शहरं
Join us  
Trending Stories
1
"होय, मी चुकलो! आता प्रायश्चित्त म्हणून..."; भाजपाचे संबित पात्रा यांनी मध्यरात्री पोस्ट केला व्हिडीओ
2
वरळीतील शिवसैनिकाचा मृत्यू, अरविंद सावंत संतापले; निवडणूक आयोगाला धरलं जबाबदार
3
भटकता आत्मा, मोदींची ऑफर अन् बिनशर्त पाठिंबा; लोकसभा निवडणुकीचा फड राज्यात गाजला
4
चूक कोणाची? पोर्शे कंपनीची की आरटीओची? ती कार नोंदणी न करताच रस्त्यावर धावत होती
5
"सचिनच्या जाहिरातीमुळे त्याच्या सुरक्षारक्षकाचा जीव गेला"; गंभीर आरोप करत बच्चू कडूंचा आंदोलनाचा इशा
6
गुरुवारी ‘हे’ स्तोत्र म्हणा, गुरुबळ मिळवा; धनवृद्धी, सुख-समृद्धी योग शक्य, होईल गुरुकृपा!
7
एक राजयोग, चौपट लाभ: ६ राशींची इच्छापूर्ती, सरकारी कामात यश; व्यापारात नफा, प्रमोशन शक्य!
8
'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन! पण महेश मांजरेकर नाही तर 'हा' अभिनेता करणार होस्ट
9
काय आहे F&O ट्रेडिंग, किरकोळ गुंतवणूकदारांच्या वाढत्या संख्येबाबत सरकार का देतेय इशारा?
10
आमिर खान नाही तर सलमान खान होता 'गजनी'साठी पहिली पसंती, या कारणामुळे भाईजानचा पत्ता झाला कट
11
बिहारच्या सारणमध्ये मतदानाच्या दुसऱ्या दिवशी हिंसा, गोळीबार; एकाचा मृत्यू, दोन जखमी
12
कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरण: बिल्डर विशाल अगरवालला अखेर अटक; पुणे पोलिसांची कारवाई
13
लोकसभा : संसदेची सुरक्षा CRPF कडून CISF ने ताब्यात घेतली; कारण काय...
14
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियामध्ये तेजी, नेस्ले घसरला
15
कार्तिक आर्यनसोबत हेमांगी कवी शेअर करणार स्क्रीन; 'चंदू चॅम्पियन'मध्ये साकारतेय महत्त्वाची भूमिका
16
भाजपवर एवढे नाराज की, खासदाराने मतदानही केले नाही; प्रचार तर दूरच... पक्षाने नोटीस धाडली
17
'निवडणूक आयोगाचे मोदींच्या घरगड्यासारखे काम'; उद्धव ठाकरेंच्या आरोपानंतर भाजपने दाखल केली तक्रार
18
इराणच्या राष्ट्रपतींचा अपघात झाला की घातपात? हेलिकॉप्टर अपघाताचे हे आहे रहस्य
19
मुंबईत मतदान केंद्रावर ठाकरे गटाच्या बूथ एजंटचा धक्कादायक मृत्यू; टॉयलेटमध्ये आढळला मृतावस्थेत
20
RBI गव्हर्नर की SBI प्रमुख; कोणाचं वेतन आहे जास्त, पाहा कोणाचं किती आहे शिक्षण?

व्यसनमुक्त जीवन हाच सुदृढ आरोग्याचा मंत्र; कॅन्सरतज्ज्ञ डॉ़. सतीश सोनवणे यांचा सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2020 2:19 PM

सद्यस्थितीला भारतात कॅन्सरने दररोज २२०० जणांचा मृत्यू होतो. त्यामुळे व्यसनमुक्त जीवन हाच सुदृढ आरोग्याचा मंत्र आहे, असे मत मॅक्सकेअर हॉस्पिटलचे संचालक व कॅन्सरतज्ज्ञ डॉ़. सतीश सोनवणे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.

मौख्यिक आरोग्य दिन विशेष/अरुण वाघमोडे/ अहमदनगर : भारतात दरवर्षी नव्याने १५ ते १७ लाख लोकांना कॅन्सर (कर्करोग) होतो. यातील ४० टक्के लोकांना केवळ तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे कॅन्सरची लागण होते. सद्यस्थितीला भारतात कॅन्सरने दररोज २२०० जणांचा मृत्यू होतो. त्यामुळे व्यसनमुक्त जीवन हाच सुदृढ आरोग्याचा मंत्र आहे, असे मत मॅक्सकेअर हॉस्पिटलचे संचालक व कॅन्सरतज्ज्ञ डॉ़ सतीश सोनवणे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले़.जागतिक कर्करोग दिन व मौखिक आरोग्य दिनानिमित्त डॉ. सोनवणे यांच्याशी बुधवारी संवाद साधला. ते म्हणाले, कॅन्सरची अनेक कारणे आहेत. परंतु मुख्यत: तंबाखूचे सेवन, सिगारेट, विडी, गुटखा व दारु यामुळे कॅन्सर होण्याचे प्रमाण जास्त आहे. या व्यतिरिक्त विविध रसायनांचे शरीरावर होणारे परिणाम, जंतूसंसर्ग, शरीराच्या एखाद्या भागाला वारंवार होणारी जखम, शरीरातील हार्मोन्सचे अनियंत्रण, रेडिएशन आदी कारणांमुळेही कॅन्सर होतो. भारतात २५ कोटी तर महाराष्ट्रात अडीच कोटी लोक तंबाखूचे सेवन करतात. यातील २५ टक्के लोकांना कॅन्सरची बाधा झालेली आहे. यावरून तंबाखूजन्य पदार्थाचे दुष्परिणाम आपल्या निदर्शनास येतात. सध्या महाराष्ट्रासह भारतात शासकीय यंत्रणा व विविध सामाजिक संस्थांकडून तंबाखूजन्य पदार्थांबाबत प्रबोधन मोहीम राबविली जात आहे. मात्र यात आणखी व्यापकता यावी, महाराष्ट्रात गुटखाबंदीची प्रभावी अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. पालकांनीही दक्षता घेत आपला पाल्य व्यसनापासून दूर राहिल याची काळजी घ्यावी़. ज्यांना तंबाखूजन्य पदार्थांचे व्यसन आहे, त्यांनी त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करावा. आत्मविश्वास असेल तर कुठलेही व्यसन सोडणे शक्य आहे. शाळा, महाविद्यालय परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विक्रीस बंदी आहे. या कायद्याची मात्र प्रभावीपणे अंमलबजावणी होताना दिसत नाही़. शरीरात कोणत्याही भागात अचानक आलेली गाठ, कातडी,ओठ, जीभ आदी ठिकाणी होणारी जखम, गिळण्याचा त्रास अथवा अन्न उलटून पडणे, औषधांनी बरी न होणारी जखम, औषधांना दाद न देणारा खोकला  किंवा घशात घोगरा आवाज येणे किंवा आवाजात पडलेला फरक, अपचन, अवेळी अचानक रक्तस्त्राव, लघवी, शौचाच्या सवयीत अचानक बदल, आदी कॅन्सरची लक्षणे आहेत. सध्या कॅन्सरवरील विविध उपचारपद्धती उपलब्ध आहेत. त्यामुळे कॅन्सर झाला तर खचून न जाता कॅन्सर तज्ज्ञांकडून योग्यवेळेत उपचार घ्यावेत. वेळेत व योग्य उपचारातून अनेक कॅन्सरग्रस्त बरे झालेले आहेत. प्रत्यक्षात मात्र कॅन्सर होऊच नये यासाठी प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन डॉ़ सतीश सोनवणे यांनी केले आहे. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरHealthआरोग्यcancerकर्करोग