शहरं
Join us  
Trending Stories
1
त्या मुलामुळे माझ्या मुलाला शाळा सोडावी लागली; प्राजक्त तनपुरेंच्या पत्नीचे गंभीर आरोप
2
आजचे राशीभविष्य: विधायक कार्य घडेल, वाहनसुख मिळेल; पैसा-प्रतिष्ठा लाभेल, कौतुक होईल
3
पडक्या हॉटेलमध्ये लपलेल्या बिल्डर अग्रवालला अखेर अटक; ‘बाळा’ने दोन तासांत उडवले ४८ हजार
4
मतदानाच्या विलंबाची कारणे शाेधणार, निवडणूक कार्यालयात हालचालींना वेग
5
रेसमध्ये आम्हीच पुढे! बारावीचा निकाल ९३.३७%; २.१२% वाढली यंदा उत्तीर्णाची संख्या 
6
बालन्याय मंडळाचा निर्णय धक्कादायक, कारवाईत हयगय होणार नाही - फडणवीस
7
३७ हजार फूटांवर विमानाला वाऱ्याचा तडाखा; एका प्रवाशाचा मृत्यू, ३० जखमी; ६ मिनिटांत विमान ६ हजार फूट खाली
8
निकालाच्या दिवशी ‘ड्राय डे’ला विरोध; हॉटेल्स ओनर्स असोसिएशनची उच्च न्यायालयात याचिका
9
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
10
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
11
अरेस्ट वॉरंटच्या मागणीविरोधात इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतप्त, ICC ला दिला असा इशारा 
12
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
13
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
14
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
15
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
16
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
17
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
18
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
19
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
20
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या

मोदी-ट्रम्प लोकशाहीचा गळा घोटताहेत : जयदेव डोळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 11:30 AM

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पारंपरिक माध्यमांशी संवाद न साधता सोशल मीडियावर भिस्त ठेवून आपला अजेंडा राबवित आहेत, 

ठळक मुद्देसोशल मीडियाचा उत्पात समाजासाठी घातक

अहमदनगर : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पारंपरिक माध्यमांशी संवाद न साधता सोशल मीडियावर भिस्त ठेवून आपला अजेंडा राबवित आहेत, हे कृत्य लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार आहे, असे मत माध्यमतज्ज्ञ प्रा़ जयदेव डोळे यांनी मंगळवारी ‘लोकमत संवादात’ व्यक्त केले.डोळे म्हणाले, सध्या संपूर्ण जगात सोशल मीडियाचा उत्पात सुरू आहे. फेसबूक, टिष्ट्वटर, व्हॉटस्अ‍ॅप या माध्यमांचे मालक परदेशात बसून पैसा कमवितात. त्यांचे फॉलोअर्स जितके जास्त तितका अधिक पैसा त्यांना मिळतो.आपले हित साधण्यासाठी विशिष्ट वर्गाकडून या माध्यमांचा वापर करून समाजात खोटे आणि चुकीचे पसरविले जात आहे. यातूनच दंगली घडतात. याउलट पारंपरिक माध्यमे आजही विश्वासपात्र आहेत. वर्तमानपत्रातून अफवा पसरविली म्हणून कधी कोणत्या संपादकाला शिक्षा झालेली नाही. मास मीडिया लोकशाहीला बळकट करण्याचे काम करतो तर सोशल मीडिया हा याच लोकशाहीला डळमळीत करत आहे. हा फरक समजून न घेता देशाचे प्रमुख जर सोशल मीडियावर भिस्त ठेवत असतील तर हे दुर्दैवी आहे. मोदी तर बोलतात एक आणि करतात भलतेच. त्यांचे मंत्री तर स्वत:चेच विधान वारंवार बदलून समाजाची दिशाभूल करत आहेत, असे सांगत डोळे म्हणाले, इतर कोणत्याही माध्यमांपेक्षा वर्तमानपत्र हेच विश्वासपात्र आणि टिकाऊ माध्यम आहे. म्हणूनच समाज या माध्यमाकडे अपेक्षेने पाहतो. बातमी काय घडली यासह का घडली? याचे विश्लेषण येणेही गरजेचे आहे. पत्रकाराकडे विविध विषयांची माहिती असली तरी तिचा वापर कसा करावयाचा हे समजून घ्यावे. स्पर्धेच्या काळात चुकीची बातमी जाऊ नये, बातमीत नकळतपणे घडलेली चूकही समाजावर विपरित परिणाम करणारी ठरते असे डोळे म्हणाले.परदेशी मीडियातून वास्तव जगासमोरदिल्ली आणि मुंबईत परदेशी पत्रकारांची संख्या मोठी आहे. हे पत्रकार या देशातील गरिबी, महिलांचे शोषण, दलितांवरील अत्याचार, मानवी तस्करी, मीडियावरील हल्ले आदी विषय मांडतात़ ही विश्वासार्ह पत्रकारिता आहे़ परदेशी मीडियाच्या माध्यमातून देशातील हे चित्र जगासमोर जात असताना आपल्याकडील मोदी भक्त मात्र अवास्तव आणि कल्पित घटनांचा प्रसार आणि प्रचार करण्यात व्यस्त आहेत. यातून एक मोठी विसंगती निर्माण होताना दिसत आहे. आपल्याकडील स्थानिक माध्यमांनीही विविध विषयांवर संशोधन करून वेगवेगळे विषय लोकांसमोर मांडावेत. हे करताना समाजाची दिशाभूल होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे असे डोळे म्हणाले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर