शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
विराट कोहलीचा भन्नाट रन आऊट! नाका तोंडाशी पाणी आल्यावर RCB कडून झाली सांघिक कामगिरी
3
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
4
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
5
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
6
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

संतांपुढे नतमस्तक व्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2019 11:17 AM

संतांपुढे नतमस्तक होण्याचा अतिशय चांगला परिणाम आपल्या आयुष्यात दिसून येतो. संतांची योग्य, ज्ञान याचा आदर ठेवून आपण त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. नतमस्तक होणे म्हणजे नम्रता हा गुण अंगी बाळगणे होय.

सन्मतीवाणीसंतांपुढे नतमस्तक होण्याचा अतिशय चांगला परिणाम आपल्या आयुष्यात दिसून येतो. संतांची योग्य, ज्ञान याचा आदर ठेवून आपण त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. नतमस्तक होणे म्हणजे नम्रता हा गुण अंगी बाळगणे होय. आपल्याला प्रत्येक कामात संतांचे, श्रेष्ठांचे आशीर्वाद घ्यावे लागतात. त्याकरिता आपण गर्विष्ठवृत्तीला दूर सारले पाहिजे. गर्वामुळे खूप नुकसान होते. कोणाशीही चांगले संबंध ठेवता येत नाहीत. गर्वाला हद्दपार करा. मग पाहा जीवन किती सुंदर असते. मन निर्मळ हवं. निर्मळ मनामुळे मानसिक शांतता लाभते. जो माणुस नेहमी नतमस्तक होण्याचा प्रयत्न करतो तोच जीवनात यशस्वी होतो. तपस्येप्रमाणे नतमस्तक होण्यालाही तितकेच महत्त्व आहे. जीवनात नम्रता, लीनता हे गुण हवेतच. वृषभदेवांनी शेतीविषयक मोलाचे मार्गदर्शन केले. कला, संस्कृती शिकविली त्यांचे अनंत उपकार आहेत. संतांच्या शिकवणीपासून आपण ज्ञान घेतले पाहिजे. संत सन्मार्ग दाखवितात संतांचे कार्य महान आहे. संतांच्या अंगी त्यागवृत्ती असते. वंदनीय व्यक्तींचा सहवास, मार्गदर्शन मिळणे दुरापास्त असते. जीवनात गुरुची आवश्यकता असते.     जेथे धर्मश्रध्दा जागृत होते तेथे द्वेष नष्ट होतात. गढूळ पाणी शांत झाल्यावर वरचे पाणी नितळ होते. शांतवृत्ती बाळगल्यामुळे मुळ जीवन आनंददायी होते.मनुष्य जन्म दुर्लभ आहे. चांगले काम करा, चांगले बोला, चांगले वर्तन ही त्रिसूत्री अंमलात आणली तर  प्रत्येकाच्या जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. नम्रपणा हा गुण श्रेष्ठ आहे. तो प्रत्येकाने अंगी बाळगावा.                                                                                                                                                                           - पू. श्री. सन्मती महाराज

टॅग्स :Jain Templeजैन मंदीरAhmednagarअहमदनगर