शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
3
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
4
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
5
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
6
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
7
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
8
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
9
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
10
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
11
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
12
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
13
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
14
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
15
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
16
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
17
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
18
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
19
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
20
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...

रायगडावरील पाखरांना नगरकरांचे बळ

By अरुण वाघमोडे | Published: October 09, 2017 5:43 PM

अहमदनगर : डॉक्टर होण्याचे स्वप्न घेऊन रायगडावर ताक विकणारी दहा वर्षांची कमल शिंदे, तर छत्रपती शिवरायांचे विचार जगभरात पोहोचविण्याची इच्छाशक्ती बाळगणा-या तेरा वर्षांच्या महेश औकिरकरच्या पंखांना बळ देण्याचा निर्णय नगरच्या निरंजन सेवाभावी संस्थेने घेतला आहे़ या दोन्ही मुलांचा सर्व खर्च संस्थेमार्फत करण्यात येत आहे़हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्यावर २० ...

अहमदनगर : डॉक्टर होण्याचे स्वप्न घेऊन रायगडावर ताक विकणारी दहा वर्षांची कमल शिंदे, तर छत्रपती शिवरायांचे विचार जगभरात पोहोचविण्याची इच्छाशक्ती बाळगणा-या तेरा वर्षांच्या महेश औकिरकरच्या पंखांना बळ देण्याचा निर्णय नगरच्या निरंजन सेवाभावी संस्थेने घेतला आहे़ या दोन्ही मुलांचा सर्व खर्च संस्थेमार्फत करण्यात येत आहे़हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्यावर २० ते २५ कुटुंब छत्रपती शिवाजी महारांच्या कार्यकालापासून वास्तव्यास आहेत़ या कुटुंबीयांचे पूर्वज छत्रपतींच्या सैन्यात मावळे होते असे सांगितले जाते़ गडावर येणा-या पर्यटकांना खाण्यापिण्याच्या वस्तू विकून हे कुटुंब आपला उदारनिर्वाह करतात़ याच कुटुंबातील कमल शिंदे ही इयत्ता पाचवीत शिक्षण घेते़ तिचे आई-वडील गडावरच मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात़ खेळण्याबागडण्याच्या वयात कमलवरही कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्याची जबाबदारी आहे़ गडावर दररोज १०० रुपयांचे ताक विकल्यावरच कमल शाळेत जाते़ कमलचे डॉक्टर होण्याचे स्वप्न आहे़ यासाठी तिची कितीही कष्ट करण्याची तयारी आहे़गडावरच राहणारा दुसरा महेश औकिरकर इयत्ता आठवीत शिक्षण घेतो़ छत्रपती शिवाजी महाराजांवर अतिशय प्रभावी भाषेत आणि खास शैलीत तो व्याख्यान देतो़ शिवाजी महाराजांचे कार्य आणि कर्तृत्व भारत देशासह जगभरात पोहोचावे असे महेश याला वाटते़ या दोन चिमुकल्यांच्या स्वप्नांना सत्यात उतरविण्यासाठी निरंजन सेवाभावी संस्थेच्या नगर शाखेच्या सदस्यांनी निर्णय घेतला आहे़ या दोन्ही मुलांना कायमस्वरूपी दत्तक घेतले असून, त्यांचा सर्व खर्च संस्थेच्या माध्यमातूनच करण्यात येत आहे़ संस्थेचे सदस्य अतुल डागा, किरण मणियार, रविकांत काबरा, प्रसाद बेडेकर, स्वप्नील कुलकर्णी यांसह अनेक नगरकर या उपक्रमात सहभागी आहेत़

६० विद्यार्थ्यांचे पालकत्व

निरंजन सेवाभावी संस्थेने रायगड जिल्ह्यातील हिरकणीवाडी, महाड शाळेतील ६० विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारले आहे़ या मुलांना शाळेचा गणवेश, बूट, दप्तर, वह्या-पुस्तके आणि वर्षभर पुरेल इतके शैक्षणिक साहित्य देण्यात आले आहे़

अनेक गरीब कुटुंबातील मुले केवळ पैशांअभावी शिक्षणापासून वंचित राहत आहेत़ समाजातील अशाच काही मुलांचे शैक्षणिक भवितव्य उज्ज्वल व्हावे याच उद्देशातून निरंजन सेवाभावी संस्थेच्यावतीने गेल्या तीन वर्षांपासून ‘शैक्षणिक पालकत्व’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे़ सर्वसामान्य कुटुंबातील अनेक मुलांना आपल्या मदतीची गरज आहे़ समाजातील दानशूर व्यक्तींनी आमच्या या कामात हातभार लावावा़^-अतुल डागा, सदस्य निरंजन सेवाभावी संस्था