शहरं
Join us  
Trending Stories
1
या निवडणुकीनंतर राज्यातील काही दुकाने बंद होतील, त्यात राज ठाकरेंचेही दुकान; राऊतांची टीका
2
Swati Maliwal : "माझं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न..."; स्वाती मालीवाल यांनी मारहाण प्रकरणावर मांडली व्यथा
3
निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास 'प्लॅन बी' काय?; अमित शाहांनी सांगितलं विजयाचं सीक्रेट
4
'ममता बॅनर्जींची किंमत किती, 10 लाख?'; माजी न्यायमूर्ती, नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य, टीएमसी संतप्त 
5
ठाणे, अहमदाबाद अन् शेवटी हॉटेल बदलण्यासाठी तयारी...; भावेश भिंडे पोलिसांना कसा सापडला?
6
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
7
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
8
प्रसिद्ध मराठी अभिनेता अमित खेडेकरला मातृशोक; वयाच्या 60 व्या वर्षी मालवली आईची प्राणज्योत
9
अशी महिला, जिनं उभं केलं ₹७००० कोटींचं साम्राज्य; नंतर त्याच कंपनीतून काढून टाकलं, वाचा कोण आहेत त्या?
10
पहिल्याच भेटीत तैमूरचं वागणं पाहून थक्क झाला जयदीप अहलावत; म्हणाला, 'तो मोठ्या स्टाइलमध्ये...'
11
'मुंबई पुणे मुंबई 4' कधी येणार? मुक्ता बर्वे म्हणाली, "मी, स्वप्नील आणि सतीश...'
12
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
13
२०१४ पासून पत्रकार परिषद का घेतली नाही? पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मी संसदेला उत्तरदायी'
14
"आजवर तुम्ही चुकीचं नाव घेताय..", अखेर ईशा देओलने सांगितला तिच्या नावाचा खरा उच्चार
15
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
16
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
17
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; महिंद्रात तेजी, Adani Ports घसरला
18
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
19
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड
20
भाजपा उत्तर भारतीय मोर्चानं राज ठाकरेंची केली पाठराखण; शरद पवार, उद्धव ठाकरेंना सुनावलं

नगर जिल्ह्यातून जायकवाडीला पाणी सोडण्याचा निर्णय लांबणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 3:19 PM

जायकवाडीला पाणी सोडण्यास नगर जिल्ह्यातून होणारा तीव्र विरोध, अशा स्थितीत परिस्थिती चिघळली तर अपुरा असलेला पोलीस बंदोबस्त व पाण्याबाबत न्यायालयात दाखल झालेल्या याचिका या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने जायकवाडीला पाणी सोडण्याचा निर्णय पुढे ढकलला आहे.

अहमदनगर : जायकवाडीला पाणी सोडण्यास नगर जिल्ह्यातून होणारा तीव्र विरोध, अशा स्थितीत परिस्थिती चिघळली तर अपुरा असलेला पोलीस बंदोबस्त व पाण्याबाबत न्यायालयात दाखल झालेल्या याचिका या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने जायकवाडीला पाणी सोडण्याचा निर्णय पुढे ढकलला आहे.समन्यायी पाणी वाटप धोरणानुसार नगर व नाशिक जिल्ह्यांतील धरणांतून मराठवाड्यासाठी जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचा निर्णय गोदावरी महामंडळाने जलसंपदा विभागाला दिला आहे. परंतु त्यानंतर नगर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर आंदोलनास सुरूवात झाली. अकोले तालुक्यातील सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी जायकवाडीस पाणी सोडल्यास आपण प्रवरा पात्रात जलसमाधी घेऊ, असा इशारा दिला असून प्रवरा नदीवरील पुलावर त्यांनी आंदोलन सुरू केले आहे. ही स्थिती हाताळण्यासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त आवश्यक आहे.त्या पार्श्वभूमीवर पाटबंधारे विभाग, पोलीस यंत्रणा यांची जिल्हाधिकाऱ्यांसमवेत सोमवारी सकाळी बैठक झाली. ही सर्व स्थिती पाहता जायकवाडीला पाणी सोडण्याचा निर्णय तूर्तास लांबणीवर पडला आहे. जिल्हाधिकारी कार्यालय व पाटबंधारे विभाग यांच्याकडून यास दुजोरा देण्यात आला आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरJayakwadi Damजायकवाडी धरण