शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

दुष्काळावर शांत राहणे हा गुन्हा - नाना पाटेकर

By admin | Published: April 15, 2016 11:20 AM

दुष्काळावर सरकारला प्रश्न विचारण्याची गरज आहे, यावर शांत राहणे हा गुन्हा असल्याचं अभिनेते नाना पाटेकर बोलले आहेत

ऑनलाइन लोकमत - 
अहमदनगर, दि. १५ - 'दुष्काळावर सरकारला प्रश्न विचारण्याची गरज आहे, यावर शांत राहणे हा गुन्हा असल्याचं', अभिनेते नाना पाटेकर बोलले आहेत. 'दुष्कळामुळे मोठ्या प्रमाणात शहरांच्या दिशेने स्थलांतर होत आहे. मला सर्वांना सांगायचं आहे जर कोणी तुमच्या गाडीची काच ठोठावत असेल तर त्यांना भिकारी म्हणून वागणूक देऊ नका, ते शेतकरी आहेत. त्यांना मदतीची गरज आहे. त्यांना अन्न, पाणी आणि शौचालयांची सुविधा हवी आहे. आपण प्रत्येकजण एका व्यक्तीची जबाबदारी घेऊया. त्यात जास्त अवघड असं काही नाही आहे', असं भावनिक आवाहनही नाना पाटेकर यांनी केलं आहे. 
 
एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत नाना पाटेकर यांनी दुष्काळामुळे राज्यासमोर उभ्या राहिलेल्या पाणी संकटावर चर्चा केली. महाराष्ट्राने आयपीएल सामन्यांचं आयोजन करण्याची गरज नव्हती, असं मत नाना पाटेकरांनी व्यक्त केलं आहे. पाणी वाचवण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने आयपीएल सामने महाराष्ट्राबाहेर खेळवण्याचे आदेश दिलेल्या निर्णयाचं स्वागत करत यामुळे जास्त फरक पडणार नाही असंदेखील नाना पाटेकर बोलले आहेत. 'आयपीएल सामने नसले तरी त्यांना खेळपट्टी व्यवस्थित ठेवण्यासाठी पाण्याचा वापर करावा लागणार नाही का ? पण हा भावनिक विषय आहे. लोक मरत असताना आपण आनंद कसा काय साजरा करायचा ?', असा प्रश्न नाना पाटेकरांनी उपस्थित केला.
  
'लातूरला पाणी घेऊन रेल्वे पाठवण्यात आली. पण आपण याअगोदर काही उपाय केले होते का ? पुढील दोन महिने परिस्थिती भयानक असणार आहे. आपण अगोदरच उपाय केले असते तर रेल्वेने पाणी पाठवण्याची गरज लागली नसती. लोकांचा आणि राजकारण्यांचा पराभव झाल्याने आपलाही पराभव झाला आहे', असं नाना पाटेकर बोलले आहेत. 
'लोकांना काळजी आहे पण त्यांना हे सुरुवातीला जाणवलं नाही. लोकांनी मराठवड्याला येऊन परिस्थिती पाहण्याची गरज आहे. आपल्या व्यवस्थेला प्रश्न विचारण्याची गरज आहे. शांत राहणे हा गुन्हा आहे. लोक मरताना आपल्याला दिसत नाहीत, आपण आंधळे आहोत का ? जर ती आपली लोक नाहीत तर मग त्यांच्याकडे कोणी लक्ष द्यायचं ?', असा परखड सवाल नाना पाटेकरांनी उपस्थित केला आहे. 
 
यावेळी बोलताना नाना पाटेकर यांनी सनसनाटी बातम्या प्रसिद्ध करणा-या प्रसारमाध्यमांवरही टीका केली. प्रत्युषा बॅनर्जीने आत्महत्या केली याचं दुख:, मात्र प्रत्येक दिवशी तिची बातमी पहिल्या पानावर असण्याची गरज आहे का ? इंद्राणी मुखर्जीने किती वेळा लग्न केलं यामध्ये कोणाला रस आहे ? वृत्तपत्र वाचण्याचा आता मला तिरस्कार येऊ लागला आहे असं नाना पाटेकर बोलले आहेत.