शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
2
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
3
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
4
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
5
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
6
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
7
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
8
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
9
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
10
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
11
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
12
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
13
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
14
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
15
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
16
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
17
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
18
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
19
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
20
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 

परीक्षा काळात मुख्याध्यापक करणार सरकारची कोंडी; राज्यस्तरीय बैठकीतील निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 6:41 PM

कंपनी कायदा रद्द करण्याच्या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी ऐन दहावी बारावीच्या परीक्षा काळातच तीव्र आंदोलन हाती घेण्याचा निर्णय मुख्याध्यापकांच्या राज्यस्तरीय बैठकीत मंगळवारी घेण्यात आला. त्यामुळे दहावी बारावी परीक्षेवर आंदोलनाचे सावट असणार आहे.

अहमदनगर : कंपनी कायदा रद्द करण्याच्या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी ऐन दहावी बारावीच्या परीक्षा काळातच तीव्र आंदोलन हाती घेण्याचा निर्णय मुख्याध्यापकांच्या राज्यस्तरीय बैठकीत मंगळवारी घेण्यात आला. त्यामुळे दहावी बारावी परीक्षेवर आंदोलनाचे सावट असणार आहे.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ महामंडळाचे अध्यक्ष हरिचंद्र गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली येथील सेंट विवेकानंद शाळेच्या सभागृहात राज्यातील मुख्याध्यापकांची राज्यस्तरीय बैठक पार पडली. उपाध्यक्ष अदिनाथ थोरात, जिल्हाध्यक्ष सुनील पंडित यांच्यासह संघटनेचे सर्व जिल्ह्यांतील प्रत्येकी दोन प्रतिनिधी बैठकीस हजर होते. शिक्षणातील कंपनी कायदा, सातवा वेतन आयोग, पोषण आहार त्रयस्थ संस्थेकडे द्यावे, अशैक्षणिक कामे कमी करावेत, आदी मुख्याध्यापकांच्या मागण्या आहेत. त्यावर बैठकीत चर्चा झाली. येत्या २१ फेब्रुवारीला बारावीच्या परीक्षा सुरू होत आहेत. या काळात सरकारला कोंडीत पकडण्यासाठी मंत्रालयासमोर येत्या २२ फेबु्रवारी रोजी धरणे धरण्याचा निर्णय बैठकीत झाला.सरकारने कंपन्यांना शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपन्यांनी शाळा सुरू केल्यास त्यांची मनमानी वाढेल. शाळेचे शुल्क वाढून सामान्यांना शिक्षण घेणे कठीण होईल. त्यामुळे शासनाच्या कंपनी कायद्यास कडाडून विरोध करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे. सुरुवातीला अहिंसेच्या मार्गाने आंदोलन करण्याचे ठरले आहे. सरकारने मुख्याध्यापकांच्या मागण्यांची दखल न घेतल्यास उग्र आंदोलन हाती घेण्याचा महत्वपूर्ण निर्णय झाला असून, यासंदर्भात सरकारला पुढील दोन दिवसांत निवेदन दिले जाणार असल्याचे पंडित म्हणाले.

राज्यातील मुख्याध्यापकांच्या विविध संघटनांची बैठक मंगळवारी पार पडली असून, या बैठकीत परीक्षा काळात आंदोलन उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.सरकारने मुख्याध्यापकांच्या मागण्यांची दखल न घेतल्यास परीक्षांवर बहिष्कार टाकण्याचेही ठरले आहे.सुनील पंडित, जिल्हाध्यक्ष, माध्यमिक व उच्च माध्यमिक संघ महामंडळ

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरeducationशैक्षणिक