शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

काटवन खंडोबा रस्त्याचे काम रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 4:10 PM

काटवन खंडोबा ते आगरकर मळा या रस्त्याची दुर्दशा झाली आहे. रस्त्यावर खड्डे पडले आहेत. तसेच फुटलेल्या जलवाहिन्यांमुळे रस्त्यावर चिखल साचला आहे.

अहमदनगर : काटवन खंडोबा ते आगरकर मळा या रस्त्याची दुर्दशा झाली आहे. रस्त्यावर खड्डे पडले आहेत. तसेच फुटलेल्या जलवाहिन्यांमुळे रस्त्यावर चिखल साचला आहे. याचा शालेय विद्यार्थी, रुग्णांना या रस्त्यावरून जाताना त्रास सहन करावा लागतो. महापालिका निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांचा नगरसेवकांना विसर पडल्याचे या परिसरातील नागरिकांनी ‘लोकमत’ला सांगितले.आयुर्वेद चौकाच्या उजव्या बाजूने काटवन खंडोबा रोड कमान ते आगरकर मळा स्वीट कॉर्नर हा आता वर्दळीचा रस्ता झाला आहे. सीना नदीच्या पुलावरून ते संजयनगर झोपडपट्टी ते आगरकर मळा असा हा रस्ता जातो.दहा वर्षांपूर्वी या रस्त्याचे काम झाले. त्यानंतर इथे रस्ताच झाला नाही. सध्या या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडलेले आहेत. सीना नदीच्या पुलावरही खड्डे पडलेले आहेत. अनेक ठिकाणी फुटलेल्या जलवाहिन्यांमधील पाणी रस्त्यावर आलेले आहे. त्यामुळे रस्त्यावर अनेक ठिकाणी चिखल झालेला आहे. दुचाकी आणि चारचाकी वाहनांची वर्दळ या रस्त्यावरून जात असल्याने रस्ता खराब झाला आहे. रात्रीच्यावेळी तर या रस्त्याने प्रवास करणे धोकादायक झाले आहे़ खराब रस्त्यामुळे येथे छोट्या-मोठ्या अपघातांचे प्रमाण वाढले आहे़ दोनवेळी महापालिका निवडणुकीत अनेकांनी आश्वासने दिली, मात्र रस्त्याचे काम झाले नाही, नेते येतात आणि केवळ आश्वासने देऊन जातात प्रत्यक्षात पाठपुरावा कुणाकडूनही होत नाही़ असे येथील नागरिक सांगतात.सदरचा रस्ता सिमेंट काँक्रिटचा करण्यासाठी महापालिकेने निविदा मागविल्या आहेत. सध्या निविदा प्रक्रिया सुरू आहे. सिमेंट काँक्रिटचे काम ३० लाख रुपये खर्चाचे आहे. आचारसंहितेचे कारण देऊन अद्याप या रस्त्याचा निर्णय झालेला नाही.सभापती असताना रस्त्याचे काम हाती घेतले होते. मात्र त्यासाठी महापालिकेत निधी उपलब्ध झाला नाही. रस्त्याचे मजबुतीकरण, काँक्रिटीकरण, रुंदीकरण यासह रस्त्याच्या दुतर्फा पथदिवे यासह मॉडेल रस्ता करण्याबाबत प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. या रस्त्यासाठी महापालिकेला निधी उपलब्ध करून द्यावा, याबाबत खासदार डॉ. सुजय विखे यांनाही निवेदन दिले आहे. -सुवर्णा जाधव, माजी सभापतीआगरकामळा ते आयुर्वेद चौकापर्यंत येण्या-जाण्यासाठी हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा आहे. लोकप्रतिनिधींचे तर या रस्त्याकडे अजिबात लक्ष नाही. याशिवाय महापालिका प्रशासन या रस्त्यांकडे लक्ष देत नाही. महत्वाच्या रस्त्यांसाठी निधी उपलब्ध होत नाही की प्रशासन निष्काळजीपणा करते आहे, हेच कळत नाही. काम करण्याची इच्छाशक्ती असणाऱ्या अधिकारी आणि लोकप्रतिनिधींची शहराला खरी गरज आहे. -गीतांजली काळे, माजी उपमहापौरकाटवन खंडोबा रस्ता होणे अत्यंत गरजेचे आहे. नऊ मीटरचा रस्ता प्रस्तावित आहे. मात्र सध्या साडेचार फूट रस्ताही उपलब्ध नाही. रस्ता अत्यंत अरुंद झाला आहे. रस्त्यावरील अतिक्रमणे काढणे अत्यंत गरजेचे आहे.-शाकीर शेख, नागरिकरस्ता चांगला होणे अत्यंत आवश्यक आहे. विद्यार्थी, रुग्णांना या रस्त्यावरून जाताना मोठा त्रास होतो. शहराजवळचा हा सर्वात महत्त्वाचा रस्ता आहे. रस्ता मंजूर झाला, तर काम का होत नाही, असा प्रश्न आहे. महापालिकेने चांगला रस्ता तयार करण्यासाठी कार्यवाही करावी.-सिद्धांत जाधव, युवक कार्यकर्ता

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर