शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
3
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
4
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
5
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
6
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
7
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
8
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
9
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
10
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
11
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
12
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
13
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
14
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
15
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
16
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
17
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
18
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
19
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
20
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं

जिवाच्या भीतीने उपाशीपोटी 100 किमी पायी प्रवास केला, मुलगाही मदतीला नाही आला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2020 11:00 AM

अकोले तालुक्यातील कातळापूर येथील एका मजुराला करावा लागला. या मजुराला चक्क उपाशीपोटी शंभर किलोमीटर पायी प्रवास करुन घर गाठावे लागले. मुलालाही मोबाईलवर संपर्क केला परंतु त्यानेही प्रतिसाद दिला नाही, अशी खंतही त्याने व्यक्त केली. 

मच्छिंद्र देशमुख/कोतूळ : कोरोनामुळे सर्वत्र लॉक डाऊन स्थिती आहे. अशा स्थितीत परगावी गेलेल्या अनेक मजुरांना संकटाचा सामना करावा लागत आहे. असाच सामना अकोले तालुक्यातील कातळापूर येथील एका मजुराला करावा लागला. या मजुराला चक्क उपाशीपोटी शंभर किलोमीटर पायी प्रवास करुन घर गाठावे लागले. मुलालाही मोबाईलवर संपर्क केला परंतु त्यानेही प्रतिसाद दिला नाही, अशी खंतही त्याने व्यक्त केली. विठ्ठल देवराम काठे असे या मजुराचे नाव आहे. अकोले तालुक्यातील हजारो आदिवासी बांधव रोजंदारीसाठी पुणे जिल्ह्यातील विविध भागात आहेत. कोरोनाच्या लॉकडाऊन व  वाहने बंद आहेत. अफवांमुळे  अनेक ठिकाणी रस्त्यावर काट्या, दगडी बांध तर काही गावात नवीन माणसाला हाकलून देत आहेत. या अमानवी कृत्याचा फटका कातळापूर येथील विठ्ठल देवराम काठे यास बसला आहे. तो पारनेर तालुक्यातील पिंपळनेर या ठिकाणी एका शेतकºयांकडे कामासाठी होता. मात्र तेथेही बाहेरचा माणूस गावात थांबू द्यायचा नाही. यामुळे नाईलाजाने विठ्ठलने आपले मजुरीचे पैसे व दोन दिवसांच्या भाकरी शेतकºयाकडून घेतल्या. पारनेरातून एखादी गाडी मिळेल या आशेवर दिवस घातला. पण गावात चिटपाखरूही नसल्याने पारनेर ते कातळापूर हा सव्वाशे किलोमीटर पायी प्रवास करायचे ठरवले. चालताना आडवळणाने अंतर कमी व्हावे म्हणून चालत आलो. परंतु काही ठिकाणी अतिउत्साही स्वयंसेवक गावाच्या हद्दीतून हकलून देत. कुठेतरी शेतातून प्लास्टीकच्या दोन पाण्याच्या बाटल्या भरायच्या व चालत रहावयचे. असा माझा दिनक्रम होता. पहिला मुक्काम बेल्हे गावात पडला. तिथेही विठ्ठल सारखे ठाणे जिल्ह्यातील तीन मजूर होते. बसस्थानकावरून लोकांनी, पोलिसांनी हाकलले. रात्री गावाबाहेरच देवळात रात्र काढली. विठ्ठल कडच्या भाकरी चौघांनी खाल्याने त्या संपल्या. दुसरा मुक्काम ओतूरात झाला.‘लोकमत’ प्रतिनिधींनी केली मदत    पाडव्याच्या दिवशी दुपारी बारा वाजता विठ्ठल काठे, पिसेवाडी शिवारात आला. एक दिवस व एक रात्र उपाशी असलेल्या विठ्ठलची अवस्था ‘लोकमत’ प्रतिनिधी व पत्रकार संजय फुलसुंदर यांनी पाहिली. त्यांंनी ओळखीच्या पिसेवाडी येथील शेतकरी एकनाथ पारूजी जाधव व मंगल जाधव यांच्या वस्तीवर नेले. सॅनिटाईझरने हातपाय स्वच्छ  करून त्यांना पुरणपोळीचे सणाचे जेवण दिले . ‘लोकमत’ने त्यांचे राजूरपर्यंत प्रवासाचे अडथळे दूर केले.  एरवी आदिवासींच्या भल्याचे खोटे अश्रू वाहणारे निवडणूक काळात कडक बंदोबस्त असताना  एका रात्रीत या लोकांना मतासाठी घेऊन येतात. निवडूनही येतात. मात्र असे असंख्य मजूर गेली तीन दिवस जीवाच्या आकांताने गावाकडे येताहेत. आता हे नेते झोपलेत का ? असा प्रश्न विठ्ठलने केल्याने वास्तव समोर आले. मुलगाही मदतीला आला नाहीविठ्ठल काठे यांचा मुलगा बारावी झालेला आहे. त्याच्याकडे दुचाकीही आहे. विठ्ठलने तीन दिवसांपूर्वी फोन करून गाडी घेऊन ये असे सांगितले. मात्र मुलगाही मदतीला आला नाही. विठ्ठलने अनेकांच्या फोनवरू संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र मुलाने फोन बीझी टोनवर ठेवला आहे.  ‘लोकमत’ प्रतिनिधीनेही देखील दोन तास संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र उत्तर आले नाही. शेवटी विठ्ठलने त्याच्या अश्रुंची वाट मोकळी केली.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरakole-acअकोलेLabourकामगारcorona virusकोरोना वायरस बातम्या