शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
2
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
3
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
4
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
5
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
6
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
7
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
8
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
9
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
10
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
11
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
12
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
13
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
14
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
15
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
16
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
17
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
18
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
19
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
20
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...

पाचपुतेंशी किती वर्षे संघर्ष करायचा?-राजेंद्र नागवडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 5:46 PM

आमचे पाचपुतेंशी राजकीय मतभेद होते. पण किती वर्षे संघर्ष करायचा? त्यातून जनतेच्या पदरात काय पडले? हा प्रश्न आहे. त्यामुळे तालुक्याच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेनुसार भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे पाचपुतेंच्या प्रचारासाठी आमची यंत्रणा सक्रिय करणार आहे, असे नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी सांगितले.

श्रीगोंदा/मढेवडगाव : आमचे पाचपुतेंशी राजकीय मतभेद होते. पण किती वर्षे संघर्ष करायचा? त्यातून जनतेच्या पदरात काय पडले? हा प्रश्न आहे. त्यामुळे तालुक्याच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेनुसार भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे पाचपुतेंच्या प्रचारासाठी आमची यंत्रणा सक्रिय करणार आहे, असे नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी सांगितले.मढेवडगाव (ता. श्रीगोंदा) येथे भाजपचे श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार बबनराव पाचपुते यांच्या प्रचारार्थ सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिजाबापू शिंदे होते. नागवडे म्हणाले, आमच्या भाजप प्रवेशानंतर कार्यकर्त्यांना प्रश्न पडला आहे, आपले कसे होणार? पण चिंता करू नका. सर्वांना पद आणि मानसन्मान मिळेल. गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे, सुजय विखे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे आपल्या बरोबर आहेत. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. पाचपुते म्हणाले, राजेंद्र नागवडे यांनी विनाअट भाजपात प्रवेश केला. नागवडे यांचे विचारांची उंची असलेले घराणे आहे. नागवडे साखर कारखान्यात मी बापूंची वडीलकीची भूमिका बजावणार आहे. कुठेही अडचण येऊ देणार नाही. भगवानराव पाचपुते म्हणाले, बबनराव निवडणुकीत पास होणार आहेत. पण त्यांना नामदार करण्यासाठी खासदार डॉ. सुजय विखे यांनी सांगितल्याप्रमाणे मेरिटमध्ये आणावे लागेल. नागवडे गटाची साथ मिळाल्याने ते समीकरण यशस्वी होईल. बाळासाहेब महाडिक, सुभाष शिंदे, विठ्ठलराव काकडे, जिजाबापू शिंदे, बापूसाहेब वाबळे, संग्राम शिंदे, प्रकाश उंडे यांची भाषणे झाली.

टॅग्स :PoliticsराजकारणAhmednagarअहमदनगर