शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

धर्मांध शक्तींना रोखण्यासाठी ‘मिशन माणुसकी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 4:21 AM

लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : जगभरात अनेक देशांत धर्मांध शक्तींची सत्ता लोकांवर लादली जात आहे. या धर्मांध सत्ताधिकाऱ्यांनी मानवी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अहमदनगर : जगभरात अनेक देशांत धर्मांध शक्तींची सत्ता लोकांवर लादली जात आहे. या धर्मांध सत्ताधिकाऱ्यांनी मानवी मुल्यांचा विनाश आरंभला आहे. परिणामी माणसांचे माणसांपासून अलगीकरण करण्याची धूर्त खेळी सत्ताधाऱ्यांकडून खेळली जात आहे. त्यामुळे या धर्मांध शक्तींना रोखण्यासाठी ‘मिशन माणुसकी’ अभियान राबवून माणसात माणूसपण पेरणारी माणुसकीची शाळा राज्यात सुरु केली आहे. त्यासाठी १०२ शिक्षक राज्यभरात शिबिरे घेणार असून, लोकांना माणूसपणाची शिकवण दिली जाणार आहे, असे लोकशाहीर संभाजी भगत यांनी सांगितले.

कोरोनानंतर नगरमध्ये रविवारी (दि. २४) माणुसकीची कार्याशाळा झाली. यानिमित्ताने भगत यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला. ते म्हणाले, सध्या जगभरात धर्मांध शक्ती सत्तेवर आहेत. त्यांच्याकडून मानवी मुल्यांचे अध:पतन सुरु आहे. माणूस माणसापासून तुटत असून, हे धर्मांध सत्ताधारी संघटित होत आहेत. त्यांनी संघटित होऊन मानवी मुल्यांचा ऱ्हास करुन लोकांवर विलगीकरणाची व्यवस्था लादली आहे. मानवी मूल्य पुन्हा लोकांमध्ये रुजवून लोकांनी एकमेकांकडे माणूस म्हणून पाहायला शिकले पाहिजे, मानवतावादी दृष्टीकोन वाढीस लागला पाहिजे, यासाठी मिशन माणुसकी अंतर्गत माणुसकीची शाळा राज्यभर सुरु करण्यात आली आहे, असे भगत यांनी सांगितले.

...................

मानवी मूल्य शिकवणार

राज्यभरात १०२ शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. हे शिक्षक विविध शिबिरांच्या माध्यमातून लोकांना मानवी मुल्यांची शिकवण देतील. लहान मुलांना गाणी, कविता, खेळ विविध स्पर्धा अशा अनेक माध्यमातून मानवी मूल्य शिकवली जातील. विविध शिबिरांमधून मानवी मूल्य रुजविण्यासाठी एक कार्यक्रम आखण्यात आला आहे. माणुसकीच्या शाळेत तो सर्वांना शिकवला जाणार आहे. ही शाळा सर्वांसाठी मोफत असून, कोणाकडून एक रुपयाही घेतला जात नाही. पोरांपासून थोरांपर्यंत तसेच संपूर्ण कुटुंबही या शाळेत सहभागी होऊ शकते, असे भगत यांनी सांगितले.

...............

मुंबईतून झाली सुरुवात

दीड वर्षापूर्वी मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये माणुसकीच्या शाळेला प्रारंभ झाला. मात्र, पुढे कोरानानंतर ही शाळा बंद झाली. कोरोना काळात ऑनलाईन पद्धतीने ही शाळा वाढली. मारुती शेरकर, डॉ. प्रा. प्रतिभा जाधव, शिवाजी नाईकवाडी, प्रवीण जठार असे अनेक लेखक, शिक्षक, मानवतावादी कार्यकर्ते ‘मिशन माणुसकी’सोबत जोडले आहेत. कोणताही राजकीय पक्ष, संघटना टाळून ही माणुसकीची शाळा चालवली जाणार आहे, असे भगत म्हणाले.