्यरत नसल्याने तपासी अधिका-यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. ९९ टक्के सायबर गुन्ह्यांत आॅनलाईन पैसे चोरतांना चोरटे बँक खात्यांचा वापर करतात. अशा गुन्ह्यांत पोलिसांच्या तपासाची सुरुवात तक्रारदार आणि गुन्हेगाराचा बँक खाते क्रमांक आणि आयएफएससी कोडपासून होते. सायबर गुन्हेगार तक्रारदाराच्या बँक खात्यातून स्वत:च्या खात्यात पैसे ट्रान्सफर करतात़ अथवा वेगवेगळे आमिष दाखवून बँक खात्यांवर पैसे भरण्यास सांगितले जाते. अशा स्वरुपाची फसवणूक झालेले तक्रारदार सायबर पोलीस ठाण्यात तक्रार देतात. तक्रारदाराचे पैसे परत मिळण्याच्या दृष्टीने सायबर टीम तपासाला सुरुवात करते. चोरट्याने फसवणुकीसाठी वापरलेल्या बँकेचा पत्ता आयएफएससी कोडवरून पोलिसांना समजतो. अशावेळी पोलीस बंधित बँकेच्या शाखेला ई-मेल करून गुन्हेगाराने फसवणुकीसाठी वापरलेले बँक खाते गोठविण्यास (बंद) सांगतात़ ई-मेलला बँकेने प्रतिसाद दिला नाही तर फोन करूनही विनंती केली जाते. वारंवार रिमाइंडर मेल केले जातात. बँका मात्र पोलिसांच्या विनंतीला प्रतिसाद देत नाही. यामुळे तक्रारदाराला त्यांचे पैसे परत मिळण्यात अडचणी निर्माण होतात तसेच गुन्ह्यांचा पुढील तपासही रखडतो. परराज्यातील बँक खात्यांचा सर्वाधिक वापर च्आॅनलाईन फसवणुकीत येथील सायबर पोलिसांकडे दाखल असलेल्या ५०० तक्रार अर्जांमध्ये परराज्यातील बँक खात्यांचा वापर झाल्याचे समोर आले आहे. आॅनलाईन फसवणूक करणाºया टोळ्या या दिल्ली, नोयडा, झारखंड, मध्यप्रदेश येथील आहेत. या टोळ्या त्यांच्या परिसरात असलेल्या खासगी अथवा राष्ट्रीयकृत बँकांत बनावट नावाने खाते उघडतात. एका टोळीकडून फसवणुकीत अनेक बँक खात्यांचा वापर केला जातो. 

आॅनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्याचा तपास करताना बँकांचे सहकार्य महत्त्वाचे असते़ बँकांनी तत्काळ सहकार्य केले तर तक्रारदाराचे गुन्हेगारांनी लांबविलेले पैसे परत करता येतात.  गेल्या दोन वर्षात सायबर पोलीस ठाण्याच्या माध्यमातून बहुतांशी तक्रारदारांना त्यांचे पैसे परत मिळवून दिलेले आहेत. काही बँका मात्र पोलिसांना प्रतिसाद देत नाहीत. यामुळे वारंवार त्यांचा  पाठपुरावा करावा लागतो. यातून तपास कामात विलंब होतो, असे नगर येथील सायबर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक प्रतीक कोळी यांनी सांगितले.   

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcyber crimeसायबर क्राइम