शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
4
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
5
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
6
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
7
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
8
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
9
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
10
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
11
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
12
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
13
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
14
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
15
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
16
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
19
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
20
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या

सदस्यांच्या गैरहजेरीबाबत गटनेत्या शेंडगेंचे मौन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2021 4:21 AM

अहमदनगर : स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीदरम्यान सदस्यांच्या गैरहजेरीवरून सेनेत तक्रारवार सुरू असताना गटनेत्या रोहिणी संजय शेंडगे यांनी मात्र ...

अहमदनगर : स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीदरम्यान सदस्यांच्या गैरहजेरीवरून सेनेत तक्रारवार सुरू असताना गटनेत्या रोहिणी संजय शेंडगे यांनी मात्र मौन बाळगले आहे. सेनेच्या गटनेत्यांनी सदस्याबाबत घेतलेल्या या भूमिकेबाबत राजकीय वतुर्ळात चर्चा सुरू आहे.

महापालिकेत शिवसेना क्रमांक एकचा पक्ष आहे. असे असले तरी नुकत्याच झालेल्या स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीतून माघार घेण्याची नामुष्की शिवसेनेवर ओढवली. स्थायी समितीत सेनेचे पाच सदस्य आहेत. असे असताना सभापतीपदासाठी विजय पठारे यांचा अर्ज दाखल करताना प्रशांत गायकवाड, सचिन शिंदे, शाम नळकांडे हे सेनेचे तीन सदस्य अनुपस्थित होते. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पक्षाच्या गटनेत्यांना अधिकार असतात. माजी नगरसेवक संजय शेंडगे यांच्या पत्नी रोहिणी शेंडगे सेनेच्या महापालिकेतील गटनेत्या आहेत. भाजपच्या गटनेत्या उपमहापौर मालन ढोणे, बसपाचे मुद्दसर शेख आणि काँग्रेसच्या गटनेतेपदी सुप्रिया धनंजय जाधव यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. सेनेचे गटनेते वगळता इतर सर्व पक्षांचे गटनेते स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणुकीत सक्रिय हाेते. अविनाश घुले यांना सभापती करण्यासाठी राष्ट्रवादीचे गटनेते बारस्कर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या निवडणुकीत भाजपच्या गटनेत्या ढोणे, बसपाचे मुद्दसर शेख आणि काँग्रेसच्या गटनेत्या सुप्रिया जाधव हे राष्ट्रवादीसाेबत होते.

सभापती निवडणुकीत राष्ट्रवादी, भाजप, काँग्रेस आणि बसपा हे चारही पक्ष सोबत होते. राष्ट्रवादीचे घुले यांच्याविरोधात सेनेचे पठारे यांनी अर्ज दाखल केला होता. सेनेने माघार घेतली असली तरी स्थायी समितीचे सर्व सदस्य सोबत असणे गरजेचे होते. मात्र तिघे जण अनुपस्थित होते. ते अनुपस्थित का राहिले, याचा जाबाब गटनेत्या विचारू शकतात; परंतु त्यांनी याबाबत एक चकार शब्दही काढला नसल्याने अश्चर्य व्यक्त केले जात आहे.

...

मनोज कोतकरांना भाजपचे अभय

चार महिन्यांपूर्वी झालेल्या स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणुकीत भाजपचे मनोज कोतकर राष्ट्रवादीत गेले. ते राष्ट्रवादीकडून सभापती झाले. भजपचे शहराध्यक्ष महेंद्र गंधे यांनी याबाबत कोतकर यांना लेखी खुलासा करण्याबाबत पत्र दिलेले होते. त्यानंतर कोतकर हे चार महिने सभापती राहिले. त्यांचा सभापती पदाचा कार्यकाळ संपला. चार मिहने उलटूनही कोतकर यांच्यावर भाजपने कारवाई करण्याचे धाडस दाखविले नाही. हे एक प्रकारे भाजपने कोतकर यांना दिलेले अभय असल्याचे बोलले जाते.