शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
2
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
3
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
4
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
5
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
6
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
7
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
8
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
9
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
10
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
11
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
12
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
13
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
14
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
15
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
16
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
17
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
18
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
19
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
20
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं

जागरण गोंधळ पार्टीत रमणारा मुंबईचा पोलीस 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2019 12:34 PM

मुंबई पोलीस दलात नोकरी सांभाळून अविनाश विलास धुमाळ हा जागरण गोंधळ पार्टीत काम करून लोककला जपण्याचा प्रयत्न करीत आहे. हे कौतुकास्पद काम करणारा अविनाश हा मूळचा देऊळगाव (ता. श्रीगोंदा) येथील आहे. लहानपणापासूनच तो जागरण गोंधळ पार्टीत काम करत आहे.

बाळासाहेब काकडे। श्रीगोंदा : मुंबई पोलीस दलात नोकरी सांभाळून अविनाश विलास धुमाळ हा जागरण गोंधळ पार्टीत काम करून लोककला जपण्याचा प्रयत्न करीत आहे. हे कौतुकास्पद काम करणारा अविनाश हा मूळचा देऊळगाव (ता. श्रीगोंदा) येथील आहे. लहानपणापासूनच तो जागरण गोंधळ पार्टीत काम करत आहे.अविनाश हा २०१० ला मुंबई पोलीस दलात भरती झाला. सध्या तो कमांडो पथकात काम करत आहे. मात्र ज्या जागरण गोंधळ पार्टीने शिकण्यासाठी बळ दिले. त्या जागरण गोंधळ पार्टीत मुंबईचा हा कमांडो कधी वाघ्या तर कधी संबळ वादकाचे काम करत आहे. देऊळगाव येथील विलास व अनुसया जाधव यांचा पिढीजात जागरण गोंधळ पार्टीचा व्यवसाय आहे. त्यांना दीपाली व अविनाश ही दोन मुले आहेत. अविनाश दोन वर्षाचा असतानाच विलास यांचे निधन झाले. अनुसया यांनी जागरण गोंधळामध्ये मुरळीचे काम चालू ठेवले. या माध्यमातूनच त्यांनी मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष दिले.अविनाश हा लहानपणी सुट्टीत जागरण गोंधळ पार्टीत जायचा. देऊळगाव येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये दहावीपर्यंतचे शिक्षण झाले. पुढील शिक्षणासाठी बारामती येथील दादा चंदर गोसावी (काका) यांच्याकडे पाठवले. अकरावी, बारावी विद्या प्रतिष्ठान महाविद्यालयात झाली. अविनाश हा मुंबई पोलीस दलात भरती झाला. अविनाशने मुंबई विद्यापीठात बी. ए. केले. सध्या तो क्यूआरटी पथकात कमांडो म्हणून सेवा करीत आहे. त्याची बहीण दीपालीचा विवाह झाला असून तीही श्रीगोंदा शहरात ब्युटी पार्लरचे काम करते. अविनाशचा पदवीधर प्राचीबरोबर विवाह झाला. ती स्पर्धा परिक्षेची तयारी करत आहे. अविनाश लहानपणापासून जागरण गोंधळ पार्टीत काम करण्याची आवड आहे. त्याने लोककला जोपासण्यासाठी जागरण गोंधळ पार्टीत काम करणे सुरूच ठेवले आहे. तो काम सांभाळून या पार्टीत काम करतो. सुटीत जागरण गोंधळाचे काम किल्लारीला भूकंप झाला. त्या दरम्यान पतीचे निधन झाले. अविनाश व दीपालीला गरिबीचे चटके बसले. तरही मुले शिकली. अविनाश मुंबईत पोलीस झाला. तो गावी सुटीला आला की माझ्याबरोबर जागरण गोंधळ पार्टीत काम करतो, असे देऊळगावच्या अनुसया धुमाळ यांनी सांगितले. आईसाठी शिकलो लोककलामाझ्या वडिलांचा लहानपणीच मृत्यू झाला. आईने जागरण गोंधळ पार्टीत असताना मला मुरळी, संबळ वादन, वाघ्याचे काम शिकविले. त्यामुळे तिला मदत व्हायची. याशिवाय काकांनी आधार दिला. त्यामुळे पोलीस दलात जाऊ शकलो. आज त्यांना आधार व्हावा व लोककला जोपण्यासाठी सुटीच्या काळात जागरण गोंधळ पार्टीत काम करतो, असे मुंबई पोलीस दलातील कर्मचारी अविनाश धुमाळ यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले़.

टॅग्स :artकलाshrigonda-acश्रीगोंदा