शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

मृत्यू कशानेही होऊ द्या....वीस हजार रुपये मिळणार.!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2020 12:03 PM

अहमदनगर : राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेंतर्गत दारिद्र्यरेषेखालील कुटुंबप्रमुखाच्या मृत्यूनंतर कुटुंबाला एकरकमी २० हजार रुपयांची रक्कम दिली जाते. या योजनेसाठी आधी एक वर्षाच्या आत अर्ज करणे आवश्यक होते. मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आता तीन वर्षांपर्यंत अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्य शासनाने तसे एका परिपत्रकान्वये आदेश जारी केल्यामुळे मृतांच्या कुटुंबीयांना आता लाभ घेणे शक्य होणार आहे. 

अहमदनगर : राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेंतर्गत दारिद्र्यरेषेखालील कुटुंबप्रमुखाच्या मृत्यूनंतर कुटुंबाला एकरकमी २० हजार रुपयांची रक्कम दिली जाते. या योजनेसाठी आधी एक वर्षाच्या आत अर्ज करणे आवश्यक होते. मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आता तीन वर्षांपर्यंत अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्य शासनाने तसे एका परिपत्रकान्वये आदेश जारी केल्यामुळे मृतांच्या कुटुंबीयांना आता लाभ घेणे शक्य होणार आहे. 

केंद्र सरकारच्या राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रमांतर्गत राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाच्या यादीत नोंद असलेल्या १८ ते ५९ वयोगटातील (६० वर्षांपेक्षा कमी) कर्ता स्त्री-पुरुष मरण पावल्यास त्याच्या कुटुंबीयांना एक रकमी २० हजार रुपये इतके अर्थसाहाय्य देण्यात येते. 

आतापर्यंत या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्याच्या कुटुंबीयांनी मृत्युच्या तारखेपासून एक वर्षाच्या आत अर्ज स्वीकारण्याची मुदत होती. आता ही मुदत वाढवून मृत्युच्या तारखेपासून तीन वर्षाच्या आत अर्ज स्वीकारण्यास २१ सप्टेंबर रोजीच्या आदेशाने राज्य शासनाने मान्यता दिली आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी तथा संजय गांधी निराधार योजनेच्या तहसीलदार भारती सगरे यांनी दिली.

कोणाला मिळतो लाभ?कुटुंबप्रमुखाचा मृत्यू झाल्याने कुटुंब निराधार झाल्यासकुटुंबाचा समावेश दारिद्र्यरेषेखालील यादीत असावासंजय गांधी निराधार योजना कार्यालयात अर्ज करावामृत्यूबाबतचे वैद्यकीय अधिकाºयाचे प्रमाणपत्र, जन्म-मृत्यू नोंदणीचा दाखला मयत कुटुंबप्रमुख असल्याबाबत तलाठ्यांचा दाखला आधारकार्डकागदपत्रांची छाननी झाल्यावर एकरकमी २० हजार दिले जातात

कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांनाही लाभकोणत्याही कारणाने कुटुंब प्रमुखाचा मृत्यू झाल्यास हा लाभ मिळतो. मात्र कोरोनामुळे अचानकपणे राज्यात हजारो जणांचा मृत्यू झालेला आहे. अहमदनगर जिल्ह्यातही कोरोना बाधितांच्या मृत्युचा आकडा सातशेपार गेला आहे. यामध्ये दारिद्र्यरेषेखालील कुटुंबप्रमुख असतील तर त्यांच्याही कुटुंबीयांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरGovernmentसरकार